शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
4
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
5
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
6
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
7
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
8
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
9
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
10
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
11
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
12
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
13
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
14
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
15
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
16
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
18
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
19
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

धोकादायक पाच जंक्शन! नागपूर-कोंढाळी महामार्गावर तीन वर्षांत ८९ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2023 08:45 IST

Nagpur News नागपूर-कोंढाळी मार्गावर असलेल्या पाच धोकादायक जंक्शनवर आतापर्यंत तीन वर्षांत ८९ लोकांचा जीव गेला आहे.

जितेंद्र ढवळे

नागपूर : कोंढाळी-नागपूर महामार्गावर चाकडोह फाट्याजवळ शिवा रोडकडे दुचाकी वळविताच मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने बुधवारी दुचाकीवरील तिघांचा बळी गेला. नागपूर-कोंढाळी मार्गावर असलेल्या अशा पाच धोकादायक जंक्शनवर आतापर्यंत तीन वर्षांत ८९ लोकांचा जीव गेला आहे. त्यामुळे या धोकादायक जंक्शनवरील अपघात रोखण्यासाठी कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाययोजना कधी केल्या जातील, हे अद्यापही अंधातरीच आहे.

नागपूर-कोंढाळी राष्ट्रीय महामार्गाला (क्रमांक ५३) बाजारगाव येथे बाजारगाव-डोरली राज्य मार्ग क्रमांक ३३६ बाजारगाव-लिंंगा-लाडई-कळमेश्वर राज्य मार्ग क्रमांक ३४४, बाजारगाव-चिचोली-दाभा-येरणगाव राज्य मार्ग क्रमांक ३४४, बाजारगाव-शिवा-अडेगाव प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक १२ व बाजारगाव पोचमार्ग (ग्रामीण मार्ग क्रमांक १४) हे मार्ग जोडले आहेत. याशिवाय चाकडोह फाटा हे रस्ते बाजारगाव येथे नागपूर-कोंढाळी राष्ट्रीय महामार्गाला जोडले आहेत.

या मार्गावर २४ तास वाहनांची वर्दळ असते. याशिवाय अवजड वाहनांच्या अतिवेगामुळे या मार्गावर छोट्या वाहनधारकांना प्रवास करणे नेहमीच आव्हानात्मक ठरते. त्यामुळे बाजारगाव येथून जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग नेहमीच अपघाताचे केंद्र ठरतो आहे.

 

असे झाले अपघात

२०२० मध्ये या मार्गावर ४१ अपघात झाले. यात २३ लोकांचा जीव गेला. २०२१ मध्ये ५८ अपघातांत २८ लोकांचा जीव गेला, तर ३७ जण गंभीर जखमी झाले. २०२२ मध्ये ६६ अपघातांत २९ लोकांचा मृत्यू झाला, तर ३४ गंभीर जखमी झाले. २०२३ मध्ये आतापर्यंत १६ अपघातांत ९ लोकांचा जीव गेला, तर ७ गंभीर जखमी झाले.

 

काम कधी सुरू होणार?

नागपूर-कोंढाळी मार्गावरील या धोकादायक जंक्शनवर अपघात रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी करणारे पत्र काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना एप्रिल २०२२ ला दिले होते. यावर गडकरी यांनी ‘एनएचआय’च्या अधिकाऱ्यांना सर्वेक्षण करून विस्तृत प्रकल्प अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. ‘एनएचआय’ने या अपघातप्रवणस्थळांचे सर्वेक्षण केल्यानंतर प्रतिबंधात्मक उपायोजना करण्याबाबत विस्तृत आराखडाही तयार केला होता. यानंतर ‘एनएचआय’ने या कामाच्या निविदाही काढल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या पंजाब येथील भिंदरा ब्रदर्स इंडिया कंपनीकडे हे काम सोपविण्यात आले आहे; मात्र ही कंपनी या अपघातप्रवण स्थळांवर प्रतिबंधात्मक उपायोजना करण्याचे काम कधी सुरू करणार, हे अद्यापही स्पष्ट झाले नाही.

कामगारांची २४ तास वर्दळ

या मार्गावर सोलार, इकोनॉमिक्स, पार्कर, डिफेन्स प्रकल्प, सारडा इंडस्ट्रीज आदी मोठ्या कंपन्या आहेत. येथे ७० हून अधिक गावांतील कामागार शिफ्टनुसार कामावर येतात. याशिवाय फनफूड, बाजारगाव हनुमान मंदिर, जैन मंदिर आदी धार्मिक स्थळे असल्याने या मार्गावर नेहमीच वर्दळ असते; मात्र वाहतूक नियोजनाच्या कोणत्याही उपायोजना नसल्याने या मार्गावर अनेकांचे जीव गेले आहेत.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा