शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

अवकाळी पावसाने नागपुरातील १०३५.९५ हेक्टर कृषी क्षेत्राचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 14:23 IST

Nagpur news गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा गहू, फळपिके आणि हरभरा पिकांना मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील १०३५.९५ हेक्टर कृषी क्षेत्राचे नुकसान झाले असून, पावसाने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देगहू आणि फळपिकांचे नुकसान अधिक हरभरा अंकुरला, गव्हाची गुणवत्ता पावसाने घटली

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा गहू, फळपिके आणि हरभरा पिकांना मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील १०३५.९५ हेक्टर कृषी क्षेत्राचे नुकसान झाले असून, पावसाने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

सावनेर, कळमेश्वर, पारशिवनी आणि उमरेड या चार तालुक्यांना अवकाळीचा अधिक फटका बसला आहे. यंदाच्या हंगामात नागपूर जिल्ह्यात रबीमध्ये १८ हजार ९१०६.८१ हेक्टरवर लागवड झाली. सर्वाधिक पेरा हरभरा पिकाचा ८९ हजार ४०९.२१ हेक्टरवर झाला. त्यापाठोपाठ गव्हाची लागवड ८६ हजार ६८६.३५ हेक्टरवर करण्यात आली आहे.

जिल्ह्यात यंदा उन्हाळी हंगामातही चांगली पेरणी झाली. १६ मार्चअखेर ३,७४२.७५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे.

१७ ते २१ मार्चदरम्यान पाच दिवस जिल्ह्यात पाऊस आला. मार्च महिन्यातील सरासरी पाऊस १४.५ मिमी नोंदविला जातो. मात्र या पाच दिवसाच्या काळात सरासरीपेक्षा अधिक १७.६९ मिमी पाऊस पडला. वादळी वारे, गारा, विजा यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले.

कळमेश्वर तालुक्यात डोरली गंगा, दहेगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर वादळी पाऊस आणि गारपीट झाली. या तालुक्यात गहू, हरभरा, भाजीपाला पिकांचे ३३ टक्के नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. पारशिवनी तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे मोसंबी पिकांचे २० ते ३० टक्के नुकसान झाले आहे. यासोबतच उमरेड तालुक्यातही ५ ते १० टक्के गव्हाचे नुकसान झाले. जोराच्या वाऱ्यामुळे गहू मोडला. फळपिकांचे व भाजीपाल्याचे अतोनात नुकसान झाले. सावनेर तालुक्यातही फळगळ झाली. यामुळे पिकाची टक्केवारी घटणार आहे. वादळामुळे पिकांचे नुकसान अधिक आहे.

गव्हाची गुणवत्ता घटली, हरभरा अंकुरला

सततच्या पावसाचा गव्हावर विपरीत परिणाम झाला. पावसात सापडल्यामुळे दाना भिजला. त्याच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. गहू पांढरट पडणार असल्याने दरावरही परिणाम पडणार आहे. ५ ते १० टक्क्यांपेक्षा अधिक गुणवत्ता बाधित झाली आहे. यासोबतच हरभरा गळाला आहे. अनेक शेतातील माल काढणीला आला होता. मात्र पावसात सापडल्याने दाना अंकुरला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा हा माल वाया गेला आहे.

 

टॅग्स :agricultureशेती