शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
5
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
6
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
7
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
8
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
9
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
10
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
11
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
12
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
13
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
14
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
15
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
16
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
17
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
18
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
19
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
20
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

व्हेंटिलेटरअभावी स्वाईन फ्लू रुग्णाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 01:40 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) भरती असलेल्या स्वाईन फ्लूच्या रुग्णाला वेळेवर व्हेंटिलेटर न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप मृताचा नातेवाईकांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देमेडिकलमधील घटना : उपचारात हलगर्जीपणा केल्याचा नातेवाईकांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) भरती असलेल्या स्वाईन फ्लूच्या रुग्णाला वेळेवर व्हेंटिलेटर न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप मृताचा नातेवाईकांनी केल्याने खळबळ उडाली आहे. उपचारातही हलगर्जीपणा केल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.हाजी इब्राहिम रा. शांतिनगर असे मृताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हाजी इब्राहिमची प्रकृती खालावल्याने सुरुवातीला त्याला एका खासगी इस्पितळात भरती केले. तेथील डॉक्टरांनी स्वाईन फ्लूची लक्षणे ओळखून या रोगावर सोयी नसल्याचे सांगितले आणि नंतर खूप खर्च येणार असल्याची माहिती दिली. यामुळे कुटुंबीयांनी हाजीला मेडिकलमध्ये भरती केले. त्याच्यावर वॉर्ड क्रमांक २४ मध्ये उपचार सुरू होते. रविवारी श्वास घेण्यास त्रास होत होता. नातेवाईकांनी व्हेंटिलेटर लावण्याची मागणी केली, परंतु डॉक्टरांनी याकडे दुर्लक्ष केले. रुग्णांनी मदतीसाठी शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष शेख हुसैन, माजी आमदार दीनानाथ पडोळे व अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्याशी संपर्क साधला. परंतु व्हेंटिलेटर उपलब्ध झाले नाही. सोमवारी सकाळी ११ वाजता व्हेंटिलेटर उपलब्ध झाले, मात्र तासाभरात रुग्णाने शेवटचा श्वास घेतला. शेख हुसैन यांनी आरोप केला की, मुख्यमंत्र्यांच्या शहरात जर ही स्थिती असेल तर दुसºया शहरांचा विचारच करायला नको. स्वाईन फ्लूचा प्रकोप वाढत असताना मेडिकलमध्ये पुरेशी उपकरणे नाहीत. औषधांचा तुटवडा पडला आहे. गरीब रुग्णांना व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले जात नाही.