शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

अवकाळी पावसाने नागपुरातील १०३५.९५ हेक्टर कृषी क्षेत्राचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 14:23 IST

Nagpur news गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा गहू, फळपिके आणि हरभरा पिकांना मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील १०३५.९५ हेक्टर कृषी क्षेत्राचे नुकसान झाले असून, पावसाने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देगहू आणि फळपिकांचे नुकसान अधिक हरभरा अंकुरला, गव्हाची गुणवत्ता पावसाने घटली

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा गहू, फळपिके आणि हरभरा पिकांना मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील १०३५.९५ हेक्टर कृषी क्षेत्राचे नुकसान झाले असून, पावसाने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

सावनेर, कळमेश्वर, पारशिवनी आणि उमरेड या चार तालुक्यांना अवकाळीचा अधिक फटका बसला आहे. यंदाच्या हंगामात नागपूर जिल्ह्यात रबीमध्ये १८ हजार ९१०६.८१ हेक्टरवर लागवड झाली. सर्वाधिक पेरा हरभरा पिकाचा ८९ हजार ४०९.२१ हेक्टरवर झाला. त्यापाठोपाठ गव्हाची लागवड ८६ हजार ६८६.३५ हेक्टरवर करण्यात आली आहे.

जिल्ह्यात यंदा उन्हाळी हंगामातही चांगली पेरणी झाली. १६ मार्चअखेर ३,७४२.७५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे.

१७ ते २१ मार्चदरम्यान पाच दिवस जिल्ह्यात पाऊस आला. मार्च महिन्यातील सरासरी पाऊस १४.५ मिमी नोंदविला जातो. मात्र या पाच दिवसाच्या काळात सरासरीपेक्षा अधिक १७.६९ मिमी पाऊस पडला. वादळी वारे, गारा, विजा यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले.

कळमेश्वर तालुक्यात डोरली गंगा, दहेगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर वादळी पाऊस आणि गारपीट झाली. या तालुक्यात गहू, हरभरा, भाजीपाला पिकांचे ३३ टक्के नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. पारशिवनी तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे मोसंबी पिकांचे २० ते ३० टक्के नुकसान झाले आहे. यासोबतच उमरेड तालुक्यातही ५ ते १० टक्के गव्हाचे नुकसान झाले. जोराच्या वाऱ्यामुळे गहू मोडला. फळपिकांचे व भाजीपाल्याचे अतोनात नुकसान झाले. सावनेर तालुक्यातही फळगळ झाली. यामुळे पिकाची टक्केवारी घटणार आहे. वादळामुळे पिकांचे नुकसान अधिक आहे.

गव्हाची गुणवत्ता घटली, हरभरा अंकुरला

सततच्या पावसाचा गव्हावर विपरीत परिणाम झाला. पावसात सापडल्यामुळे दाना भिजला. त्याच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. गहू पांढरट पडणार असल्याने दरावरही परिणाम पडणार आहे. ५ ते १० टक्क्यांपेक्षा अधिक गुणवत्ता बाधित झाली आहे. यासोबतच हरभरा गळाला आहे. अनेक शेतातील माल काढणीला आला होता. मात्र पावसात सापडल्याने दाना अंकुरला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा हा माल वाया गेला आहे.

 

टॅग्स :agricultureशेती