शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

चावट पण मार्मिक नाट्य - ‘अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’

By admin | Updated: June 29, 2014 00:47 IST

आपल्याकडे प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमी वेगवेगळी आहे, असे मानले जाते. मुळात व्यावसायिक रंगभूमी सकस असली तरी बरेचदा त्यात व्यवसायाच्या दृष्टीनेच जास्त विचार केला असतो.

ग्रेट मराठा एन्टरटेन्मेन्टची निर्मिती : दमदार सादरीकरणाने हसवणूकनागपूर : आपल्याकडे प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमी वेगवेगळी आहे, असे मानले जाते. मुळात व्यावसायिक रंगभूमी सकस असली तरी बरेचदा त्यात व्यवसायाच्या दृष्टीनेच जास्त विचार केला असतो. पण त्या तुलनेत प्रयोगिक रंगभूमीवर मात्र वेगवेगळे प्रयोग अधिक गांभीर्याने केले जातात. दुर्दैवाने राज्यातील कानाकोपऱ्यात होणारी चांगली प्रायोगिक नाटके अर्थकारणाअभावी राज्यभर पोहोचू शकत नाही पण स्थानिक पातळीवरील रसिकांकडून त्याची प्रशंसा होते. डॉ. विवेक बेळे प्रायोगिक रंगभूमीवर वेगवेगळे फॉर्म घेऊन उतरणारे प्रतिभावंत लेखक. पण त्यांच्या अनेक नाटकांनी प्रायोगितकतेची सीमा ओलांडून उत्तम व्यवसायही केला आहे. ‘अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’ हे त्याचे पुनश्च उत्तम उदाहरण. जरा चावट पण चाळीशीतल्या रसिकांना ‘रिलेट’ करणारे आणि स्त्री-पुरुष संबंधातली गुंतागुंत मांडणारे हे नाट्य आज नागपूरकर रसिकांनी ‘एन्जॉय’ केले. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात या नाटकाचा प्रयोग आज आयोजित करण्यात आला होता. आपल्या समाजात स्त्री-पुरुष सहसंबंधांबाबत फारसे बोलले जात नाही. त्याला आता प्रारंभ झाला असला तरी या नात्यांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन ‘गॉसिपिंग’ करण्याचाच असतो. चाळीशीत आल्यावर कदाचित माणसांमधल्या अतृप्त इच्छा, कल्पना अधिक उसळी मारून वर येतात. कारण आयुष्यात स्थिरावण्यासाठी परिश्रम करताना तारुण्यात बरेच काही राहून जाते. स्वाभाविकपणे माणसावर झालेला संस्कार, सामाजिक नियमांची चौकट आणि प्रतिष्ठा यामुळे बरेचदा मनातल्या सुप्त इच्छांना तिलांजली द्यावी लागते कारण काही जबाबदाऱ्याही पार पाडायच्या असतात. पण तरीही सुप्त इच्छा माणसाच्या मनात असतात. त्याला नैतिक म्हणावे की अनैतिक हा वादाचा मुद्दा असला तरी समाजात अनादी काळापासून विवाहबाह्य नाते तयार होते. हाच विषय नेमकेपणाने डॉ. विवेक बेळे यांनी मांडला आहे आणि दिग्दर्शक अजित भुरे यांनी त्याला संपूर्ण न्याय दिला आहे हे नाटक पाहताना जाणवले. वयाच्या चाळीशीत पोहोचलेल्या जोड्या वरुण-शलाका, पराग-आदिती, डॉक्टर-सुमित्रा आणि त्यांचा अविवाहित मित्र अभिषेक. एकमेकांचे कौटुंबिक मित्र असलेले सात लोक विकएण्डला डॉक्टरच्या फॉर्महाऊसवर जातात. मौजमस्ती सुरू असताना लाईट जातात. अंधारात कुणीतरी कुणाला किस करतो. जिचा किस घेतला गेला ती त्याच्या कानाखाली आवाज करते. लाईट आल्यावर मात्र हे सारे कुणा दोघांत घडले, ते कळत नाही. ज्या दोघांत हे घडले तेही कबूल होत नाहीत. त्यामुळे प्रत्येकालाच आपल्या बायकोवर आणि नवऱ्यावर संशय येतो. ही गुंतागुंत वाढते. एक ब्लॉग सुरू करण्यात येतो. त्यावर कुणा दोघांत हे घडले त्यांनी कबूल करावे वा कुणाला काही कळल्यास त्यावर लिहावे, असे आवाहन केले जाते. हा ब्लॉगही चांगलाच रंगतो. पण नेमके काय होते ते पाहण्यासाठी हे नाटकच बघायला हवे. यातील रहस्य अखेरपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवते. यात वरुणच्या भूमिकेत आनंद इंगळे यांनी भन्नाट भूमिका केली आहे. याशिवाय सीमा देशमुख, राजन भिसे, मंजूषा गोडसे, धनंजय गोरे, विद्याधर जोशी आणि राधिका विद्यासागर यांच्या अभिनयाने नाटकात जान आणली आहे. प्रदीप मुळ्ये यांचे नेपथ्य कल्पक आहे. (प्रतिनिधी)