शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

दपूम रेल्वेचे रेल्वेगाड्यात तपासणी अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:08 IST

नागपूर : रेल्वे प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष रेल्वेगाड्यात २ ते ११ जूनदरम्यान १० दिवसाचे तपासणी अभियान राबविले. कोरोनाचा ...

नागपूर : रेल्वे प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष रेल्वेगाड्यात २ ते ११ जूनदरम्यान १० दिवसाचे तपासणी अभियान राबविले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष रेल्वेगाड्यातील पेंट्रीकारमध्ये भोजन तयार करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे प्रवाशांना केवळ पाकिटबंद भोजन उपलब्ध करून देण्याची परवानगी दिली आहे. अभियानात रेल्वेच्या वाणिज्य विभागाचे अधिकारी आणि पर्यवेक्षकांनी विभागातून जाणाऱ्या रेल्वेगाड्यातील पेंट्रीकारमध्ये भोजन तयार करण्यात येत आहे काय? तसेच पाकिटबंद भोजन उपलब्ध आहे की नाही, याची खात्री केली. तसेच पेंट्रीकारमध्ये पाकिटबंद भोजनाची स्वच्छता, पेंट्रीकारमधील कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र, ओळखपत्र, सफाईची व्यवस्था आदींचे निरीक्षण केले. सोबतच अग्निशमन यंत्र आहे की नाही तसेच त्याची वैधता तपासण्यात आली. वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक विकास कुमार कश्यप यांच्या नेतृत्वात सहायक वाणिज्य व्यवस्थापक जितेंद्र तिवारी, अविनाश कुमार आनंद, तिकीट निरीक्षकांच्या सहकार्याने विभागातून धावणाऱ्या रेल्वेगाड्या तसेच प्रमुख रेल्वेस्थानकात तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. त्यानुसार विनातिकीट प्रवास करणाऱ्या तसेच सामानाची बुकिंग न करणाऱ्या १५४४ प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून ७ लाख ७९ हजार ९७५ रुपये दंड वसूल केला. तसेच कचरा पसरविणाऱ्या ४३ प्रवाशांकडून १९,१०० रुपये आणि धूम्रपान करणाऱ्या ११ प्रवाशांकडून २,२०० रुपये दंड वसूल केला. ‘डीआरएम’ मनिंदर उप्पल यांनी रेल्वे प्रवाशांना रेल्वे नियमाचे पालन करून विना तिकीट प्रवास न करण्याचे आवाहन केले.

...........