शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

धर्मापुरी-महालगाव राेडवर मरण स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क खात : दुरुस्तीअभावी माैदा तालुक्यातील धर्मापुरी-मोरगाव-महालगाव राेडवर खड्डे तयार झाले असून, त्यात पावसाचे पाणी साचल्याने त्याला ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

खात : दुरुस्तीअभावी माैदा तालुक्यातील धर्मापुरी-मोरगाव-महालगाव राेडवर खड्डे तयार झाले असून, त्यात पावसाचे पाणी साचल्याने त्याला डबक्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. खड्डे व त्यातील पाण्यामुळे या राेडवर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या राेडवर मरण स्वस्त असल्याच्या प्रतिक्रिया या भागातील वाहनचालकांनी व्यक्त केल्या आहेत.

या राेडवरील डांबरीकरण पूर्वीच उखडले असून, सततच्या रहदारीमुळे त्यावर तयार झालेल्या खड्ड्यांचा आकार व खाेली वाढत चालली आहे. राेडवर असलेला डांबराचा थर कुठे गेला, हेही कळायला मार्ग नाही. पाऊस काेसळताच खड्डे पाण्याने तुडुंब भरले आहेत. या राेडवरून पायी चालणे कठीण झाले असताना नागरिकांना वाहने चालवावी लागत आहेत. नागरिकांना त्याच खड्डे व त्यातील पाण्यातून जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात तसेच वाहन खड्ड्यातून गेल्यास अपघात हाेत असून, त्यातून अनेकांना दुखापतही झाली आहे.

खड्ड्यांमुळे या मार्गावारील बससेवा बंद करण्यात आली आहे. रेतीच्या सततच्या ओव्हरलाेड वाहतुकीमुळे या मार्गाची दैनावस्था झाली आहे, असा आराेप नागरिकांनी केला आहे. रेतीची वाहतूक कायमची बंद करून या राेडची दर्जेदार दुरुस्ती करण्याची मागणी मोरगावचे सरपंच नंदू पाटील, तांडाच्या सरपंच मनोरमा डोरले, चंद्रशेखर पाटेकर, श्यामलाल मोहतुरे, धनंजय झिंगरे, धनपाल शेंडे, श्रीकांत झिंगरे, शंकर डोरले, मोहिमुद्दिन तुरक, वर्षा गभणे, मनोहर मेश्राम, राधेश्याम चापले, दुर्योधन बुधे, मूर्ती कारेमोरे यांनी केली आहे.

...

नेत्यांच्या वल्गना अन् नागरिकांचे हाल

हा मार्ग आठ किमीचा आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी या राेडच्या दुरुस्तीला मंजुरी देण्यात व त्यासाठी निधी मंजूर करण्यात आल्याची बतावणी करीत राजकीय नेत्यांनी गाजावाजा करीत भूमिपूजन केले. त्याअनुषंगाने दुरुस्ती कामाला सुरुवात करताच चार दिवसांनी काम बंद करण्यात आले. तेव्हापासून आजवर या राेडच्या कामाला सुरुवात करण्यात आली नाही. खड्ड्यांमुळे या भागातील नागरिकांचे हाल हाेत आहेत.

...

वन्यप्राण्यांचा वावर

या परिसरात रानडुक्कर, हरीण व इतर वन्यप्राण्यांचा वावर आहे. ते प्राणी मध्येच राेड ओलांडतात. वाहने थाेडी वेगात असल्याने तसेच मध्येच वन्यप्राणी आडवे येत असल्यानेही अपघात हाेत आहेत. एरवी या मार्गाने या भागातील विद्यार्थीही शाळेत ये-जा करण्यासाठी प्रवास करतात. सध्या काेराेना महामारीमुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थी या त्रासापासून वाचले आहेत. पूर्वी खड्ड्यांमुळे त्यांना अर्धा तास आधी घरून निघावे लागायचे आणि अर्धा तास उशिरा घरी पाेहाेचायचे.