शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने नागपुरातील १०३५.९५ हेक्टर कृषी क्षेत्राचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 14:23 IST

Nagpur news गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा गहू, फळपिके आणि हरभरा पिकांना मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील १०३५.९५ हेक्टर कृषी क्षेत्राचे नुकसान झाले असून, पावसाने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देगहू आणि फळपिकांचे नुकसान अधिक हरभरा अंकुरला, गव्हाची गुणवत्ता पावसाने घटली

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा गहू, फळपिके आणि हरभरा पिकांना मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील १०३५.९५ हेक्टर कृषी क्षेत्राचे नुकसान झाले असून, पावसाने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

सावनेर, कळमेश्वर, पारशिवनी आणि उमरेड या चार तालुक्यांना अवकाळीचा अधिक फटका बसला आहे. यंदाच्या हंगामात नागपूर जिल्ह्यात रबीमध्ये १८ हजार ९१०६.८१ हेक्टरवर लागवड झाली. सर्वाधिक पेरा हरभरा पिकाचा ८९ हजार ४०९.२१ हेक्टरवर झाला. त्यापाठोपाठ गव्हाची लागवड ८६ हजार ६८६.३५ हेक्टरवर करण्यात आली आहे.

जिल्ह्यात यंदा उन्हाळी हंगामातही चांगली पेरणी झाली. १६ मार्चअखेर ३,७४२.७५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे.

१७ ते २१ मार्चदरम्यान पाच दिवस जिल्ह्यात पाऊस आला. मार्च महिन्यातील सरासरी पाऊस १४.५ मिमी नोंदविला जातो. मात्र या पाच दिवसाच्या काळात सरासरीपेक्षा अधिक १७.६९ मिमी पाऊस पडला. वादळी वारे, गारा, विजा यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले.

कळमेश्वर तालुक्यात डोरली गंगा, दहेगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर वादळी पाऊस आणि गारपीट झाली. या तालुक्यात गहू, हरभरा, भाजीपाला पिकांचे ३३ टक्के नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. पारशिवनी तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे मोसंबी पिकांचे २० ते ३० टक्के नुकसान झाले आहे. यासोबतच उमरेड तालुक्यातही ५ ते १० टक्के गव्हाचे नुकसान झाले. जोराच्या वाऱ्यामुळे गहू मोडला. फळपिकांचे व भाजीपाल्याचे अतोनात नुकसान झाले. सावनेर तालुक्यातही फळगळ झाली. यामुळे पिकाची टक्केवारी घटणार आहे. वादळामुळे पिकांचे नुकसान अधिक आहे.

गव्हाची गुणवत्ता घटली, हरभरा अंकुरला

सततच्या पावसाचा गव्हावर विपरीत परिणाम झाला. पावसात सापडल्यामुळे दाना भिजला. त्याच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. गहू पांढरट पडणार असल्याने दरावरही परिणाम पडणार आहे. ५ ते १० टक्क्यांपेक्षा अधिक गुणवत्ता बाधित झाली आहे. यासोबतच हरभरा गळाला आहे. अनेक शेतातील माल काढणीला आला होता. मात्र पावसात सापडल्याने दाना अंकुरला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा हा माल वाया गेला आहे.

 

टॅग्स :agricultureशेती