शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

‘डीबीटी’वर होणार सरकारची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 01:01 IST

थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रक्रियेची गाडी मंत्रालयात बंद पडल्याने राज्यातील शेकडो मागासवर्गीय विद्यार्थी संकटात सापडले आहेत.

ठळक मुद्देआॅनलाईन धोरणात अडकली शेकडो विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती : नागपुरात संस्थाचालकांची रणनीती

जितेंद्र ढवळे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रक्रियेची गाडी मंत्रालयात बंद पडल्याने राज्यातील शेकडो मागासवर्गीय विद्यार्थी संकटात सापडले आहेत. नोव्हेंबर उजाडला असला तरी एकाही विद्यार्थ्याला शिष्यवृत्तीचा छदामही मिळालेला नाही. मंत्रालयात यावर कुणीही बोलायला तयार नाही. त्यामुळे वैतागलेल्या संस्थाचालकांनी सरकारच्या ‘डीबीटी’ प्रक्रियेविरुद्ध एल्गार करण्याचा निर्धार केला आहे.या पार्श्वभूमीवर मंथन करण्यासाठी नागपूर विभागातील विना अनुदानित अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक, फार्मसी, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालये संचालित करणाºया संस्थांच्या अध्यक्ष आणि सचिवांची महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी (दि.४ नोव्हेंबर) नागपुरात होऊ घातली आहे.तीत सरकारच्या ‘डीबीटी’ धोरणांचा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना बसत असलेला फटका. यामुळे महाविद्यालयांची होत असलेली आर्थिक कोंडी यावर चर्चा होईल. सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी समाज कल्याण विभागावर मोर्चा काढणे, हायकोर्टात याचिका दाखल करणे आणि डिसेंबरमध्ये नागपुरात होऊ घातलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर विद्यार्थी, शिक्षक आणि संस्थालकांचा दमदार मोर्चा काढण्यासंदर्भातही चर्चा होईल. राज्य शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र शिष्यवृत्ती वाटपातपारदर्शकता आणणाºया या योजनेचा ढोल सरकारने पिटला असला तरी ‘डीबीटी’ मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे. शिष्यवृत्ती कधी मिळेल या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर कोणतेही उत्तर नसल्याने शैक्षणिक संस्थांचे संचालक आणि महाविद्यालयाचे प्राचार्य वैतागले आहेत. ही योजना राबविण्यात येणाºया अडचणी विचारात घेता यंदा एकाही विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळेल की नाही, याची हमी कुणीही घेण्यास तयार नाही. त्यामुळे २७ सप्टेंबर रोजी झालेल्या संस्थाचालकांच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात निवेदन देण्याचे निश्चित झाले होते. मात्र मुख्यमंत्री आणि संस्थाचलकांच्या भेटीचा योग अद्यापही आलेला नाही.विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नसल्याने, ट्युशन फीचे पाच पैसे महाविद्यालयाला मिळाले नसल्याने सर्व विनाअनुदानित महाविद्यालयांचे काम बंद पडले आहे.सहा महिन्यांपासून वेतन नसल्याने बहुतांश महाविद्यालयातील तासिका पद्धतीवरील प्राध्यापकांची संख्या रोडावली आहे.गत वर्षी नागपूर जिल्ह्यात महाविद्यालयीन स्तरावर विविध अभ्यासक्रमातील १ लाख ५४ हजार विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले मात्र अद्यापही यातील ६४ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही. यात अभियांत्रिकी शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.यंदा तर ‘डीबीटी’ पोर्टल बंद असल्याने शासनाच्या विविध विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाºया शिष्यवृत्तीचा लाभ एकाही विद्यार्थ्याला मिळालेला नाही तर अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करता आले नाही.