शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

-अन् दप्तराचे ओझे हलके झाले !

By admin | Updated: September 23, 2016 02:54 IST

लाखालाखांचे प्रवेश शुल्क घेऊनही विद्यार्थ्यांच्या पाठीवरील पुस्तकांचे ओझे तसेच कायम ठेवणाऱ्या अनेक पंचतारांकित शाळेसमोर राष्ट्रसेवा विद्यालयाने एक विधायक आदर्श उभा केला आहे.

राष्ट्रसेवा विद्यालयाचा प्रेरणादायी उपक्रम : शासनाचे दप्तरमुक्त अभियान १०० टक्के यशस्वी मंगेश व्यवहारे नागपूरलाखालाखांचे प्रवेश शुल्क घेऊनही विद्यार्थ्यांच्या पाठीवरील पुस्तकांचे ओझे तसेच कायम ठेवणाऱ्या अनेक पंचतारांकित शाळेसमोर राष्ट्रसेवा विद्यालयाने एक विधायक आदर्श उभा केला आहे. विद्यार्थ्यांच्या खांद्यावरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शासनाने जे दप्तरमुक्त अभियान राबविले होते. त्या अभियानाला या शाळेतील शिक्षकवृंदांनी आपल्या विशेष प्रयत्नांनी शंभर टक्के यशस्वी केले आहे. या अभियानाला सुरुवातीला अनेक शाळांकडून प्रतिसादच मिळाला नाही. काही शाळांनी तर शासनाचा हा उपक्रमच चुकीचा असल्याचे सांगितले. एवढेच नाही तर शिक्षण विभागाचे अधिकारीही हा प्रकार थोतांड असल्याची बतावणी करू लागले. त्यामुळे हे अभियानच फेल पडले. परंतु नागपुरातील लालगंज परिसरातील राष्ट्रसेवा विद्यालयाने शासनाचा हा उपक्रम अतिशय यशस्वीपणे राबवून, विद्यार्थ्यांच्या खांद्यावरील ओझे कमी केले. या शाळेचे हे प्रयत्न निश्चितच अभिनंदनीय आहेत.आज पहिल्या वर्गापासूनच शिक्षण व्यापक झाले आहे. पाटी आणि लेखन हा प्रकार मुळातच बंद झाला आहे. त्याची जागा जाड-जाड वह्या व पुस्तकांनी घेतली आहे. त्यामुळे पहिल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन तीन किलोच्या वर भरते. तर दप्तरमुक्त अभियानात पाचव्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन तीन किलोच्या वर नसावे असा शासन निर्णय आहे. २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात हे अभियान शासनाने जोरकसपणे राबविले. शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख हातात काटे घेऊन मुलांच्या दप्तराचे वजन करण्यासाठी शाळोशाळी फिरू लागले. प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या वजनाच्या नोंदी ठेवण्यात येऊ लागल्या. परंतु दप्तराचे वजन काही कमी झाले नाही. काही शाळांनी तर दप्तराचे ओझे कमी करू शकत नसल्यामुळे अधिकाऱ्यांपुढे हातच टेकले. अशा अवस्थेत राष्ट्रसेवा विद्यालयाच्या शिक्षकांनी कल्पकता वापरून हा उपक्रम यशस्वी करून दाखविण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला त्यांनी पालकांच्या बैठका घेऊन अभियानाची माहिती दिली. त्यानंतर वेळापत्रक आखले. प्रत्येक दोन विषयांना त्यांनी एक दिवस दिला. पालकांकडूनही प्रतिसादनागपूर : सुरुवातीला विद्यार्थ्यांना दप्तराविना शाळेत जाणे काहीसे अवघडल्यासारखे वाटू लागले. हळूहळू त्यांना सवय जडली. पाचव्या वर्गाला सहा विषयाचे पुस्तके व तेवढ्याच वह्या लागतात. सोबत दोन स्वाध्यायमाला असतात. जवळपास १४ पुस्तक दप्तरात घेऊन यावे लागत होते. आता विद्यार्थी शाळेत येताना कॅरीबॅग अथवा पिशवीत दोन वह्या व दोन पुस्तके घेऊन येतात, आणि तेवढेच पुस्तके घेऊन जातात. या सत्राची शाळा सुरू झाल्यापासून अतिशय यशस्वीपणे हा उपक्रम सुरू असून त्यात कुठलीही अडचण आलेली नाही. पालकांकडूनही आता चांगला प्रतिसाद मिळतो आहे. नागपुरात लाखो रुपये फी वसूल करून मुलांना शिक्षण देणाऱ्या शाळा आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना तारांकित सोईसवलती दिल्या जातात. त्यामुळे या शाळा सदैव प्रसिद्धीत असतात. अशा वातावरणात लालगंज भागातील राष्ट्रसेवा विद्यालय कुठलाही गाजावाजा न करता शासनाचा एखादा उपक्रम यशस्वी करते, तेव्हा इतर शाळांपुढे त्यांची कल्पकता प्रेरणादायी ठरते. (प्रतिनिधी)