शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

काळे ढग, अनुकूल वातावरण, तरीही पावसाला जाेर नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2023 21:04 IST

Nagpur News नागपुरात शनिवारीही सकाळपासून दिवसभर आकाशात काळे ढग जमा झाले हाेते. पण हलक्या रिमझिमशिवाय काहीच झाले नाही. या स्थितीमुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचीही चिंता वाढणार आहे.

नागपूर : आकाशात काळ्या ढगांची गर्दी, पावसासाठी अनुकूल असे आर्द्रतायुक्त वातावरण असूनही अपेक्षेप्रमाणे मुसळधार पावसाने अद्यापही हजेरी लावली नाही. नागपुरात शनिवारीही सकाळपासून दिवसभर आकाशात काळे ढग जमा झाले हाेते. पण हलक्या रिमझिमशिवाय काहीच झाले नाही. या स्थितीमुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचीही चिंता वाढणार आहे.

यंदा पावसाळा सुरू झाल्यापासून सातत्याने पावसाच्या लहरीपणाचा अनुभव नागरिकांना येत आहे. जुलैचा दुसरा आठवडा सुरू झाल्यानंतरही या महिन्याला साजेसा पाऊस अद्याप पडलाच नाही. शनिवारीही तीच अवस्था हाेती. शुक्रवारी रात्री विदर्भात ब्रम्हपुरी ३४ मि.मी., चंद्रपूर २७.८ मि.मी., गाेंदिया २२.४ मि.मी. व यवतमाळात २२.२ मि.मी. एवढी हजेरी लावली. नागपुरात केवळ ७.६ मि.मी. पावसाची नाेंद झाली. जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात केवळ ५२.७ मि.मी. अशा चांगल्या पावसाची नाेंद झाली. मात्र शनिवारी पुन्हा हुलकावणी दिली. सकाळपासून आकाश काळ्या ढगांनी व्यापले हाेते व हलकी रिमझिमही सुरू झाली हाेती. मात्र, हळूहळू जाेर ओसरून पाऊस बंद झाला. सायंकाळपासूनही अशीच रिमझिम हाेत किरकाेळ हजेरी लावली. गाेंदिया ११ मि.मी. वगळता कुठेही माेजण्याइतकाही पाऊस झाला नाही. केवळ पारा कमी हाेऊन उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला.

विशेष म्हणजे हवामान खात्याने २ ते ८ जुलैपर्यंत विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा दिला हाेता. मात्र, यवतमाळमध्ये एका रात्री झालेल्या १४६ मि.मी. पावसाव्यतिरिक्त कुठेही पुरेसा पाऊस झाला नाही. भंडारा व गाेंदियात जुलैच्या सुरुवातीला धुवांधार पाऊस झाल्याने येथील तुट भरून निघाली आहे. या जिल्ह्यातही काही तालुके काेरडेच आहेत. नागपूरसह इतर सर्व जिल्ह्यात पावसाची तूट ३० ते ५५ टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

यात आणखी चिंताजनक म्हणजे रविवारपासून विदर्भात तुरळक ठिकाणी किरकाेळ पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमाेर शेतीचे व दुबार पेरणीचे संकट आणि शहरातील नागरिकांसमाेर पाणीटंचाईचे संकट निर्माण हाेण्याची धाेकादायक शक्यताच निर्माण झाली आहे.

सध्या जाेरदार पावसासाठी सर्व प्रणाल्या अनुकूल आहेत. मात्र, काेकण व घाट वगळता कुठेही पावसाला जाेर नाही. १२ जुलैपर्यंत पावसाची तीव्रता अजून कमी हाेण्याची शक्यता आहे. १५ जुलैनंतर पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाने तूट भरून निघणार असेल तरीही पावसाची असमान विसंगती खरिपातील शेतपीक नियोजनास कुचकामी व धोकादायक ठरू शकते. हा ‘एल-निनाे’ चा प्रभाव आणि आयओडी असक्रिय असण्याचे कारणच म्हणावे लागेल. वातावरणाची ही जटिलता वैज्ञानिकांसाठी आव्हान आहे.

- माणिकराव खुळे, निवृत्त हवामान अधिकारी

टॅग्स :Rainपाऊस