शहरं
Join us  
Trending Stories
1
"आत्ता कुठे सुरुवात...!" वक्फ कायद्यानंतर पुढे काय? भाजपनं व्हिडिओ शेअर करत स्पष्टच सांगितलं
2
"हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करता अन् इंग्रजीचे मात्र गोडवे गाता"; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
3
IPL Playoff Scenario: पांड्याच्या MI ला 'चौकार' पुरेसा; धोनीच्या CSK समोर 'सिक्सर' मारण्याचं चॅलेंज
4
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
5
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
6
MI विरुद्धच्या पराभवानंतर MS धोनीनं सांगून टाकला Playoffs च्या पुढचा प्लॅन; म्हणाला...
7
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
8
61 पैशांच्या शेअरवर तुटून पडले लोक, सातत्याने लागतंय अप्पर सर्किट; कंपनी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
9
IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी!
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
11
आता काय बाउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड' (VIDEO)
12
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
13
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
14
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
15
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
16
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
17
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
18
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
19
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
20
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?

काळे ढग, अनुकूल वातावरण, तरीही पावसाला जाेर नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2023 21:04 IST

Nagpur News नागपुरात शनिवारीही सकाळपासून दिवसभर आकाशात काळे ढग जमा झाले हाेते. पण हलक्या रिमझिमशिवाय काहीच झाले नाही. या स्थितीमुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचीही चिंता वाढणार आहे.

नागपूर : आकाशात काळ्या ढगांची गर्दी, पावसासाठी अनुकूल असे आर्द्रतायुक्त वातावरण असूनही अपेक्षेप्रमाणे मुसळधार पावसाने अद्यापही हजेरी लावली नाही. नागपुरात शनिवारीही सकाळपासून दिवसभर आकाशात काळे ढग जमा झाले हाेते. पण हलक्या रिमझिमशिवाय काहीच झाले नाही. या स्थितीमुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचीही चिंता वाढणार आहे.

यंदा पावसाळा सुरू झाल्यापासून सातत्याने पावसाच्या लहरीपणाचा अनुभव नागरिकांना येत आहे. जुलैचा दुसरा आठवडा सुरू झाल्यानंतरही या महिन्याला साजेसा पाऊस अद्याप पडलाच नाही. शनिवारीही तीच अवस्था हाेती. शुक्रवारी रात्री विदर्भात ब्रम्हपुरी ३४ मि.मी., चंद्रपूर २७.८ मि.मी., गाेंदिया २२.४ मि.मी. व यवतमाळात २२.२ मि.मी. एवढी हजेरी लावली. नागपुरात केवळ ७.६ मि.मी. पावसाची नाेंद झाली. जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात केवळ ५२.७ मि.मी. अशा चांगल्या पावसाची नाेंद झाली. मात्र शनिवारी पुन्हा हुलकावणी दिली. सकाळपासून आकाश काळ्या ढगांनी व्यापले हाेते व हलकी रिमझिमही सुरू झाली हाेती. मात्र, हळूहळू जाेर ओसरून पाऊस बंद झाला. सायंकाळपासूनही अशीच रिमझिम हाेत किरकाेळ हजेरी लावली. गाेंदिया ११ मि.मी. वगळता कुठेही माेजण्याइतकाही पाऊस झाला नाही. केवळ पारा कमी हाेऊन उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला.

विशेष म्हणजे हवामान खात्याने २ ते ८ जुलैपर्यंत विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा दिला हाेता. मात्र, यवतमाळमध्ये एका रात्री झालेल्या १४६ मि.मी. पावसाव्यतिरिक्त कुठेही पुरेसा पाऊस झाला नाही. भंडारा व गाेंदियात जुलैच्या सुरुवातीला धुवांधार पाऊस झाल्याने येथील तुट भरून निघाली आहे. या जिल्ह्यातही काही तालुके काेरडेच आहेत. नागपूरसह इतर सर्व जिल्ह्यात पावसाची तूट ३० ते ५५ टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

यात आणखी चिंताजनक म्हणजे रविवारपासून विदर्भात तुरळक ठिकाणी किरकाेळ पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमाेर शेतीचे व दुबार पेरणीचे संकट आणि शहरातील नागरिकांसमाेर पाणीटंचाईचे संकट निर्माण हाेण्याची धाेकादायक शक्यताच निर्माण झाली आहे.

सध्या जाेरदार पावसासाठी सर्व प्रणाल्या अनुकूल आहेत. मात्र, काेकण व घाट वगळता कुठेही पावसाला जाेर नाही. १२ जुलैपर्यंत पावसाची तीव्रता अजून कमी हाेण्याची शक्यता आहे. १५ जुलैनंतर पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाने तूट भरून निघणार असेल तरीही पावसाची असमान विसंगती खरिपातील शेतपीक नियोजनास कुचकामी व धोकादायक ठरू शकते. हा ‘एल-निनाे’ चा प्रभाव आणि आयओडी असक्रिय असण्याचे कारणच म्हणावे लागेल. वातावरणाची ही जटिलता वैज्ञानिकांसाठी आव्हान आहे.

- माणिकराव खुळे, निवृत्त हवामान अधिकारी

टॅग्स :Rainपाऊस