शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

काळे ढग, अनुकूल वातावरण, तरीही पावसाला जाेर नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2023 21:04 IST

Nagpur News नागपुरात शनिवारीही सकाळपासून दिवसभर आकाशात काळे ढग जमा झाले हाेते. पण हलक्या रिमझिमशिवाय काहीच झाले नाही. या स्थितीमुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचीही चिंता वाढणार आहे.

नागपूर : आकाशात काळ्या ढगांची गर्दी, पावसासाठी अनुकूल असे आर्द्रतायुक्त वातावरण असूनही अपेक्षेप्रमाणे मुसळधार पावसाने अद्यापही हजेरी लावली नाही. नागपुरात शनिवारीही सकाळपासून दिवसभर आकाशात काळे ढग जमा झाले हाेते. पण हलक्या रिमझिमशिवाय काहीच झाले नाही. या स्थितीमुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचीही चिंता वाढणार आहे.

यंदा पावसाळा सुरू झाल्यापासून सातत्याने पावसाच्या लहरीपणाचा अनुभव नागरिकांना येत आहे. जुलैचा दुसरा आठवडा सुरू झाल्यानंतरही या महिन्याला साजेसा पाऊस अद्याप पडलाच नाही. शनिवारीही तीच अवस्था हाेती. शुक्रवारी रात्री विदर्भात ब्रम्हपुरी ३४ मि.मी., चंद्रपूर २७.८ मि.मी., गाेंदिया २२.४ मि.मी. व यवतमाळात २२.२ मि.मी. एवढी हजेरी लावली. नागपुरात केवळ ७.६ मि.मी. पावसाची नाेंद झाली. जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात केवळ ५२.७ मि.मी. अशा चांगल्या पावसाची नाेंद झाली. मात्र शनिवारी पुन्हा हुलकावणी दिली. सकाळपासून आकाश काळ्या ढगांनी व्यापले हाेते व हलकी रिमझिमही सुरू झाली हाेती. मात्र, हळूहळू जाेर ओसरून पाऊस बंद झाला. सायंकाळपासूनही अशीच रिमझिम हाेत किरकाेळ हजेरी लावली. गाेंदिया ११ मि.मी. वगळता कुठेही माेजण्याइतकाही पाऊस झाला नाही. केवळ पारा कमी हाेऊन उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला.

विशेष म्हणजे हवामान खात्याने २ ते ८ जुलैपर्यंत विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा दिला हाेता. मात्र, यवतमाळमध्ये एका रात्री झालेल्या १४६ मि.मी. पावसाव्यतिरिक्त कुठेही पुरेसा पाऊस झाला नाही. भंडारा व गाेंदियात जुलैच्या सुरुवातीला धुवांधार पाऊस झाल्याने येथील तुट भरून निघाली आहे. या जिल्ह्यातही काही तालुके काेरडेच आहेत. नागपूरसह इतर सर्व जिल्ह्यात पावसाची तूट ३० ते ५५ टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

यात आणखी चिंताजनक म्हणजे रविवारपासून विदर्भात तुरळक ठिकाणी किरकाेळ पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमाेर शेतीचे व दुबार पेरणीचे संकट आणि शहरातील नागरिकांसमाेर पाणीटंचाईचे संकट निर्माण हाेण्याची धाेकादायक शक्यताच निर्माण झाली आहे.

सध्या जाेरदार पावसासाठी सर्व प्रणाल्या अनुकूल आहेत. मात्र, काेकण व घाट वगळता कुठेही पावसाला जाेर नाही. १२ जुलैपर्यंत पावसाची तीव्रता अजून कमी हाेण्याची शक्यता आहे. १५ जुलैनंतर पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाने तूट भरून निघणार असेल तरीही पावसाची असमान विसंगती खरिपातील शेतपीक नियोजनास कुचकामी व धोकादायक ठरू शकते. हा ‘एल-निनाे’ चा प्रभाव आणि आयओडी असक्रिय असण्याचे कारणच म्हणावे लागेल. वातावरणाची ही जटिलता वैज्ञानिकांसाठी आव्हान आहे.

- माणिकराव खुळे, निवृत्त हवामान अधिकारी

टॅग्स :Rainपाऊस