शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

आदिवासी गावात दररोज होतात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:07 IST

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आदिवासी भागात चांगलेच तांडव माजविले. गावागावात दररोज मृत्यू झाले. पॉझिटिव्ह निघणाऱ्यांना पाच दिवसांची औषध ...

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आदिवासी भागात चांगलेच तांडव माजविले. गावागावात दररोज मृत्यू झाले. पॉझिटिव्ह निघणाऱ्यांना पाच दिवसांची औषध दिल्याशिवाय आरोग्य विभागाने काय केले? याचे उत्तर जिल्हा परिषदेने द्यावे. संतप्त झालेल्या आदिवासी भागातील जि.प. सदस्य शांता कुमरे यांनी सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद प्रशासनासह पदाधिकाऱ्यांवरही नाराजी व्यक्त केली. आदिवासी दुर्गम भागात कोरोना हाताळण्यात आरोग्य यंत्रणा अपयशी ठरल्याचा ठपका त्यांनी ठेवला.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आभासी पद्धतीने सुरू झाली. कोरोनावर उपाययोजनेचा विषय सुरू असताना, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारवर ताशेरे ओढणे सुरू होते. अशात सत्ताधारी सदस्य प्रकाश खापरे विरोधकांना चूप बसा, असे सांगून आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत होते. ही ताणाताणी सुरू असतानाच, ज्येष्ठ सदस्य शांता कुमरे यांनी संतप्त होऊ खापरेंना चांगलीच चपराक लावली. विरोधकांना बोलू द्या, त्यांचा आवाज दाबू नका, असे वक्तव्य करून सत्ताधाऱ्यांनाच घरचा अहेर दिला. सभेनंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, जिल्ह्यातील रामटेक व पारशिवनी हा भाग आदिवासीबहुल आहे. कोलितमारा, ढवळापूर, सुवरधरा, चारगाव, सालई, अंबाझरी, पथराई, देवलापार, करवाई या गावांमध्ये कोरोनाने अनेकांचे जीव गेले आहे. कोरोनाची टेस्ट करण्यासाठी या गावातील लोकांना २५ किलोमीटर जावे लागते आहे. पॉझिटिव्ह आल्यानंतर गृहविलगीकरणाचा सल्ला आणि ५ दिवसांच्या व्हिटॅमिनच्या गोळ्या हाच उपचार आरोग्य विभागाचा आहे. कोविड केअर सेंटर नाही. गृहविलगीकरणातील रुग्णांची नियमित तपासणी नाही. गंभीर झालेल्या रुग्णांवर उपचाराची अत्याधुनिक सोय नाही. आरोग्य केंद्रामध्ये मनुष्यबळ नाही. त्यामुळे दररोजचे मृत्यू आदिवासी लोकांनी अनुभवले आहे. आजही परिस्थिती बदलली नाही. आदिवासी भागाकडे लक्ष न दिल्यास तिसऱ्या लाटेत हाहाकार माजल्याशिवाय राहणार नाही.

- भुईनिंबाचा पाला खाऊन झाले बरे

आरोग्य यंत्रणाच कुचकामी ठरली. औषधोपचार नाही. रुग्णालयांमध्ये डॉक्टर, परिचारिका नाही. त्यामुळे आरोग्य विभागावर लोकांचा विश्वास उडाला आहे. आदिवासी भागात अनेक जण भुईनिंबाचा पाला खाऊन बरे झाल्याचे त्यांनी सांगितले.

- लसीकरणापूर्वी करा कोरोनाची टेस्ट

५ एप्रिलपासून आदिवासी भागामध्ये लसीकरणाला सुरूवात झाली. लस घेतल्यानंतर कोरोना होतो, अशी भीती लोकांमध्ये निर्माण झाली. त्यामुळे लसीकरणासाठी लोकांचा प्रतिसाद मिळाला नाही. आजही तशीच स्थिती आहे. प्रशासनाने आता लसीकरणापूर्वी कोरोनाचे टेस्ट करूनच लस द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

- नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही

मी स्वत: कोरोना पॉझिटिव्ह आले. मला केवळ ५ दिवसांच्या औषधी देऊन घरात राहण्याचा सल्ला दिला. नंतर कुणी तपासायला आले नाही. लोकप्रतिनिधीची अशी अवस्था असेल, तर जनतेचे काय हाल असतील, त्यामुळेच सभेत संतप्त होऊन आदिवासींची परिस्थिती प्रशासनापुढे मांडली.