शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

धोकादायक पाच जंक्शन! नागपूर-कोंढाळी महामार्गावर तीन वर्षांत ८९ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2023 08:45 IST

Nagpur News नागपूर-कोंढाळी मार्गावर असलेल्या पाच धोकादायक जंक्शनवर आतापर्यंत तीन वर्षांत ८९ लोकांचा जीव गेला आहे.

जितेंद्र ढवळे

नागपूर : कोंढाळी-नागपूर महामार्गावर चाकडोह फाट्याजवळ शिवा रोडकडे दुचाकी वळविताच मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने बुधवारी दुचाकीवरील तिघांचा बळी गेला. नागपूर-कोंढाळी मार्गावर असलेल्या अशा पाच धोकादायक जंक्शनवर आतापर्यंत तीन वर्षांत ८९ लोकांचा जीव गेला आहे. त्यामुळे या धोकादायक जंक्शनवरील अपघात रोखण्यासाठी कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाययोजना कधी केल्या जातील, हे अद्यापही अंधातरीच आहे.

नागपूर-कोंढाळी राष्ट्रीय महामार्गाला (क्रमांक ५३) बाजारगाव येथे बाजारगाव-डोरली राज्य मार्ग क्रमांक ३३६ बाजारगाव-लिंंगा-लाडई-कळमेश्वर राज्य मार्ग क्रमांक ३४४, बाजारगाव-चिचोली-दाभा-येरणगाव राज्य मार्ग क्रमांक ३४४, बाजारगाव-शिवा-अडेगाव प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक १२ व बाजारगाव पोचमार्ग (ग्रामीण मार्ग क्रमांक १४) हे मार्ग जोडले आहेत. याशिवाय चाकडोह फाटा हे रस्ते बाजारगाव येथे नागपूर-कोंढाळी राष्ट्रीय महामार्गाला जोडले आहेत.

या मार्गावर २४ तास वाहनांची वर्दळ असते. याशिवाय अवजड वाहनांच्या अतिवेगामुळे या मार्गावर छोट्या वाहनधारकांना प्रवास करणे नेहमीच आव्हानात्मक ठरते. त्यामुळे बाजारगाव येथून जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग नेहमीच अपघाताचे केंद्र ठरतो आहे.

 

असे झाले अपघात

२०२० मध्ये या मार्गावर ४१ अपघात झाले. यात २३ लोकांचा जीव गेला. २०२१ मध्ये ५८ अपघातांत २८ लोकांचा जीव गेला, तर ३७ जण गंभीर जखमी झाले. २०२२ मध्ये ६६ अपघातांत २९ लोकांचा मृत्यू झाला, तर ३४ गंभीर जखमी झाले. २०२३ मध्ये आतापर्यंत १६ अपघातांत ९ लोकांचा जीव गेला, तर ७ गंभीर जखमी झाले.

 

काम कधी सुरू होणार?

नागपूर-कोंढाळी मार्गावरील या धोकादायक जंक्शनवर अपघात रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी करणारे पत्र काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना एप्रिल २०२२ ला दिले होते. यावर गडकरी यांनी ‘एनएचआय’च्या अधिकाऱ्यांना सर्वेक्षण करून विस्तृत प्रकल्प अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. ‘एनएचआय’ने या अपघातप्रवणस्थळांचे सर्वेक्षण केल्यानंतर प्रतिबंधात्मक उपायोजना करण्याबाबत विस्तृत आराखडाही तयार केला होता. यानंतर ‘एनएचआय’ने या कामाच्या निविदाही काढल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या पंजाब येथील भिंदरा ब्रदर्स इंडिया कंपनीकडे हे काम सोपविण्यात आले आहे; मात्र ही कंपनी या अपघातप्रवण स्थळांवर प्रतिबंधात्मक उपायोजना करण्याचे काम कधी सुरू करणार, हे अद्यापही स्पष्ट झाले नाही.

कामगारांची २४ तास वर्दळ

या मार्गावर सोलार, इकोनॉमिक्स, पार्कर, डिफेन्स प्रकल्प, सारडा इंडस्ट्रीज आदी मोठ्या कंपन्या आहेत. येथे ७० हून अधिक गावांतील कामागार शिफ्टनुसार कामावर येतात. याशिवाय फनफूड, बाजारगाव हनुमान मंदिर, जैन मंदिर आदी धार्मिक स्थळे असल्याने या मार्गावर नेहमीच वर्दळ असते; मात्र वाहतूक नियोजनाच्या कोणत्याही उपायोजना नसल्याने या मार्गावर अनेकांचे जीव गेले आहेत.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा