शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

दपूम रेल्वेचे रेल्वेगाड्यात तपासणी अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:08 IST

नागपूर : रेल्वे प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष रेल्वेगाड्यात २ ते ११ जूनदरम्यान १० दिवसाचे तपासणी अभियान राबविले. कोरोनाचा ...

नागपूर : रेल्वे प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष रेल्वेगाड्यात २ ते ११ जूनदरम्यान १० दिवसाचे तपासणी अभियान राबविले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष रेल्वेगाड्यातील पेंट्रीकारमध्ये भोजन तयार करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे प्रवाशांना केवळ पाकिटबंद भोजन उपलब्ध करून देण्याची परवानगी दिली आहे. अभियानात रेल्वेच्या वाणिज्य विभागाचे अधिकारी आणि पर्यवेक्षकांनी विभागातून जाणाऱ्या रेल्वेगाड्यातील पेंट्रीकारमध्ये भोजन तयार करण्यात येत आहे काय? तसेच पाकिटबंद भोजन उपलब्ध आहे की नाही, याची खात्री केली. तसेच पेंट्रीकारमध्ये पाकिटबंद भोजनाची स्वच्छता, पेंट्रीकारमधील कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र, ओळखपत्र, सफाईची व्यवस्था आदींचे निरीक्षण केले. सोबतच अग्निशमन यंत्र आहे की नाही तसेच त्याची वैधता तपासण्यात आली. वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक विकास कुमार कश्यप यांच्या नेतृत्वात सहायक वाणिज्य व्यवस्थापक जितेंद्र तिवारी, अविनाश कुमार आनंद, तिकीट निरीक्षकांच्या सहकार्याने विभागातून धावणाऱ्या रेल्वेगाड्या तसेच प्रमुख रेल्वेस्थानकात तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. त्यानुसार विनातिकीट प्रवास करणाऱ्या तसेच सामानाची बुकिंग न करणाऱ्या १५४४ प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून ७ लाख ७९ हजार ९७५ रुपये दंड वसूल केला. तसेच कचरा पसरविणाऱ्या ४३ प्रवाशांकडून १९,१०० रुपये आणि धूम्रपान करणाऱ्या ११ प्रवाशांकडून २,२०० रुपये दंड वसूल केला. ‘डीआरएम’ मनिंदर उप्पल यांनी रेल्वे प्रवाशांना रेल्वे नियमाचे पालन करून विना तिकीट प्रवास न करण्याचे आवाहन केले.

...........