शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

शाळकरी विद्यार्थ्यांकडून पालकांना ‘ॲडिनो व्हायरस’चा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2023 21:49 IST

Nagpur News नागपुरात शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये ‘ॲडिनो व्हायरस’ दिसून येत असलातरी बाधित मुलांमध्ये गंभीर लक्षणे नाहीत. मात्र, त्यांच्याकडून पालकांना होणारा संसर्ग अधिक दिवस राहत असल्याने चिंता वाढली आहे.

नागपूर : पश्चिम बंगालमध्ये ‘ॲडिनो व्हायरस’मुळे आतापर्यंत १९ मुलांचा मृत्यू झाला. रुग्णांच्या वाढत्या प्रकरणांमुळे तेथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुलांना मास्क घालण्याचे आवाहन केले. नागपुरातही शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये ‘ॲडिनो व्हायरस’ दिसून येत असलातरी बाधित मुलांमध्ये गंभीर लक्षणे नाहीत. मात्र, त्यांच्याकडून पालकांना होणारा संसर्ग अधिक दिवस राहत असल्याने चिंता वाढली आहे.

-काय आहे ॲडिनो व्हायरस?

‘ॲडिनो व्हायरस’ आपल्याकडे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ते फेब्रुवारी, मार्चपर्यंत दिसून येतो. हा एक सामान्य ‘व्हायरस’ आहे. परंतु कोरोनामुळे मागील दोन वर्षे बंद असलेल्या शाळा आणि घरातच मुले बंद असल्याने या ‘व्हायरस’ला पसरण्यास वाव मिळाला नाही. आता शाळा सुरू झाल्याने आणि त्यात मुलांची रोगप्रतिकारशक्तीही कमी झाल्याने यावर्षी ‘ॲडिनो व्हायरस’चे रुग्ण अधिक प्रमाणत दिसून येत आहे. तज्ज्ञानुसार, मुलांमध्ये हा व्हायरस लवकर बरा होत असलातरी त्यांच्याकडून पालकांमध्ये हा रोग पाच दिवसांपेक्षा अधिक दिवस राहत असल्याचे दिसून येत आहे.

-लक्षणे काय?

सर्दी, ताप, घसा खवखवणे, खोकला, तीव्र ब्राँकायटिस (छातीत सर्दी), डोळे लाल होणे, अशक्तपणा आदी लक्षणे दिसून येतात. काही रुग्णांमध्ये अतिसार, उलट्या, मळमळ, पोटदुखी होते. गंभीर लक्षणांमध्ये निमोनिआ दिसून येतो.

-असा होतो प्रसार

बाधित रुग्णांच्या खोकल्यातून, शिकांतून या व्हायरसचा प्रसार होतो. या शिवाय, ॲडिनो व्हायरस असलेल्या वस्तू किंवा पृष्ठभागास स्पर्श केल्याने व तोच हात तोंडाला लावल्याने आजार पसरतो.

-सुरक्षित कसे राहायचे?

:: किमान २० सेकंद साबण आणि पाण्याने हात धुवा

:: न धुतलेल्या हातांनी डोळे, नाक किंवा तोंडाला स्पर्श करणे टाळा

:: आजारी असलेल्या लोकांशी जवळचा संपर्क टाळा

-प्रतिकारशक्ती महत्त्वाची आहे

ंॲडिनो व्हायरसपासून मुक्त होण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे प्रतिकारशक्ती राखणे.

तुमची रोगप्रतिकारकशक्ती पुरेशी चांगली असल्यास, संसर्ग झाला असला तरीही तुम्ही लवकर बरे होऊ शकता.

-शाळेतून पसरणारा आजार

‘ॲडिनो व्हायरस’ हा सहसा शाळेतील विद्यार्थ्यांकडून घरातील व्यक्तींना होतो. आजार झाल्यास उपचार घेणे, विश्रांती व जास्तीत जास्त द्रव पदार्थांचे सेवन करणे आवश्यक असते. लक्षणे पाहून रुग्णांवर उपचार केले जातात. इन्फेक्शन अधिक वाढल्यास अँटिबायोटिक द्यावे लागते. हा आजार गंभीर नाही. मागील काही आठवड्यांच्या तुलनेत सध्या रुग्णांची संख्या कमी आहे. परंतु लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

-डॉ. अविनाश गावंडे, बालरोगतज्ज्ञ

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस