शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

दाऊद पाकिस्तानात नाहीच तर देणार कुठून?

By admin | Updated: June 5, 2016 02:51 IST

भारताचा मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कुठे आहे, याबाबत आपल्याला काहीच माहिती नाही.

पाक उच्चायुक्त अब्दुल बासित : शांती युद्धाने नव्हे तर चर्चेने शक्यनागपूर : भारताचा मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कुठे आहे, याबाबत आपल्याला काहीच माहिती नाही. जी व्यक्ती पाकिस्तानातच नाही, त्या व्यक्तीला भारताच्या स्वाधीन करणे किंवा न करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही, असे पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी म्हटले आहे. नागपूर श्रमिक पत्रकार संघ आणि टिळक पत्रकार भवन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने टिळक पत्रकार भवन येथे शनिवारी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेदरम्यान एका प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते. बासित यांनी सांगितले, पाकिस्तानचे उच्चायुक्त म्हणून भारत आणि पाकिस्तान यांच्यात चांगले संबंध प्रस्थापित व्हावे, असाच आपला मुख्य प्रयत्न राहील. याबाबत आपण आशावादी आहोत. दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानात ‘कंट्री व्हिजा’ देण्याबाबतची अपेक्षा व्यक्त करीत दोन्ही देशांमध्ये शांतता ही युद्धामुळे येणार नसून ती सार्थक चर्चेनंतरच शक्य आहे. भारत जेव्हा योग्य समजेल तेव्हा चर्चेचे सत्र पुढे चालू शकेल. परंतु यात कुठलीही अट किंवा लिंकेजेस असू नयेत. येणाऱ्या पिढीला सुद्धा हेच हवे आहे की, पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संबंध चांगले असावे. याला सार्थक करण्याची जबाबदारी आपली असल्याचेही त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी) क्रिकेट डिप्लोमसीने प्रश्न सुटणार नाही क्रिकेट डिप्लोमसीचे स्वत:चे एक वेगळे महत्त्व आहे. परंतु त्याच्या काही मर्यादाही आहेत. क्रिकेटमुळे दोन्ही देशातील प्रश्न सुटू शकणार नाही. यामुळे वातावरण चांगले होऊ शकते, परंतु ते फार काळ टिकून राहू शकत नाही. दहशतवादामुळे सर्वाधिक त्रास पाकिस्तानलाच सोसावा लागला आहे. आम्ही मागील ३५ वर्षांपासून दहशतवाद संपवण्याचा प्रयत्न करीत आहोत. मागील दोन वर्षात यशही मिळाले आहे. परंतु अजूनही खूप करायचे आहे. नागरिकही आता दहशतवादाच्या विरोधात उभे होत आहेत. अशा परिस्थितीत हळूहळू दहशतवाद मिटविण्यास यश मिळणे निश्चित आहे, असेही ते म्हणाले. हल्ल्याच्या वक्तव्यावर चर्चेची गरज नाहीरावळपिंडी येथून मिसाईलने दिल्लीवर पाच मिनिटात हल्ला करता येऊ शकतो, पाकिस्तानचे अणुशास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कादीर खान यांनी केलेल्या या वक्तव्यसंदर्भात पाक उच्चायुक्त बासित म्हणाले, डॉ. अब्दुल कादीर हे कुठल्याही शासकीय पदावर नाही. त्यामुळे ते त्यांचे व्यक्तिगत मत आहे. त्यांच्या वक्तव्यावर सार्वजनिक चर्चा करण्याची गरज नाही.