शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक पाच जंक्शन! नागपूर-कोंढाळी महामार्गावर तीन वर्षांत ८९ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2023 08:45 IST

Nagpur News नागपूर-कोंढाळी मार्गावर असलेल्या पाच धोकादायक जंक्शनवर आतापर्यंत तीन वर्षांत ८९ लोकांचा जीव गेला आहे.

जितेंद्र ढवळे

नागपूर : कोंढाळी-नागपूर महामार्गावर चाकडोह फाट्याजवळ शिवा रोडकडे दुचाकी वळविताच मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने बुधवारी दुचाकीवरील तिघांचा बळी गेला. नागपूर-कोंढाळी मार्गावर असलेल्या अशा पाच धोकादायक जंक्शनवर आतापर्यंत तीन वर्षांत ८९ लोकांचा जीव गेला आहे. त्यामुळे या धोकादायक जंक्शनवरील अपघात रोखण्यासाठी कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाययोजना कधी केल्या जातील, हे अद्यापही अंधातरीच आहे.

नागपूर-कोंढाळी राष्ट्रीय महामार्गाला (क्रमांक ५३) बाजारगाव येथे बाजारगाव-डोरली राज्य मार्ग क्रमांक ३३६ बाजारगाव-लिंंगा-लाडई-कळमेश्वर राज्य मार्ग क्रमांक ३४४, बाजारगाव-चिचोली-दाभा-येरणगाव राज्य मार्ग क्रमांक ३४४, बाजारगाव-शिवा-अडेगाव प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक १२ व बाजारगाव पोचमार्ग (ग्रामीण मार्ग क्रमांक १४) हे मार्ग जोडले आहेत. याशिवाय चाकडोह फाटा हे रस्ते बाजारगाव येथे नागपूर-कोंढाळी राष्ट्रीय महामार्गाला जोडले आहेत.

या मार्गावर २४ तास वाहनांची वर्दळ असते. याशिवाय अवजड वाहनांच्या अतिवेगामुळे या मार्गावर छोट्या वाहनधारकांना प्रवास करणे नेहमीच आव्हानात्मक ठरते. त्यामुळे बाजारगाव येथून जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग नेहमीच अपघाताचे केंद्र ठरतो आहे.

 

असे झाले अपघात

२०२० मध्ये या मार्गावर ४१ अपघात झाले. यात २३ लोकांचा जीव गेला. २०२१ मध्ये ५८ अपघातांत २८ लोकांचा जीव गेला, तर ३७ जण गंभीर जखमी झाले. २०२२ मध्ये ६६ अपघातांत २९ लोकांचा मृत्यू झाला, तर ३४ गंभीर जखमी झाले. २०२३ मध्ये आतापर्यंत १६ अपघातांत ९ लोकांचा जीव गेला, तर ७ गंभीर जखमी झाले.

 

काम कधी सुरू होणार?

नागपूर-कोंढाळी मार्गावरील या धोकादायक जंक्शनवर अपघात रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी करणारे पत्र काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना एप्रिल २०२२ ला दिले होते. यावर गडकरी यांनी ‘एनएचआय’च्या अधिकाऱ्यांना सर्वेक्षण करून विस्तृत प्रकल्प अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. ‘एनएचआय’ने या अपघातप्रवणस्थळांचे सर्वेक्षण केल्यानंतर प्रतिबंधात्मक उपायोजना करण्याबाबत विस्तृत आराखडाही तयार केला होता. यानंतर ‘एनएचआय’ने या कामाच्या निविदाही काढल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या पंजाब येथील भिंदरा ब्रदर्स इंडिया कंपनीकडे हे काम सोपविण्यात आले आहे; मात्र ही कंपनी या अपघातप्रवण स्थळांवर प्रतिबंधात्मक उपायोजना करण्याचे काम कधी सुरू करणार, हे अद्यापही स्पष्ट झाले नाही.

कामगारांची २४ तास वर्दळ

या मार्गावर सोलार, इकोनॉमिक्स, पार्कर, डिफेन्स प्रकल्प, सारडा इंडस्ट्रीज आदी मोठ्या कंपन्या आहेत. येथे ७० हून अधिक गावांतील कामागार शिफ्टनुसार कामावर येतात. याशिवाय फनफूड, बाजारगाव हनुमान मंदिर, जैन मंदिर आदी धार्मिक स्थळे असल्याने या मार्गावर नेहमीच वर्दळ असते; मात्र वाहतूक नियोजनाच्या कोणत्याही उपायोजना नसल्याने या मार्गावर अनेकांचे जीव गेले आहेत.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा