शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेच्या २५,२०५ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ

By admin | Updated: July 12, 2017 02:50 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीचा लाभ

शेतकरी सन्मान योजना : २०३.४९ कोटींची कर्जमाफी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीचा लाभ नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २५,२०५ शेतकरी थकबाकीदार सदस्यांना होणार असून त्याद्वारे त्यांची २०३.४९ कोटी रुपयांची कर्जमाफी होणार आहे. जिल्ह्यातील ७६.४४ टक्के शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी कृषी कर्जवाटप जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी कृषी कर्ज वाटपासाठीही आघाडी घेऊन सर्वाधिक कर्ज उपलब्ध करून दिले आहे. शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शासनाने शेतकऱ्यांना कृषी कर्ज उपलब्ध व्हावे, यादृष्टीने कर्जमाफीची महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. त्यानुसार नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पुढाकार घेऊन १ एप्रिल २००९ नंतर कृषी कर्जाचे वाटप झालेले आणि ३० जून २०१६ पर्यंत थकीत असलेल्या शेतकरी सभासदांची संपूर्ण माहिती एकत्र करून त्यांना परत कर्ज उपलब्ध व्हावे, यादृष्टीने पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे हे नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य प्राधिकृत अधिकारी आहेत. शेतकऱ्यांना सहज व सुलभपणे कर्ज पुरवठा करण्याच्या दृष्टीने सूचना दिल्या होत्या, त्यानुसार यावर्षी सुमारे पाच हजार शेतकरी सभासदांना सुमारे ३० कोटी रुपयांचे कर्ज वाटप पूर्ण केले आहे. शासनाच्या शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्याचे थकबाकीदार कर्जदारांनाही नव्याने कर्ज पुरवठा करणे बँकेला सुलभ झाले आहे. शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळणार योजनेंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्या सुमारे २२२८७ शेतकरी सभासदांना १३६ कोटी ५९ लाख ८९ हजार रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. त्यांचा सातबारा कोरा होत असल्यामुळे नवीन कर्जही उपलब्ध होणार आहे. यामध्ये सरासरी थकबाकीदार शेतकऱ्यांपैकी ८३.७७ टक्के शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच दीड लाखावर थकीत कर्ज असलेल्या २९१८ शेतकऱ्यांना ६६ कोटी ८९ लाख ३३ हजार रुपये कर्जमाफी मिळणार आहे. त्यासाठी शेतकरी सभासदांना दीड लाखावरील थकीत कर्जाची रक्कम भरावी लागणार आहे. योजनेंतर्गत दीड लाखावरील थकीत कर्जदार शेतकरी सभासदांनी उर्वरित रक्कम भरुन कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.