शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

दत्तोपंत ठेंगडी जन्मशताब्दी महोत्सव १० नोव्हेंबरपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 22:29 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, भारतीय मजदूर संघ, किसान संघ व स्वदेशी जागरण मंचचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाला येत्या १० नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.

ठळक मुद्देमोहन भागवत, सुमित्रा महाजन करणार उद्घाटन : चित्रप्रदर्शन व माहितीपटाचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, भारतीय मजदूर संघ, किसान संघ व स्वदेशी जागरण मंचचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाला येत्या १० नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या उपस्थितीत या महोत्सवाचे उद्टन होणार असल्याची माहिती भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय महामंत्री विरजेश उपाध्याय यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.दत्तोपंत ठेंगडी जन्मशताब्दी समारोह समितीतर्फे घेण्यात येणार हा महोत्सव वर्षभर चालणार आहे. रविवारी डॉ. हेडगेवार स्मारक भवन, रेशीमबाग येथे दुपारी ३ वाजता महोत्सवाचे रीतसर उद्घाटन होणार असल्याचे उपाध्याय यांनी सांगितले. तत्पूर्वी दत्तोपंत ठेंगडी यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे चित्र प्रदर्शन आणि साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. शिवाय त्यांच्यावर तयार केलेल्या माहितीपटाचेही लोकार्पण केले जाणार आहे. समारोह समितीचे सदस्य, संघाचे पदाधिकारी, आयोजक संघटनांचे केंद्रीय पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमधून शेतकरी, शेतमजूर, कामगार व विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. भामस, भारतीय किसान संघ व स्वदेशी जागरण मंचच्या संयुक्त विद्यमाने यानंतर वर्षभर विविध कार्यक्रम घेण्यात येणार असून नवी दिल्ली येथे महोत्सवाचा समारोप होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेत किसान संघाचे संघटन मंत्री दिनेश कुळकर्णी, स्वदेशी जागरण मंचचे प्रकाश सोवनी, सुधाकर कुळकर्णी आदी उपस्थित होते.अर्थव्यवस्थेची रचनाच चुकीचीदेशाच्या अर्थव्यवस्थेला आलेली अवकळा सरकारमुळे नाही तर रचनेमुळेच आली असल्याची टीका विरजेश उपाध्याय यांनी केली. अर्थव्यवस्थेचे संकट अचानक किंवा कोणत्या सरकारमुळे आलेले नाही. स्वातंत्र्यानंतर स्वीकारण्यात आलेले अर्थव्यवस्थेचे धोरणच चुकीचे होते. ही व्यवस्था कार्पोरेट क्षेत्राला केंद्रीत ठेवून कार्य करणारी आहे. ती देशहिताची नाही. त्यामुळे चढ उतार होउन आजची परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगात अर्थव्यवस्था कामगार व सामान्य माणूस केंद्रीत असावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घेतलेला बँकांच्या राष्ट्रियीकरणाचा निर्णयही चुकीचा असल्याचे उपाध्याय म्हणाले. ते बँकांचे राष्ट्रियीकरण नाही तर सरकारीकरण होते, अशी टीका त्यांनी केली.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतSumitra Mahajanसुमित्रा महाजन