शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

ग्रामीणमध्ये वाढताहेत मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:07 IST

नागपूर : लोकमतने बुधवारच्या अंकात ग्रामीण भागात कोरोनामुळे मृत्यूची संख्या वाढत असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताला जिल्हा ...

नागपूर : लोकमतने बुधवारच्या अंकात ग्रामीण भागात कोरोनामुळे मृत्यूची संख्या वाढत असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताला जिल्हा परिषदेच्या सदस्यांनीही दुजोरा दिला आहे. याला जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था जबाबदार असल्याचा ठपका जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत अध्यक्षासह सदस्यांनी ठेवला. हाताबाहेर चाललेल्या कोरोनाच्या परिस्थितीला जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना जबाबदार ठरवीत संताप व्यक्त करण्यात आला. स्थायी समितीच्या बैठकीत स्वत: अध्यक्षांनी परिस्थिती हाताबाहेर गेल्याने हतबलता दाखवीत ग्रामीण भागातील अवस्था पत्रकार परिषदेतून व्यक्त केली.

जि.प. अध्यक्ष रश्मी बर्वे म्हणाल्या की, ग्रामीण भागातील स्थिती अतिशय बिकट आहे. ग्रामीण भागात टेस्टिंगचा अभाव आहे. लसीकरणासाठी लोकांचा प्रतिसाद कमी आहे. रुग्ण गंभीर झाल्यास दर्जेदार उपचाराची सोय नाही. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर ग्रामीण भागात नाही. शहरात रुग्णाला भरतीसाठी आणल्यास बेड उपलब्ध नाही. त्यामुळे घरातच मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोना रुग्णाचा घरात मृत्यू झाल्यामुळे अंत्यविधीसाठी शहरासारखी सोय नाही. अंत्यसंस्काराची यंत्रणाच नसल्याने अंत्ययात्रा निघत आहे. त्यामुळे बाधितांचे प्रमाण वाढले आहे. प्रशासनाने पाठपुरावा तरी किती करावा, असा सवालही त्यांनी यावेळी केला. बुधवारी ही बैठक ऑनलाईन पार पडली. यात सदस्य दिनेश बंग, नाना कंभाले, संजय झाडे या सदस्यांनी वर्षभराचा भत्ता स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले.

- बैठकीतील निर्णय

१) १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून २५ टक्के निधी व अबंधित निधी आरोग्यावर खर्च करण्याची परवानगी.

२) आशा वर्करला २००० रुपये अतिरिक्त मानधन व त्यांच्या विम्याचा कालावधी वाढवून देण्याचा सरकारला प्रस्ताव पाठविणार.

३) गावठी डॉक्टरांमुळे रुग्ण गंभीर होत असल्याने, त्यांच्यावर कारवाईचे निर्देश.

- ग्रामीण भागातील आरोग्यासाठी ५७ कोटीची मागणी.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यासाठी स्वतंत्र २०० बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यात यावे. त्यात ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची सोयीसुविधा असावी, यासाठी ५७ कोटी रुपयाच्या निधीची मागणी जिल्हा परिषदेने शासनाकडे केली आहे.

- जिल्हाधिकाऱ्यांकडे १०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा प्रस्ताव पाठविला असून, ५७ कोटींची मागणी केली आहे. ग्रामीण भागातून कोरोना हद्दपार करण्यासाठी सर्व सदस्य एक असून, इतरही बाबी पडताळून बघितल्या जात आहेत.

रश्मी बर्वे, अध्यक्ष, जिल्हा परिषद