शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

उमरेड तालुक्यातील २५ गावात पथदिव्याखाली अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : पथदिव्यांची वीज बिल रक्कम थकीत असल्याच्या कारणावरून विद्युत विभागाने तालुक्यातील २५ पेक्षा अधिक गावांची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : पथदिव्यांची वीज बिल रक्कम थकीत असल्याच्या कारणावरून विद्युत विभागाने तालुक्यातील २५ पेक्षा अधिक गावांची बत्ती गुल केली. गावातील पथदिवेच बंद पडल्याने सुमारे २५ गावांमध्ये आता ‘पथदिव्याखाली अंधार’ पसरला आहे. या कारणावरून शुक्रवारी सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी विद्युत कार्यालय गाठत भावना व्यक्त केल्या. आम्ही लोकप्रतिनिधींकडे अनेकदा गावकऱ्यांची समस्या मांडली; परंतु या समस्येला केराची टोपली दाखविण्यात आली, असाही आरोप यावेळी केला गेला.

सध्या सर्वत्र चोरीच्या घटना घडत आहेत. थकीत बिलाचा भरणा करण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून निधी मंजूर करावा, अशी विनंती केली आहे तेव्हा ग्रामपंचायतींना महिनाभराची मुदत द्या, अशी मागणी यावेळी सरपंचांनी केली. आधी वीज बिल भरा मगच वीज सुरू होईल, असे उत्तर वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिले. यावेळी हजारो लोकांना मुद्दाम वेठीस धरले जात असल्याचा आरोप सरपंच संघटनेचे अध्यक्ष अश्विन उके यांनी केला.

कोरोनामुळे अनेकांनी कराचा भरणा केला नाही. ग्रामपंचायत स्वनिधीच्या माध्यमातून ही रक्कम भरल्यास ‘कर’ स्वरूपात गावकऱ्यावर भुर्दंड बसेल, अशीही बाजू यावेळी मांडण्यात आली. कलांद्री बोरगाव, चांपा, दहेगाव, सेव, आंबोली, पिराया, मटकाझरी, पाचगाव, गोधनी, विरली, गावसूत, चनोडा, नांदरा, चिखलधोकडा, मसाळा, बारव्हा, सावंगी खुर्द, बेलपेठ, बोरीमजरा, आमघाट, पेंडकापार, वडगाव, किन्हाळा आदी गावांमधील पथदिव्याची वीज कापल्या गेल्याने गावकरी चांगलेच संतापले आहेत. ही समस्या न सुटल्यास तालुका, जिल्हा स्तरावर आंदोलन करू, असा इशारा सरपंच, सदस्य आणि गावकऱ्यांनी दिला आहे. याप्रसंगी अश्विन उके, शिवदास कुकडकर, अनिल दांडेकर, विलास दरणे, राजकुमार राऊत, महेश मरगडे, मधुकर सातपुते, राजेश हजारे, माया धोपटे, कृष्णा पन्नासे, जीजाबाई छापेकर, रेखा गजघाटे, योगीता मानकर आदींची उपस्थिती होती. विद्युत विभागाशी संपर्क साधला असता, सुमारे २५ लाख रुपयांची थकबाकी असल्याची माहिती मिळाली.

-----

आराखडा मंजूर करा

पथदिव्याचे बिल पंधराव्या वित्त आयोगातून भरा, असे आदेश आहेत. असे असले तरी जोपर्यंत आराखडा मंजूर केला जात नाही, तोपर्यंत ही रक्कम वळती होऊ शकत नाही. यामुळे दोन आठवड्यांपूर्वी उमरेड तालुक्यातील सरपंचांनी आराखडा मंजूर करण्याबाबतचे निवेदन पंचायत समितीकडे सोपविले आहे.