शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

देशभरातील पुरोगामी प्राध्यापकांचे स्वातंत्र्य धोक्यात

By admin | Updated: March 19, 2017 03:07 IST

सत्तांतरानंतर देशात खूप कठीण काळ आला आहे. नव्या पिढीला पुरोगामित्वाचे धडे देणाऱ्या प्राध्यापकांना ठरवून लक्ष्य केले जात आहे.

दत्ता भगत : १३व्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन नागपूर : सत्तांतरानंतर देशात खूप कठीण काळ आला आहे. नव्या पिढीला पुरोगामित्वाचे धडे देणाऱ्या प्राध्यापकांना ठरवून लक्ष्य केले जात आहे. नागपुरात आज होणारे सीताराम येचुरी यांचे भाषण रद्द होणे, हे त्याचेच उदाहरण आहे, असा थेट आरोप ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रा. दत्ता भगत यांनी केला. अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य व संस्कृती दर्शन महामंडळाच्या निळाई परिवारातर्फे बैद्यनाथ चौकातील अजंता सभागृहात आयोजित १३व्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनीय सत्रात ते संमेलनाध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी कॉ. भारत पाटणकर, उद्घाटिका डॉ. गेल आॅम्व्हेट, स्वागताध्यक्ष विजय तागडे, प्रवीण कांबळे, अशोक बुरबुरे उपस्थित होते. प्रा. दत्ता भगत पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली चळवळ केवळ बौद्धांच्या हितासाठी नाही तर ती समाजाला एका सूत्रात बांधण्यासाठी गरजेची असेलेली जातीअंताची लढाई आहे. तिचे स्वरूप अतिशय व्यापक आहे. ही गोष्ट दलितेतर लोकांना पटवून देण्यासाठी साहित्यिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. कॉ. भारत पाटणकर म्हणाले, बाबासाहेबांची जयंती केवळ आपल्या वस्तीतच साजरी करू नका, त्या जयंतीचे आयोजन गावातील मुख्य चौकात करा. बाबासाहेब हे केवळ त्या वस्तीचेच नाहीत आपलेही आहेत हा विश्वास समाजील सर्व स्तरात निर्माण झाला पाहिजे. साहित्य हे त्यासाठीचे प्रभावी माध्यम आहे. आज येथे आयोजित साहित्य संमेलनात विज्ञानावर परिसंवाद होतोय, ही फार आनंदाची गोष्ट आहे. बुद्धाचा विचारच मुळात विज्ञानवादी होता. त्याचा प्रसार झाला पाहिजे. साहित्याच्या माध्यमातूनच आता जातीअंताची लढाई पुनरुज्जीवित व्हायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. डॉ. गेल आॅम्व्हेट यांनी उद्घाटनीय भाषण केले. प्रवीण कांबळे यांनी संमेलनाची भूमिका मांडली, अशोक बुरबुरे यांनी प्रास्ताविक केले. संचालन शालिक जिल्हेकर तर आभार प्रभू फुलझेले यांनी मानले. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात ‘आंबेकडरी साहित्यातील माझी भूमिका आणि वास्तव’, ‘बदलते सामाजिक वास्तव आणि आंबेकडरी साहित्य’ या दोेन विषयावर परिसंवाद आणि संध्याकाळी निमंत्रितांचे कविसंमेलन पार पडले.(प्रतिनिधी)