शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अंबाझरी तलावात तरंगताे आहे मृत माशांचा खच ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:07 IST

नागपूर : अंबाझरी तलावातील माशांचा मृत्यू अचानक वाढला आहे. माेठ्या संख्येने माशांचा खच तलावातील पाण्यावर तरंगताना दिसताे आहे. त्यामुळे ...

नागपूर : अंबाझरी तलावातील माशांचा मृत्यू अचानक वाढला आहे. माेठ्या संख्येने माशांचा खच तलावातील पाण्यावर तरंगताना दिसताे आहे. त्यामुळे आश्चर्य आणि चिंताही व्यक्त केली जात आहे. मात्र या माशांचा अचानक मृत्यू का हाेत आहे, याबाबत महापालिका किंवा कुठल्याही जबाबदार यंत्रणेचे लक्ष गेलेले दिसत नाही.

बुधवारी अचानक मृत माशांचा खच तलावाच्या पाण्यावर ठिकठिकणी तरंगताना आढळून आला. अचानक मासे का मरताहेत, हा प्रश्न निर्माण हाेत आहे. ग्रीन व्हिजिलचे संस्थापक काैस्तुभ चटर्जी यांनी तलावात घडणाऱ्या घडामाेडींवर प्रकाश टाकला व मासे मरण्याच्या काही शक्यता नाेंदविल्या.

- नागपुरातील बहुतेक तलावांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण घटलेले आहे. शहरातील तलावात कृत्रितपणे ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी फवारे किंवा कुठलीच यंत्रणा नाही. ऑक्सिजन कमी झाल्याने मासे व इतर जलचर प्राण्यांना अडचण येते.

- थंड पाण्यात डिसाॅल्व‌ड ऑक्सिजनचे प्रमाण अधिक असते. मात्र उन्हाळ्यात तापमान वाढल्याने पाण्याचेही तापमान वाढते आणि उष्ण पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण घटते. माशांच्या मृत्यूचे हेही एक कारण असण्याची शक्यता चटर्जी यांनी व्यक्त केली.

- दिवसा सूर्यप्रकाशाच्या मदतीने तलावातील वनस्पती ऑक्सिजन तयार करतात. त्याचा फायदा माशांना हाेताे. मात्र रात्री फाेटाेसिन्थेसिसची प्रक्रिया बंद हाेते व ऑक्सिजन निर्मितीही थांबते. दुसरीकडे जलकुंभीसारख्या परावलंबी वनस्पती माेठ्या प्रमाणात ऑक्सिजन ग्रहण करीत असल्याने माशांना ते पुरेसा प्रमाणात मिळत नाही.

- उन्हाळ्यातील उष्णतेमुळे तलावाच्या पाण्याचा वरचा स्तर गरम हाेताे. त्याखालचा कमी थंड तर आणखी खालचा थर अधिक थंड असताे. तळातील ऑक्सिजन घटल्याने मासे त्यासाठी वरच्या थरापर्यंत येतात आणि उष्ण पाणी सहन न झाल्याने त्यांचा मृत्यू हाेण्याची शक्यता असते.

- मासेमारी हेही एक कारण असू शकते. मासेमार अधिक मासे मिळावे म्हणून तलावात मासे व खाद्य टाकतात. यामुळे माशांची संख्या क्षमतेपेक्षा वाढते. त्यामुळे खाद्यपदार्थ व ऑक्सिजनसाठी माशांमध्ये संघर्ष वाढताे व त्यात कमजाेर माशांचा मृत्यू हाेताे. मासे मृत्यूचे हेही एक कारण असू शकते.

- तलावामध्ये कुठूनतरी प्रदूषित पाणी प्रवाहित हाेण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. एमआयडीसीकडून हे प्रदूषित व विषारी पाणी येण्याची शक्यता आहे. प्रदूषित पाण्यामुळे मासे मृत्यू हाेण्याचीही शक्यता असू शकते.

अंबाझरी तलावात मासे का मरताहेत यावर सर्वेक्षण हाेण्याची गरज आहे. माशांचे पाेस्टमार्टम केल्यानंतरच उष्णतेमुळे, ऑक्सिजन कमतरतेमुळे की प्रदूषणामुळे मासे मरताहेत, याबाबत खुलासा हाेऊ शकेल. मात्र सध्यातरी ही गंभीर घटना म्हणावी लागेल.

- काैस्तुभ चटर्जी, ग्रीन व्हिजिल