शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
3
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
4
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
5
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
6
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
7
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
8
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
9
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
10
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
11
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
12
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
13
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
14
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
15
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
16
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
17
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
18
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
19
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
20
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांशी सौजन्याने वागा : पोलीस आयुक्त-सहआयुक्तांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 22:59 IST

‘लॉकडाऊन’ दरम्यान काही ठिकाणी पोलिसांनी विनाकारण बळाचा वापर केला. त्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय आणि सहआयुक्त रवींद्र कदम यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत ठाणेदारांना फटकारले.

ठळक मुद्देविनाकारण बळाचा वापर करू नका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘लॉकडाऊन’ दरम्यान काही ठिकाणी पोलिसांनी विनाकारण बळाचा वापर केला. त्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय आणि सहआयुक्त रवींद्र कदम यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत ठाणेदारांना फटकारले. तसेच नागपूर पोलिसांची प्रतिमा लक्षात ठेवून व्यवहार करा, उपद्रव करणाऱ्यांशी कडक वागा परंतु विनाकारण बळाचा वापर करू नका, नागरिकांशी सौजन्याने वागा,असे निर्देशही दिले.विनाकारण लोक रस्त्यावर येत असल्याने पोलिसांना खूप अडचणींचा सामना करावा लागला होता. यामुळे मंगळवारी अनेक ठिकाणी पोलिसांनी उपद्रव करणाऱ्या लोकांवर दंडुके चालवले. परंतु यात अनेक निरपराध लोकही बळी पडले. नागरिकांनी आपली नाराजीही व्यक्त केली. कुठलीही विचारणा न करता पोलीस दंडुके चालवित असल्याबद्दल आपला रोष व्यक्त केला. पोलीस आयुक्त व सह पोलीस आयुक्तांपर्यंत ही गोष्ट पोहोचली. आज बुधवारी गुन्हे मिटिंग दरम्यान पोलीस आयुक्त व सहपोलीस आयुक्त यांनी ठाणेदारांशी संवाद साधला. तेव्हा आयुक्तांनी उपरोक्त आदेश दिले. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय म्हणाले, कायदा व सुव्यवस्थेचे कुणी पालन करीत नसेल, उपद्रव करीत असेल तर त्याच्याशी कठोरपणे वागा परंतु सर्वसामान्य नागरिकांशी सभ्यतेनेच वागले पाहिजे. अनेक ठिकाणी सकाळच्या वेळी घरासमोर फिरत असलेल्या लोकांशी विनाकारण अभद्र व्यवहार करण्यात आला. असे होता कामा नये. सामान्य नागरिक घराबाहेर फिरताना दिसून आले तर त्यांना समजावून घरी पाठवा. कामाचा ताण आणि उपद्रव करणाऱ्या लोकांप्रति असलेला राग सामान्य नागरिकांवर काढणे योग्य नाही. नागपूर पोलिसांनी आपल्या कार्यातून नागरिकांमध्ये चांगली ‘इमेज’ तयार केली आहे. त्यामुळे नागरिक नेहमीच पोलिसांचे समर्थन करीत त्यांना साथ देतात. ही ओळख कायम ठेवणे पोलिसांची जबाबदारी आहे.सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी टेलिफोन एक्सचेंज चौकात विनाकारण फोटो काढण्यासाठी उठाबश्या करायला लावणाऱ्या अधिकाऱ्यांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला. वाठोडा आणि सीताबर्डीच्या ठाणेदारांनी घेतलेल्या भूमिकेबद्दलही फटकारले. पोलीस आयुक्तांनी ठाणेदारांना आवश्यकता असलेल्या लोकांना पास उपलब्ध करण्यास टाळाटाळ न करण्याचे निर्देश दिले.ते म्हणाले, किराणा, धान्य, दूध, भाजीपाला आदी वस्तूंचा व्यवसाय करणाऱ्यांशिवाय गरजू व्यक्तींना पास द्यायला हवे. पास जारी करण्यात काही ठाणेदार नागरिकांना योग्य प्रतिसाद देत नाही आहेत. याच्या तक्रारीही पोलीस आयुक्तांकडे आल्या आहेत. आयुक्तांनी अशा ठाणेदारांना तत्परतेने काम करण्याचे निर्देश दिले. बैठकीत मनपाच्या एनडीएस पथकाबाबतही नागरिकांमध्ये रोष असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. लॉकडाऊन असूनही २३ मार्च रोजी सतरंजीपुरा झोनमध्ये एनडीएस पथक जागनाथ बुधवारी येथे अतिक्रमण कारवाई करीत होते. नागरिकांनी या पथकाचा घेराव करून अपमानित केले होते. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी सूचना न देता कारवाई करण्यात आली होती. एनडीएस पथक पोलिसांसारखी वर्दी घालत असल्याने पोलिसांनी प्रतिमा मलिन होत असल्याचेही सांगण्यात आले.

 

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीस