शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेच्या २५,२०५ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ

By admin | Updated: July 12, 2017 02:50 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीचा लाभ

शेतकरी सन्मान योजना : २०३.४९ कोटींची कर्जमाफी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीचा लाभ नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २५,२०५ शेतकरी थकबाकीदार सदस्यांना होणार असून त्याद्वारे त्यांची २०३.४९ कोटी रुपयांची कर्जमाफी होणार आहे. जिल्ह्यातील ७६.४४ टक्के शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी कृषी कर्जवाटप जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी कृषी कर्ज वाटपासाठीही आघाडी घेऊन सर्वाधिक कर्ज उपलब्ध करून दिले आहे. शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शासनाने शेतकऱ्यांना कृषी कर्ज उपलब्ध व्हावे, यादृष्टीने कर्जमाफीची महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. त्यानुसार नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पुढाकार घेऊन १ एप्रिल २००९ नंतर कृषी कर्जाचे वाटप झालेले आणि ३० जून २०१६ पर्यंत थकीत असलेल्या शेतकरी सभासदांची संपूर्ण माहिती एकत्र करून त्यांना परत कर्ज उपलब्ध व्हावे, यादृष्टीने पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे हे नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य प्राधिकृत अधिकारी आहेत. शेतकऱ्यांना सहज व सुलभपणे कर्ज पुरवठा करण्याच्या दृष्टीने सूचना दिल्या होत्या, त्यानुसार यावर्षी सुमारे पाच हजार शेतकरी सभासदांना सुमारे ३० कोटी रुपयांचे कर्ज वाटप पूर्ण केले आहे. शासनाच्या शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्याचे थकबाकीदार कर्जदारांनाही नव्याने कर्ज पुरवठा करणे बँकेला सुलभ झाले आहे. शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळणार योजनेंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्या सुमारे २२२८७ शेतकरी सभासदांना १३६ कोटी ५९ लाख ८९ हजार रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. त्यांचा सातबारा कोरा होत असल्यामुळे नवीन कर्जही उपलब्ध होणार आहे. यामध्ये सरासरी थकबाकीदार शेतकऱ्यांपैकी ८३.७७ टक्के शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच दीड लाखावर थकीत कर्ज असलेल्या २९१८ शेतकऱ्यांना ६६ कोटी ८९ लाख ३३ हजार रुपये कर्जमाफी मिळणार आहे. त्यासाठी शेतकरी सभासदांना दीड लाखावरील थकीत कर्जाची रक्कम भरावी लागणार आहे. योजनेंतर्गत दीड लाखावरील थकीत कर्जदार शेतकरी सभासदांनी उर्वरित रक्कम भरुन कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.