शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांशी सौजन्याने वागा : पोलीस आयुक्त-सहआयुक्तांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 22:59 IST

‘लॉकडाऊन’ दरम्यान काही ठिकाणी पोलिसांनी विनाकारण बळाचा वापर केला. त्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय आणि सहआयुक्त रवींद्र कदम यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत ठाणेदारांना फटकारले.

ठळक मुद्देविनाकारण बळाचा वापर करू नका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘लॉकडाऊन’ दरम्यान काही ठिकाणी पोलिसांनी विनाकारण बळाचा वापर केला. त्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय आणि सहआयुक्त रवींद्र कदम यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत ठाणेदारांना फटकारले. तसेच नागपूर पोलिसांची प्रतिमा लक्षात ठेवून व्यवहार करा, उपद्रव करणाऱ्यांशी कडक वागा परंतु विनाकारण बळाचा वापर करू नका, नागरिकांशी सौजन्याने वागा,असे निर्देशही दिले.विनाकारण लोक रस्त्यावर येत असल्याने पोलिसांना खूप अडचणींचा सामना करावा लागला होता. यामुळे मंगळवारी अनेक ठिकाणी पोलिसांनी उपद्रव करणाऱ्या लोकांवर दंडुके चालवले. परंतु यात अनेक निरपराध लोकही बळी पडले. नागरिकांनी आपली नाराजीही व्यक्त केली. कुठलीही विचारणा न करता पोलीस दंडुके चालवित असल्याबद्दल आपला रोष व्यक्त केला. पोलीस आयुक्त व सह पोलीस आयुक्तांपर्यंत ही गोष्ट पोहोचली. आज बुधवारी गुन्हे मिटिंग दरम्यान पोलीस आयुक्त व सहपोलीस आयुक्त यांनी ठाणेदारांशी संवाद साधला. तेव्हा आयुक्तांनी उपरोक्त आदेश दिले. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय म्हणाले, कायदा व सुव्यवस्थेचे कुणी पालन करीत नसेल, उपद्रव करीत असेल तर त्याच्याशी कठोरपणे वागा परंतु सर्वसामान्य नागरिकांशी सभ्यतेनेच वागले पाहिजे. अनेक ठिकाणी सकाळच्या वेळी घरासमोर फिरत असलेल्या लोकांशी विनाकारण अभद्र व्यवहार करण्यात आला. असे होता कामा नये. सामान्य नागरिक घराबाहेर फिरताना दिसून आले तर त्यांना समजावून घरी पाठवा. कामाचा ताण आणि उपद्रव करणाऱ्या लोकांप्रति असलेला राग सामान्य नागरिकांवर काढणे योग्य नाही. नागपूर पोलिसांनी आपल्या कार्यातून नागरिकांमध्ये चांगली ‘इमेज’ तयार केली आहे. त्यामुळे नागरिक नेहमीच पोलिसांचे समर्थन करीत त्यांना साथ देतात. ही ओळख कायम ठेवणे पोलिसांची जबाबदारी आहे.सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी टेलिफोन एक्सचेंज चौकात विनाकारण फोटो काढण्यासाठी उठाबश्या करायला लावणाऱ्या अधिकाऱ्यांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला. वाठोडा आणि सीताबर्डीच्या ठाणेदारांनी घेतलेल्या भूमिकेबद्दलही फटकारले. पोलीस आयुक्तांनी ठाणेदारांना आवश्यकता असलेल्या लोकांना पास उपलब्ध करण्यास टाळाटाळ न करण्याचे निर्देश दिले.ते म्हणाले, किराणा, धान्य, दूध, भाजीपाला आदी वस्तूंचा व्यवसाय करणाऱ्यांशिवाय गरजू व्यक्तींना पास द्यायला हवे. पास जारी करण्यात काही ठाणेदार नागरिकांना योग्य प्रतिसाद देत नाही आहेत. याच्या तक्रारीही पोलीस आयुक्तांकडे आल्या आहेत. आयुक्तांनी अशा ठाणेदारांना तत्परतेने काम करण्याचे निर्देश दिले. बैठकीत मनपाच्या एनडीएस पथकाबाबतही नागरिकांमध्ये रोष असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. लॉकडाऊन असूनही २३ मार्च रोजी सतरंजीपुरा झोनमध्ये एनडीएस पथक जागनाथ बुधवारी येथे अतिक्रमण कारवाई करीत होते. नागरिकांनी या पथकाचा घेराव करून अपमानित केले होते. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी सूचना न देता कारवाई करण्यात आली होती. एनडीएस पथक पोलिसांसारखी वर्दी घालत असल्याने पोलिसांनी प्रतिमा मलिन होत असल्याचेही सांगण्यात आले.

 

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीस