शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

‘डीबीटी’वर होणार सरकारची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 01:01 IST

थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रक्रियेची गाडी मंत्रालयात बंद पडल्याने राज्यातील शेकडो मागासवर्गीय विद्यार्थी संकटात सापडले आहेत.

ठळक मुद्देआॅनलाईन धोरणात अडकली शेकडो विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती : नागपुरात संस्थाचालकांची रणनीती

जितेंद्र ढवळे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रक्रियेची गाडी मंत्रालयात बंद पडल्याने राज्यातील शेकडो मागासवर्गीय विद्यार्थी संकटात सापडले आहेत. नोव्हेंबर उजाडला असला तरी एकाही विद्यार्थ्याला शिष्यवृत्तीचा छदामही मिळालेला नाही. मंत्रालयात यावर कुणीही बोलायला तयार नाही. त्यामुळे वैतागलेल्या संस्थाचालकांनी सरकारच्या ‘डीबीटी’ प्रक्रियेविरुद्ध एल्गार करण्याचा निर्धार केला आहे.या पार्श्वभूमीवर मंथन करण्यासाठी नागपूर विभागातील विना अनुदानित अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक, फार्मसी, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालये संचालित करणाºया संस्थांच्या अध्यक्ष आणि सचिवांची महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी (दि.४ नोव्हेंबर) नागपुरात होऊ घातली आहे.तीत सरकारच्या ‘डीबीटी’ धोरणांचा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना बसत असलेला फटका. यामुळे महाविद्यालयांची होत असलेली आर्थिक कोंडी यावर चर्चा होईल. सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी समाज कल्याण विभागावर मोर्चा काढणे, हायकोर्टात याचिका दाखल करणे आणि डिसेंबरमध्ये नागपुरात होऊ घातलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर विद्यार्थी, शिक्षक आणि संस्थालकांचा दमदार मोर्चा काढण्यासंदर्भातही चर्चा होईल. राज्य शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र शिष्यवृत्ती वाटपातपारदर्शकता आणणाºया या योजनेचा ढोल सरकारने पिटला असला तरी ‘डीबीटी’ मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे. शिष्यवृत्ती कधी मिळेल या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर कोणतेही उत्तर नसल्याने शैक्षणिक संस्थांचे संचालक आणि महाविद्यालयाचे प्राचार्य वैतागले आहेत. ही योजना राबविण्यात येणाºया अडचणी विचारात घेता यंदा एकाही विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळेल की नाही, याची हमी कुणीही घेण्यास तयार नाही. त्यामुळे २७ सप्टेंबर रोजी झालेल्या संस्थाचालकांच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात निवेदन देण्याचे निश्चित झाले होते. मात्र मुख्यमंत्री आणि संस्थाचलकांच्या भेटीचा योग अद्यापही आलेला नाही.विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नसल्याने, ट्युशन फीचे पाच पैसे महाविद्यालयाला मिळाले नसल्याने सर्व विनाअनुदानित महाविद्यालयांचे काम बंद पडले आहे.सहा महिन्यांपासून वेतन नसल्याने बहुतांश महाविद्यालयातील तासिका पद्धतीवरील प्राध्यापकांची संख्या रोडावली आहे.गत वर्षी नागपूर जिल्ह्यात महाविद्यालयीन स्तरावर विविध अभ्यासक्रमातील १ लाख ५४ हजार विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले मात्र अद्यापही यातील ६४ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही. यात अभियांत्रिकी शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.यंदा तर ‘डीबीटी’ पोर्टल बंद असल्याने शासनाच्या विविध विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाºया शिष्यवृत्तीचा लाभ एकाही विद्यार्थ्याला मिळालेला नाही तर अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करता आले नाही.