शहरं
Join us  
Trending Stories
1
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
4
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
6
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
7
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
8
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
9
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
10
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
11
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
12
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
13
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
14
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
15
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
16
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
17
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
18
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
19
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
20
Khushbu Saroj : अभिमानास्पद! मित्रांनी वडिलांची उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवतेय फुटबॉलचं मैदान

अंबाझरी तलावात तरंगताे आहे मृत माशांचा खच ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:07 IST

नागपूर : अंबाझरी तलावातील माशांचा मृत्यू अचानक वाढला आहे. माेठ्या संख्येने माशांचा खच तलावातील पाण्यावर तरंगताना दिसताे आहे. त्यामुळे ...

नागपूर : अंबाझरी तलावातील माशांचा मृत्यू अचानक वाढला आहे. माेठ्या संख्येने माशांचा खच तलावातील पाण्यावर तरंगताना दिसताे आहे. त्यामुळे आश्चर्य आणि चिंताही व्यक्त केली जात आहे. मात्र या माशांचा अचानक मृत्यू का हाेत आहे, याबाबत महापालिका किंवा कुठल्याही जबाबदार यंत्रणेचे लक्ष गेलेले दिसत नाही.

बुधवारी अचानक मृत माशांचा खच तलावाच्या पाण्यावर ठिकठिकणी तरंगताना आढळून आला. अचानक मासे का मरताहेत, हा प्रश्न निर्माण हाेत आहे. ग्रीन व्हिजिलचे संस्थापक काैस्तुभ चटर्जी यांनी तलावात घडणाऱ्या घडामाेडींवर प्रकाश टाकला व मासे मरण्याच्या काही शक्यता नाेंदविल्या.

- नागपुरातील बहुतेक तलावांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण घटलेले आहे. शहरातील तलावात कृत्रितपणे ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी फवारे किंवा कुठलीच यंत्रणा नाही. ऑक्सिजन कमी झाल्याने मासे व इतर जलचर प्राण्यांना अडचण येते.

- थंड पाण्यात डिसाॅल्व‌ड ऑक्सिजनचे प्रमाण अधिक असते. मात्र उन्हाळ्यात तापमान वाढल्याने पाण्याचेही तापमान वाढते आणि उष्ण पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण घटते. माशांच्या मृत्यूचे हेही एक कारण असण्याची शक्यता चटर्जी यांनी व्यक्त केली.

- दिवसा सूर्यप्रकाशाच्या मदतीने तलावातील वनस्पती ऑक्सिजन तयार करतात. त्याचा फायदा माशांना हाेताे. मात्र रात्री फाेटाेसिन्थेसिसची प्रक्रिया बंद हाेते व ऑक्सिजन निर्मितीही थांबते. दुसरीकडे जलकुंभीसारख्या परावलंबी वनस्पती माेठ्या प्रमाणात ऑक्सिजन ग्रहण करीत असल्याने माशांना ते पुरेसा प्रमाणात मिळत नाही.

- उन्हाळ्यातील उष्णतेमुळे तलावाच्या पाण्याचा वरचा स्तर गरम हाेताे. त्याखालचा कमी थंड तर आणखी खालचा थर अधिक थंड असताे. तळातील ऑक्सिजन घटल्याने मासे त्यासाठी वरच्या थरापर्यंत येतात आणि उष्ण पाणी सहन न झाल्याने त्यांचा मृत्यू हाेण्याची शक्यता असते.

- मासेमारी हेही एक कारण असू शकते. मासेमार अधिक मासे मिळावे म्हणून तलावात मासे व खाद्य टाकतात. यामुळे माशांची संख्या क्षमतेपेक्षा वाढते. त्यामुळे खाद्यपदार्थ व ऑक्सिजनसाठी माशांमध्ये संघर्ष वाढताे व त्यात कमजाेर माशांचा मृत्यू हाेताे. मासे मृत्यूचे हेही एक कारण असू शकते.

- तलावामध्ये कुठूनतरी प्रदूषित पाणी प्रवाहित हाेण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. एमआयडीसीकडून हे प्रदूषित व विषारी पाणी येण्याची शक्यता आहे. प्रदूषित पाण्यामुळे मासे मृत्यू हाेण्याचीही शक्यता असू शकते.

अंबाझरी तलावात मासे का मरताहेत यावर सर्वेक्षण हाेण्याची गरज आहे. माशांचे पाेस्टमार्टम केल्यानंतरच उष्णतेमुळे, ऑक्सिजन कमतरतेमुळे की प्रदूषणामुळे मासे मरताहेत, याबाबत खुलासा हाेऊ शकेल. मात्र सध्यातरी ही गंभीर घटना म्हणावी लागेल.

- काैस्तुभ चटर्जी, ग्रीन व्हिजिल