शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

नागपुरातील तलावांना गणेश विसर्जनानंतर प्रदूषणाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 11:17 IST

नागपुरातील तलावांच्या स्थितीत सुधारणा दिसून येत आहे. मात्र ही स्थिती विसर्जनापूर्वीची आहे. उपायांची कठोर अंमलबजावणी राहिली नाही तर स्थिती पूर्वीप्रमाणे वाईट होण्याची शक्यता ग्रीन व्हिजील संस्थेने व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देपाण्याच्या गुणवत्तेत सुधार, पण...उपायांमुळे आॅक्सिजन, टर्बिडीटीची स्थिती चांगली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकांमध्ये झालेली जागृती व महापालिकेच्या उपाययोजनांमुळे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी नागपुरातील तलावांच्या स्थितीत सुधारणा दिसून येत आहे. विसर्जनाबाबत केलेला धोरणात्मक बदल आणि यावर्षी जलसाठा अधिक असल्याने तलावात शुद्ध आॅक्सिजनचे प्रमाण समाधानकारक असून घातक टर्बिडीटी व आम्लाचे प्रमाण संतुलित आहे. मात्र ही स्थिती विसर्जनापूर्वीची आहे. उपायांची कठोर अंमलबजावणी राहिली नाही तर स्थिती पूर्वीप्रमाणे वाईट होण्याची शक्यता ग्रीन व्हिजील संस्थेने व्यक्त केली आहे.पर्यावरणासाठी काम करणाऱ्या ग्रीन व्हिजील या संस्थेच्या सदस्यांनी नुकतेच शहरातील फुटाळा, सोनेगाव व गांधीसागर या तीन तलावातील पाण्याचे परीक्षण केले. अर्थ इको इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सहकार्याने ग्रीन व्हिजीलतर्फे गेल्या सहा वर्षापासून हे परीक्षण केले जात आहे. यावेळी झालेल्या परीक्षणाबाबत माहिती देताना ग्रीन व्हिजीलच्या टीम लीडर सुरभी जैस्वाल यांनी सांगितले की, पाण्याच्या गुणवत्तेसाठी आवश्यक डिझॉल्व आॅक्सिजनचे प्रमाण, गढूळपणा (टर्बिडीटी) व आम्लाची स्थिती (पीएच लेव्हल) संतुलित प्रमाणात आढळून आले आहे. पाण्याच्या गुणवत्तेसाठी डिझॉल्व आॅक्सिजनचे प्रमाण ५ मिलिग्रॅम/लिटर किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. २०१६ व २०१७ मध्ये विसर्जनापूर्वीच हे प्रमाण फुटाळा तलावात ३.५ मिलिग्रॅम/लिटर, गांधीसागर तलावात ४.५ ते ५ मिलिग्रॅम/लिटरच्या आसपास होते.यावर्षी मात्र हे प्रमाण फुटाळा तलावात ४.५ व गांधीसागर तलावात ५ मिलिग्रॅम/लिटर म्हणजे समाधानकारक म्हणावे असे आहे. याशिवाय गढूळपणाची स्थिती ५० जेटीयू किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. फुटाळा तलावात २०१६ मध्ये गढूळपणा ६० जेटीयू, २०१७ मध्ये ७० जेटीयू होती, जी यावर्षी ६० जेटीयूपेक्षा कमी आहे. गांधीसागर तलाव मागील दोन वर्षी अधिक प्रदूषित होते. दोन्ही वर्षी ७५ जेटीयू एवढी होती, जी यावर्षी ७० पेक्षा खाली आली आहे. याबाबतीत सोनेगाव तलाव नशीबवान ठरला. दोन वर्षापूर्वी विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची निर्मिती चालविलेल्या उपाययोजनांमुळे डिझॉल्व आॅक्सिजन, गढूळपणा व आम्ल स्तराचे प्रमाण संतुलित राहिले आहे. फुटाळा व गांधीसागरमध्ये दोन वर्षात ८.५ पर्यंत गेलेले आम्ल स्तराचे प्रमाण यावेळी ८.२ वर आले आहे. गुणवत्तेसाठी पाण्यात पीएच स्तर ७ वर असणे आदर्श मानले जाते.या परीक्षणात मेहुल कोसुरकर, कल्याणी वैद्य यांच्यासह संस्थेचे अन्य सदस्य व सेवादल महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

जलपर्णी वनस्पतीचा बंदोबस्त गरजेचासोनेगाव तलावाची स्थिती चांगली असली तरी विसर्जनानंतर कृत्रिम तलावाचा गाळ पुन्हा सोनेगाव तलावात सोडला जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे परिस्थिती जैसे थे होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सुरभी जैस्वाल यांनी सांगितले. यातील गांधीसागर तलावाची स्थिती चिंताजनक आहे, त्यामुळे या तलावात विसर्जनाला पूर्णपणे प्रतिबंध लावणे आवश्यक असल्याचे मत सुरभी यांनी व्यक्त केले. तसेच फुटाळा तलावातील जलपर्णी वनस्पतीचा बंदोबस्त करणे आणि विसर्जनावर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. महत्त्वाचे म्हणजे तलाव व वस्त्यांच्या आसपास अधिक कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यासोबत लोकांमध्ये जागृती आणणे महत्त्वाचे असल्याचे सुरभी जैस्वाल यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवFutala Lakeफुटाळा तलाव