शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी मनसे प्रमुख राज ठाकरे लोकल ट्रेनने चर्चगेटला पोहोचले
2
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
3
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
4
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
5
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
6
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
7
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?
8
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?
9
UPI New Rules: ३ नोव्हेंबरपासून युपीआय पेमेंटमध्ये होणार मोठा बदल! पटापट करा चेक
10
"मी दोन दिवसांपूर्वीच रोहित आर्याला भेटलेलो...", मराठी अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "त्याच्यावर शंका आली नाही कारण..."
11
Tarot Card: नवा उत्साह, चैतन्य आणि आशादायी चित्र घेऊन येणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
12
ग्रहण योग-अशुभ पंचकात कार्तिकी एकादशी: १० राशींचा भाग्योदय-भरघोस भरभराट; विठुराया शुभ करेल!
13
भारतीय वंशाच्या उद्योजकाने अमेरिकेत चुना लावला अन् पसार झाला; ४,००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप
14
IND vs SA World Cup Final: भारत-दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पावसात रद्द झाल्यास काय? २००२ मध्ये भारतासोबत काय झालेले...
15
Shocking!! कॅप्टन बनताच Bigg Boss 19च्या घरातून बेघर झाला प्रणित मोरे? एलिमिनेशनमध्ये मोठा ट्विस्ट
16
Wife च्या नावे पोस्टाच्या या स्कीममध्ये ₹८०००, ५ वर्षांत होईल धनवर्षाव; पाहा कमाईचं संपूर्ण गणित
17
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
18
“कार्तिकी एकादशीच्या महापूजेपूर्वीच विठुरायाने ठाण्यात अवतरून मला दर्शन दिले”: एकनाथ शिंदे
19
LPG Cylinder Price Cut:आजपासून गॅस सिलिंडरची किंमत झाली कमी, पाहा तुमच्या शहरात काय आहेत नवे दर?
20
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश

देशभरातील पुरोगामी प्राध्यापकांचे स्वातंत्र्य धोक्यात

By admin | Updated: March 19, 2017 03:07 IST

सत्तांतरानंतर देशात खूप कठीण काळ आला आहे. नव्या पिढीला पुरोगामित्वाचे धडे देणाऱ्या प्राध्यापकांना ठरवून लक्ष्य केले जात आहे.

दत्ता भगत : १३व्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन नागपूर : सत्तांतरानंतर देशात खूप कठीण काळ आला आहे. नव्या पिढीला पुरोगामित्वाचे धडे देणाऱ्या प्राध्यापकांना ठरवून लक्ष्य केले जात आहे. नागपुरात आज होणारे सीताराम येचुरी यांचे भाषण रद्द होणे, हे त्याचेच उदाहरण आहे, असा थेट आरोप ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रा. दत्ता भगत यांनी केला. अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य व संस्कृती दर्शन महामंडळाच्या निळाई परिवारातर्फे बैद्यनाथ चौकातील अजंता सभागृहात आयोजित १३व्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनीय सत्रात ते संमेलनाध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी कॉ. भारत पाटणकर, उद्घाटिका डॉ. गेल आॅम्व्हेट, स्वागताध्यक्ष विजय तागडे, प्रवीण कांबळे, अशोक बुरबुरे उपस्थित होते. प्रा. दत्ता भगत पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली चळवळ केवळ बौद्धांच्या हितासाठी नाही तर ती समाजाला एका सूत्रात बांधण्यासाठी गरजेची असेलेली जातीअंताची लढाई आहे. तिचे स्वरूप अतिशय व्यापक आहे. ही गोष्ट दलितेतर लोकांना पटवून देण्यासाठी साहित्यिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. कॉ. भारत पाटणकर म्हणाले, बाबासाहेबांची जयंती केवळ आपल्या वस्तीतच साजरी करू नका, त्या जयंतीचे आयोजन गावातील मुख्य चौकात करा. बाबासाहेब हे केवळ त्या वस्तीचेच नाहीत आपलेही आहेत हा विश्वास समाजील सर्व स्तरात निर्माण झाला पाहिजे. साहित्य हे त्यासाठीचे प्रभावी माध्यम आहे. आज येथे आयोजित साहित्य संमेलनात विज्ञानावर परिसंवाद होतोय, ही फार आनंदाची गोष्ट आहे. बुद्धाचा विचारच मुळात विज्ञानवादी होता. त्याचा प्रसार झाला पाहिजे. साहित्याच्या माध्यमातूनच आता जातीअंताची लढाई पुनरुज्जीवित व्हायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. डॉ. गेल आॅम्व्हेट यांनी उद्घाटनीय भाषण केले. प्रवीण कांबळे यांनी संमेलनाची भूमिका मांडली, अशोक बुरबुरे यांनी प्रास्ताविक केले. संचालन शालिक जिल्हेकर तर आभार प्रभू फुलझेले यांनी मानले. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात ‘आंबेकडरी साहित्यातील माझी भूमिका आणि वास्तव’, ‘बदलते सामाजिक वास्तव आणि आंबेकडरी साहित्य’ या दोेन विषयावर परिसंवाद आणि संध्याकाळी निमंत्रितांचे कविसंमेलन पार पडले.(प्रतिनिधी)