शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

धोकादायक पाच जंक्शन! नागपूर-कोंढाळी महामार्गावर तीन वर्षांत ८९ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2023 08:45 IST

Nagpur News नागपूर-कोंढाळी मार्गावर असलेल्या पाच धोकादायक जंक्शनवर आतापर्यंत तीन वर्षांत ८९ लोकांचा जीव गेला आहे.

जितेंद्र ढवळे

नागपूर : कोंढाळी-नागपूर महामार्गावर चाकडोह फाट्याजवळ शिवा रोडकडे दुचाकी वळविताच मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने बुधवारी दुचाकीवरील तिघांचा बळी गेला. नागपूर-कोंढाळी मार्गावर असलेल्या अशा पाच धोकादायक जंक्शनवर आतापर्यंत तीन वर्षांत ८९ लोकांचा जीव गेला आहे. त्यामुळे या धोकादायक जंक्शनवरील अपघात रोखण्यासाठी कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाययोजना कधी केल्या जातील, हे अद्यापही अंधातरीच आहे.

नागपूर-कोंढाळी राष्ट्रीय महामार्गाला (क्रमांक ५३) बाजारगाव येथे बाजारगाव-डोरली राज्य मार्ग क्रमांक ३३६ बाजारगाव-लिंंगा-लाडई-कळमेश्वर राज्य मार्ग क्रमांक ३४४, बाजारगाव-चिचोली-दाभा-येरणगाव राज्य मार्ग क्रमांक ३४४, बाजारगाव-शिवा-अडेगाव प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक १२ व बाजारगाव पोचमार्ग (ग्रामीण मार्ग क्रमांक १४) हे मार्ग जोडले आहेत. याशिवाय चाकडोह फाटा हे रस्ते बाजारगाव येथे नागपूर-कोंढाळी राष्ट्रीय महामार्गाला जोडले आहेत.

या मार्गावर २४ तास वाहनांची वर्दळ असते. याशिवाय अवजड वाहनांच्या अतिवेगामुळे या मार्गावर छोट्या वाहनधारकांना प्रवास करणे नेहमीच आव्हानात्मक ठरते. त्यामुळे बाजारगाव येथून जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग नेहमीच अपघाताचे केंद्र ठरतो आहे.

 

असे झाले अपघात

२०२० मध्ये या मार्गावर ४१ अपघात झाले. यात २३ लोकांचा जीव गेला. २०२१ मध्ये ५८ अपघातांत २८ लोकांचा जीव गेला, तर ३७ जण गंभीर जखमी झाले. २०२२ मध्ये ६६ अपघातांत २९ लोकांचा मृत्यू झाला, तर ३४ गंभीर जखमी झाले. २०२३ मध्ये आतापर्यंत १६ अपघातांत ९ लोकांचा जीव गेला, तर ७ गंभीर जखमी झाले.

 

काम कधी सुरू होणार?

नागपूर-कोंढाळी मार्गावरील या धोकादायक जंक्शनवर अपघात रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी करणारे पत्र काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना एप्रिल २०२२ ला दिले होते. यावर गडकरी यांनी ‘एनएचआय’च्या अधिकाऱ्यांना सर्वेक्षण करून विस्तृत प्रकल्प अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. ‘एनएचआय’ने या अपघातप्रवणस्थळांचे सर्वेक्षण केल्यानंतर प्रतिबंधात्मक उपायोजना करण्याबाबत विस्तृत आराखडाही तयार केला होता. यानंतर ‘एनएचआय’ने या कामाच्या निविदाही काढल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या पंजाब येथील भिंदरा ब्रदर्स इंडिया कंपनीकडे हे काम सोपविण्यात आले आहे; मात्र ही कंपनी या अपघातप्रवण स्थळांवर प्रतिबंधात्मक उपायोजना करण्याचे काम कधी सुरू करणार, हे अद्यापही स्पष्ट झाले नाही.

कामगारांची २४ तास वर्दळ

या मार्गावर सोलार, इकोनॉमिक्स, पार्कर, डिफेन्स प्रकल्प, सारडा इंडस्ट्रीज आदी मोठ्या कंपन्या आहेत. येथे ७० हून अधिक गावांतील कामागार शिफ्टनुसार कामावर येतात. याशिवाय फनफूड, बाजारगाव हनुमान मंदिर, जैन मंदिर आदी धार्मिक स्थळे असल्याने या मार्गावर नेहमीच वर्दळ असते; मात्र वाहतूक नियोजनाच्या कोणत्याही उपायोजना नसल्याने या मार्गावर अनेकांचे जीव गेले आहेत.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा