शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

देशभरातील पुरोगामी प्राध्यापकांचे स्वातंत्र्य धोक्यात

By admin | Updated: March 19, 2017 03:07 IST

सत्तांतरानंतर देशात खूप कठीण काळ आला आहे. नव्या पिढीला पुरोगामित्वाचे धडे देणाऱ्या प्राध्यापकांना ठरवून लक्ष्य केले जात आहे.

दत्ता भगत : १३व्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन नागपूर : सत्तांतरानंतर देशात खूप कठीण काळ आला आहे. नव्या पिढीला पुरोगामित्वाचे धडे देणाऱ्या प्राध्यापकांना ठरवून लक्ष्य केले जात आहे. नागपुरात आज होणारे सीताराम येचुरी यांचे भाषण रद्द होणे, हे त्याचेच उदाहरण आहे, असा थेट आरोप ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रा. दत्ता भगत यांनी केला. अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य व संस्कृती दर्शन महामंडळाच्या निळाई परिवारातर्फे बैद्यनाथ चौकातील अजंता सभागृहात आयोजित १३व्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनीय सत्रात ते संमेलनाध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी कॉ. भारत पाटणकर, उद्घाटिका डॉ. गेल आॅम्व्हेट, स्वागताध्यक्ष विजय तागडे, प्रवीण कांबळे, अशोक बुरबुरे उपस्थित होते. प्रा. दत्ता भगत पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली चळवळ केवळ बौद्धांच्या हितासाठी नाही तर ती समाजाला एका सूत्रात बांधण्यासाठी गरजेची असेलेली जातीअंताची लढाई आहे. तिचे स्वरूप अतिशय व्यापक आहे. ही गोष्ट दलितेतर लोकांना पटवून देण्यासाठी साहित्यिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. कॉ. भारत पाटणकर म्हणाले, बाबासाहेबांची जयंती केवळ आपल्या वस्तीतच साजरी करू नका, त्या जयंतीचे आयोजन गावातील मुख्य चौकात करा. बाबासाहेब हे केवळ त्या वस्तीचेच नाहीत आपलेही आहेत हा विश्वास समाजील सर्व स्तरात निर्माण झाला पाहिजे. साहित्य हे त्यासाठीचे प्रभावी माध्यम आहे. आज येथे आयोजित साहित्य संमेलनात विज्ञानावर परिसंवाद होतोय, ही फार आनंदाची गोष्ट आहे. बुद्धाचा विचारच मुळात विज्ञानवादी होता. त्याचा प्रसार झाला पाहिजे. साहित्याच्या माध्यमातूनच आता जातीअंताची लढाई पुनरुज्जीवित व्हायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. डॉ. गेल आॅम्व्हेट यांनी उद्घाटनीय भाषण केले. प्रवीण कांबळे यांनी संमेलनाची भूमिका मांडली, अशोक बुरबुरे यांनी प्रास्ताविक केले. संचालन शालिक जिल्हेकर तर आभार प्रभू फुलझेले यांनी मानले. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात ‘आंबेकडरी साहित्यातील माझी भूमिका आणि वास्तव’, ‘बदलते सामाजिक वास्तव आणि आंबेकडरी साहित्य’ या दोेन विषयावर परिसंवाद आणि संध्याकाळी निमंत्रितांचे कविसंमेलन पार पडले.(प्रतिनिधी)