शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE अभ्यासक्रमात छत्रपती शिवरायांचा इतिहास फक्त ६८ शब्दांत, सत्यजीत तांबेंचा विधानसभेत संताप
2
भारतात येत असताना...! विनफास्ट अमेरिकेत डीलरशीप बंद करू लागली; संख्या दोन डझनांखाली आली...
3
मुंबईतील ७० टक्के मुस्लीम बहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती; भाजपाच्या सर्व्हेतून काय आलं समोर?
4
टेस्लाला मोठा झटका! जागतिक विक्री ४ वर्षांतील नीचांकी पातळीवर; भारतात तर डोकेही वर निघेना...
5
इंडिगोचं विमान ऐनवेळी रद्द, मुलाची परीक्षा चुकू नये म्हणून वडिलांनी रात्रभर चालवली कार, अखेरीस... 
6
"ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांच्या निधनाने अनुभवी, अभ्यासू व सुसंकृत नेतृत्व हरपले’’,  हर्षवर्धन सपकाळ यांनी वाहिली श्रद्धांजली
7
Garud Puran: गरुड पुराणानुसार विवाह बाह्य संबंध ठेवणाऱ्यांना मिळते 'ही' भयानक शिक्षा!
8
या अभिनेत्रीचे वडील उरीमध्ये दहशतवाद्यांशी लढताना झाले होते शहीद, ८०० कोटींच्या सिनेमातून रातोरात झाली लोकप्रिय
9
नात्याला काळीमा! इस्रायलचं स्वप्न, विम्याच्या रकमेसाठी लेक झाला हैवान; वडिलांचा काढला काटा
10
मोठी बातमी! वेनेझुएलावर अमेरिकेने हल्ला केलाच, रशिया संरक्षण करणार; मादुरो यांना पुतीन यांचा फोन गेला...
11
नोकरीचं राहुद्या आता अमेरिकेत फिरायला जाणेही कठीण! ट्रम्प म्हणाले 'या' हेतूने येणाऱ्यांना पर्यटन व्हिसा नाही
12
लूथरा बंधूंच्या मागे आता ईडी देखील हात धुवून लागणार; दिल्लीतील एकाच पत्त्यावर ४२ बनावट कंपन्या...
13
११ वर्षांच्या यशस्वी मोहिमेनंतर NASA च्या 'MAVEN' मार्स ऑर्बिटरशी अचानक संपर्क तुटला; वैज्ञानिक चिंतेत
14
Astro Tips: तिन्ही सांजेला 'या' ५ चुका करणे म्हणजे घरी आलेली लक्ष्मी परतावून लावणे!
15
इंडिगो संकटाची मोठी किंमत! DGCAची कठोर कारवाई, निष्काळजीपणा आढळताच ४ अधिकारी निलंबित
16
Vaibhav Suryavanshi : षटकार-चौकारांची 'बरसात'! वादळी शतकासह वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
17
बँक खाते, पेन्शन, टॅक्स स्लॅब ते GST बदल... २०२५ मध्ये पैशांसंबंधी झाले ७ मोठे बदल; तुम्हाला किती फायदा?
18
ब्रह्मोसपेक्षा वेगवान; भारताला मिळणार 300 रशियन R-37M क्षेपणास्त्रे, सुखोई विमानात बसवले जाणार
19
Shashi Tharoor: "पत्नीच्या संमतीशिवाय संबंध ठेवणे वैवाहिक बलात्कारच, पतीला सूट का द्यावी?"- शशी थरूर
20
"शिवराज पाटील यांची अलीकडेच भेट झाली होती, ते..." PM नरेंद्र मोदींनी दिला आठवणींना उजाळा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील तलावांना गणेश विसर्जनानंतर प्रदूषणाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 11:17 IST

नागपुरातील तलावांच्या स्थितीत सुधारणा दिसून येत आहे. मात्र ही स्थिती विसर्जनापूर्वीची आहे. उपायांची कठोर अंमलबजावणी राहिली नाही तर स्थिती पूर्वीप्रमाणे वाईट होण्याची शक्यता ग्रीन व्हिजील संस्थेने व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देपाण्याच्या गुणवत्तेत सुधार, पण...उपायांमुळे आॅक्सिजन, टर्बिडीटीची स्थिती चांगली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकांमध्ये झालेली जागृती व महापालिकेच्या उपाययोजनांमुळे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी नागपुरातील तलावांच्या स्थितीत सुधारणा दिसून येत आहे. विसर्जनाबाबत केलेला धोरणात्मक बदल आणि यावर्षी जलसाठा अधिक असल्याने तलावात शुद्ध आॅक्सिजनचे प्रमाण समाधानकारक असून घातक टर्बिडीटी व आम्लाचे प्रमाण संतुलित आहे. मात्र ही स्थिती विसर्जनापूर्वीची आहे. उपायांची कठोर अंमलबजावणी राहिली नाही तर स्थिती पूर्वीप्रमाणे वाईट होण्याची शक्यता ग्रीन व्हिजील संस्थेने व्यक्त केली आहे.पर्यावरणासाठी काम करणाऱ्या ग्रीन व्हिजील या संस्थेच्या सदस्यांनी नुकतेच शहरातील फुटाळा, सोनेगाव व गांधीसागर या तीन तलावातील पाण्याचे परीक्षण केले. अर्थ इको इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सहकार्याने ग्रीन व्हिजीलतर्फे गेल्या सहा वर्षापासून हे परीक्षण केले जात आहे. यावेळी झालेल्या परीक्षणाबाबत माहिती देताना ग्रीन व्हिजीलच्या टीम लीडर सुरभी जैस्वाल यांनी सांगितले की, पाण्याच्या गुणवत्तेसाठी आवश्यक डिझॉल्व आॅक्सिजनचे प्रमाण, गढूळपणा (टर्बिडीटी) व आम्लाची स्थिती (पीएच लेव्हल) संतुलित प्रमाणात आढळून आले आहे. पाण्याच्या गुणवत्तेसाठी डिझॉल्व आॅक्सिजनचे प्रमाण ५ मिलिग्रॅम/लिटर किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. २०१६ व २०१७ मध्ये विसर्जनापूर्वीच हे प्रमाण फुटाळा तलावात ३.५ मिलिग्रॅम/लिटर, गांधीसागर तलावात ४.५ ते ५ मिलिग्रॅम/लिटरच्या आसपास होते.यावर्षी मात्र हे प्रमाण फुटाळा तलावात ४.५ व गांधीसागर तलावात ५ मिलिग्रॅम/लिटर म्हणजे समाधानकारक म्हणावे असे आहे. याशिवाय गढूळपणाची स्थिती ५० जेटीयू किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. फुटाळा तलावात २०१६ मध्ये गढूळपणा ६० जेटीयू, २०१७ मध्ये ७० जेटीयू होती, जी यावर्षी ६० जेटीयूपेक्षा कमी आहे. गांधीसागर तलाव मागील दोन वर्षी अधिक प्रदूषित होते. दोन्ही वर्षी ७५ जेटीयू एवढी होती, जी यावर्षी ७० पेक्षा खाली आली आहे. याबाबतीत सोनेगाव तलाव नशीबवान ठरला. दोन वर्षापूर्वी विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची निर्मिती चालविलेल्या उपाययोजनांमुळे डिझॉल्व आॅक्सिजन, गढूळपणा व आम्ल स्तराचे प्रमाण संतुलित राहिले आहे. फुटाळा व गांधीसागरमध्ये दोन वर्षात ८.५ पर्यंत गेलेले आम्ल स्तराचे प्रमाण यावेळी ८.२ वर आले आहे. गुणवत्तेसाठी पाण्यात पीएच स्तर ७ वर असणे आदर्श मानले जाते.या परीक्षणात मेहुल कोसुरकर, कल्याणी वैद्य यांच्यासह संस्थेचे अन्य सदस्य व सेवादल महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

जलपर्णी वनस्पतीचा बंदोबस्त गरजेचासोनेगाव तलावाची स्थिती चांगली असली तरी विसर्जनानंतर कृत्रिम तलावाचा गाळ पुन्हा सोनेगाव तलावात सोडला जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे परिस्थिती जैसे थे होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सुरभी जैस्वाल यांनी सांगितले. यातील गांधीसागर तलावाची स्थिती चिंताजनक आहे, त्यामुळे या तलावात विसर्जनाला पूर्णपणे प्रतिबंध लावणे आवश्यक असल्याचे मत सुरभी यांनी व्यक्त केले. तसेच फुटाळा तलावातील जलपर्णी वनस्पतीचा बंदोबस्त करणे आणि विसर्जनावर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. महत्त्वाचे म्हणजे तलाव व वस्त्यांच्या आसपास अधिक कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यासोबत लोकांमध्ये जागृती आणणे महत्त्वाचे असल्याचे सुरभी जैस्वाल यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवFutala Lakeफुटाळा तलाव