शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

काळे ढग, अनुकूल वातावरण, तरीही पावसाला जाेर नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2023 21:04 IST

Nagpur News नागपुरात शनिवारीही सकाळपासून दिवसभर आकाशात काळे ढग जमा झाले हाेते. पण हलक्या रिमझिमशिवाय काहीच झाले नाही. या स्थितीमुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचीही चिंता वाढणार आहे.

नागपूर : आकाशात काळ्या ढगांची गर्दी, पावसासाठी अनुकूल असे आर्द्रतायुक्त वातावरण असूनही अपेक्षेप्रमाणे मुसळधार पावसाने अद्यापही हजेरी लावली नाही. नागपुरात शनिवारीही सकाळपासून दिवसभर आकाशात काळे ढग जमा झाले हाेते. पण हलक्या रिमझिमशिवाय काहीच झाले नाही. या स्थितीमुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचीही चिंता वाढणार आहे.

यंदा पावसाळा सुरू झाल्यापासून सातत्याने पावसाच्या लहरीपणाचा अनुभव नागरिकांना येत आहे. जुलैचा दुसरा आठवडा सुरू झाल्यानंतरही या महिन्याला साजेसा पाऊस अद्याप पडलाच नाही. शनिवारीही तीच अवस्था हाेती. शुक्रवारी रात्री विदर्भात ब्रम्हपुरी ३४ मि.मी., चंद्रपूर २७.८ मि.मी., गाेंदिया २२.४ मि.मी. व यवतमाळात २२.२ मि.मी. एवढी हजेरी लावली. नागपुरात केवळ ७.६ मि.मी. पावसाची नाेंद झाली. जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात केवळ ५२.७ मि.मी. अशा चांगल्या पावसाची नाेंद झाली. मात्र शनिवारी पुन्हा हुलकावणी दिली. सकाळपासून आकाश काळ्या ढगांनी व्यापले हाेते व हलकी रिमझिमही सुरू झाली हाेती. मात्र, हळूहळू जाेर ओसरून पाऊस बंद झाला. सायंकाळपासूनही अशीच रिमझिम हाेत किरकाेळ हजेरी लावली. गाेंदिया ११ मि.मी. वगळता कुठेही माेजण्याइतकाही पाऊस झाला नाही. केवळ पारा कमी हाेऊन उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला.

विशेष म्हणजे हवामान खात्याने २ ते ८ जुलैपर्यंत विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा दिला हाेता. मात्र, यवतमाळमध्ये एका रात्री झालेल्या १४६ मि.मी. पावसाव्यतिरिक्त कुठेही पुरेसा पाऊस झाला नाही. भंडारा व गाेंदियात जुलैच्या सुरुवातीला धुवांधार पाऊस झाल्याने येथील तुट भरून निघाली आहे. या जिल्ह्यातही काही तालुके काेरडेच आहेत. नागपूरसह इतर सर्व जिल्ह्यात पावसाची तूट ३० ते ५५ टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

यात आणखी चिंताजनक म्हणजे रविवारपासून विदर्भात तुरळक ठिकाणी किरकाेळ पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमाेर शेतीचे व दुबार पेरणीचे संकट आणि शहरातील नागरिकांसमाेर पाणीटंचाईचे संकट निर्माण हाेण्याची धाेकादायक शक्यताच निर्माण झाली आहे.

सध्या जाेरदार पावसासाठी सर्व प्रणाल्या अनुकूल आहेत. मात्र, काेकण व घाट वगळता कुठेही पावसाला जाेर नाही. १२ जुलैपर्यंत पावसाची तीव्रता अजून कमी हाेण्याची शक्यता आहे. १५ जुलैनंतर पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाने तूट भरून निघणार असेल तरीही पावसाची असमान विसंगती खरिपातील शेतपीक नियोजनास कुचकामी व धोकादायक ठरू शकते. हा ‘एल-निनाे’ चा प्रभाव आणि आयओडी असक्रिय असण्याचे कारणच म्हणावे लागेल. वातावरणाची ही जटिलता वैज्ञानिकांसाठी आव्हान आहे.

- माणिकराव खुळे, निवृत्त हवामान अधिकारी

टॅग्स :Rainपाऊस