शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
3
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
4
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
5
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
6
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
7
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
8
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
9
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
10
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
11
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
12
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
13
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
Daily Top 2Weekly Top 5

निपाह मेंदूज्वरामुळे मृत्यूचे प्रमाण ७५ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 21:50 IST

रेबीजनंतर सर्वात घातक असलेल्या निपाह मेंदूज्वराचे मृत्यूचे प्रमाण ५० ते ७५ टक्के एवढे आहे. यावर्षी केरळमधील कोझीकोड जिल्ह्यात झालेल्या निपाह मेंदूज्वराच्या उद्रेकामध्ये १९ रुग्णांपैकी १७ रुग्ण मृत्यूमुखी पडले. कोझीकोडचे मेंदू रोगतज्ज्ञ डॉ. जया क्रिश्नन यांनी सांगितले, १७ मे रोजी २७ वर्षाच्या रुग्णामध्ये या रोगाचे निदान झाले. दुसऱ्याच दिवशी त्याचे वडील आणि आत्याही याच रोगाच्या प्रादुर्भावाने दवाखान्यात दाखल झाले. यावरून या रोगाची भीषणता दिसून येते.

ठळक मुद्देराष्ट्रीय ‘ब्रेन वीक’ : केरळमध्ये १७ रुग्णांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेबीजनंतर सर्वात घातक असलेल्या निपाह मेंदूज्वराचे मृत्यूचे प्रमाण ५० ते ७५ टक्के एवढे आहे. यावर्षी केरळमधील कोझीकोड जिल्ह्यात झालेल्या निपाह मेंदूज्वराच्या उद्रेकामध्ये १९ रुग्णांपैकी १७ रुग्ण मृत्यूमुखी पडले. कोझीकोडचे मेंदू रोगतज्ज्ञ डॉ. जया क्रिश्नन यांनी सांगितले, १७ मे रोजी २७ वर्षाच्या रुग्णामध्ये या रोगाचे निदान झाले. दुसऱ्याच दिवशी त्याचे वडील आणि आत्याही याच रोगाच्या प्रादुर्भावाने दवाखान्यात दाखल झाले. यावरून या रोगाची भीषणता दिसून येते. 

निपाह मेंदूज्वराचे पहिल्यांदा रुग्ण १९९८ मध्ये क्वालालम्पूरजवळील निपाह या गावी दिसून आले. लवकरच तो इतर गावात आणि सिंगापूरलादेखील पसरला. येथे आणि डुकरांना हा रोग झाला आणि नंतर तो डुकराची पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना झाला. त्यावेळी २६५ रुग्णांची नोंद झाली. त्यातल १०४ रुग्ण दगावले. २००१ मध्ये सिलिगुडी येथे ६६ रुग्णांची नोंद झाली होती.फळ खाणाऱ्या वटवाघुळांमध्ये हे विषाणू घर करून राहतात आणि नंतर जनावराच्या किंवा मनुष्याच्या शरीरात जातात आणि रोग पसरतो. वटवाघुळाला मात्र हा रोग होत नाही. मात्र त्याची लाळ आणि विष्टेमुळे फळ बाधित होतात आणि ही फळं माणसाने किंवा जनावरांनी खाल्ली तर त्यांना निपाहची लागण होते. हा रोग अतिशय लागट आहे. यामुळे विषाणुबाधित ताडी प्याल्यामुळेसुद्धा माणसामध्ये संसर्ग होतो. हा विषाणू माणसापासूनसुद्धा पसरतो. सिलिगुडी आणि बांगला देशमध्ये ६५ टक्के रुग्ण हे दवाखान्यातील कर्मचारी किंवा सुरुवातीच्या रुग्णाचे नातेवाईक होते. सात दिवसांत मृत्यूमुखी पडतात रुग्ण 
या भयंकर रोगाकरिता औषध नाही आणि प्रतिबंधक लसदेखील नाही. रोग कमी प्रमाणात दिसतो. परंतु घातक आहे. कारण, लक्षणे दिसताच सात दिवसांत या रोगाने रुग्ण दगावतो. औषधी नसल्यामुळे या रोगापासून बचाव करण्याची गरज आहे, असे जागतिक टॉपिकल न्यूरोलॉजीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी सांगितले.

 

टॅग्स :Nipah Virusनिपाह विषाणूdoctorडॉक्टर