शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
3
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
4
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
5
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
6
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
7
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
8
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
9
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
10
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
11
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
12
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
13
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
14
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
15
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
16
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
17
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
18
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
19
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
20
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी

ग्रामीणमध्ये वाढताहेत मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:07 IST

नागपूर : लोकमतने बुधवारच्या अंकात ग्रामीण भागात कोरोनामुळे मृत्यूची संख्या वाढत असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताला जिल्हा ...

नागपूर : लोकमतने बुधवारच्या अंकात ग्रामीण भागात कोरोनामुळे मृत्यूची संख्या वाढत असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताला जिल्हा परिषदेच्या सदस्यांनीही दुजोरा दिला आहे. याला जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था जबाबदार असल्याचा ठपका जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत अध्यक्षासह सदस्यांनी ठेवला. हाताबाहेर चाललेल्या कोरोनाच्या परिस्थितीला जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना जबाबदार ठरवीत संताप व्यक्त करण्यात आला. स्थायी समितीच्या बैठकीत स्वत: अध्यक्षांनी परिस्थिती हाताबाहेर गेल्याने हतबलता दाखवीत ग्रामीण भागातील अवस्था पत्रकार परिषदेतून व्यक्त केली.

जि.प. अध्यक्ष रश्मी बर्वे म्हणाल्या की, ग्रामीण भागातील स्थिती अतिशय बिकट आहे. ग्रामीण भागात टेस्टिंगचा अभाव आहे. लसीकरणासाठी लोकांचा प्रतिसाद कमी आहे. रुग्ण गंभीर झाल्यास दर्जेदार उपचाराची सोय नाही. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर ग्रामीण भागात नाही. शहरात रुग्णाला भरतीसाठी आणल्यास बेड उपलब्ध नाही. त्यामुळे घरातच मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोना रुग्णाचा घरात मृत्यू झाल्यामुळे अंत्यविधीसाठी शहरासारखी सोय नाही. अंत्यसंस्काराची यंत्रणाच नसल्याने अंत्ययात्रा निघत आहे. त्यामुळे बाधितांचे प्रमाण वाढले आहे. प्रशासनाने पाठपुरावा तरी किती करावा, असा सवालही त्यांनी यावेळी केला. बुधवारी ही बैठक ऑनलाईन पार पडली. यात सदस्य दिनेश बंग, नाना कंभाले, संजय झाडे या सदस्यांनी वर्षभराचा भत्ता स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले.

- बैठकीतील निर्णय

१) १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून २५ टक्के निधी व अबंधित निधी आरोग्यावर खर्च करण्याची परवानगी.

२) आशा वर्करला २००० रुपये अतिरिक्त मानधन व त्यांच्या विम्याचा कालावधी वाढवून देण्याचा सरकारला प्रस्ताव पाठविणार.

३) गावठी डॉक्टरांमुळे रुग्ण गंभीर होत असल्याने, त्यांच्यावर कारवाईचे निर्देश.

- ग्रामीण भागातील आरोग्यासाठी ५७ कोटीची मागणी.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यासाठी स्वतंत्र २०० बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यात यावे. त्यात ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची सोयीसुविधा असावी, यासाठी ५७ कोटी रुपयाच्या निधीची मागणी जिल्हा परिषदेने शासनाकडे केली आहे.

- जिल्हाधिकाऱ्यांकडे १०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा प्रस्ताव पाठविला असून, ५७ कोटींची मागणी केली आहे. ग्रामीण भागातून कोरोना हद्दपार करण्यासाठी सर्व सदस्य एक असून, इतरही बाबी पडताळून बघितल्या जात आहेत.

रश्मी बर्वे, अध्यक्ष, जिल्हा परिषद