शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू प्रतीकांना विराेध करण्यात दलितांनी वेळ घालवू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 11:38 IST

Nagpur News हिंदू प्रतीकांना विराेध करण्यात वेळ घालविण्यापेक्षा आपले प्रश्न काय आणि ते कसे साेडविता येतील, याकडे दलितांनी लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन ‘सरस्वती सन्मान’ प्राप्त साहित्यिक डाॅ. शरणकुमार लिंबाळे यांनी केले.

ठळक मुद्देपुराेगामी समाज शाेधावा लागण्याची खंत

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सरस्वती पूजन असाे की सरस्वती सन्मान असाे, हिंदू देवदेवतांच्या प्रतिमा, प्रतीकांची हेटाळणी करण्यात आता अर्थ नाही. या प्रतीकांची अवहेलना करण्यात पूर्ण पिढी संपून जाते. हिंदू प्रतीकांना विराेध करण्यात वेळ घालविण्यापेक्षा आपले प्रश्न काय आणि ते कसे साेडविता येतील, याकडे दलितांनी लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन ‘सरस्वती सन्मान’ प्राप्त साहित्यिक डाॅ. शरणकुमार लिंबाळे यांनी केले. (Dalits should not spend time opposing Hindu symbols)

सरस्वती पूजनाच्या कारणावरून ज्येष्ठ साहित्यिक, कवी यशवंत मनाेहर यांनी विदर्भ साहित्य संघाचा सत्कार नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर संघाचाच सत्कार स्वीकारणाऱ्या डाॅ. लिंबाळे यांनी हे विधान केले. यावेळी झालेल्या प्रकट मुलाखतीदरम्यान दलित आणि सवर्णांमध्ये दरी निर्माण झाली असून, ती दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. दलितांचे प्रश्न दलितांनीच साेडवावे असे नाही, तर सवर्णांनीही ते साेडविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. जातीच्या पलीकडे जाऊन माणूसपणाची संवेदना का विसरता, असा सवाल त्यांनी केला. पूर्वीप्रमाणे आता व्यक्ती किंवा समाजाकडून अत्याचार हाेत नाही तर सामुदायिक शाेषण हाेत आहे व त्याविराेधात दलित व सवर्णांनी एकत्रित येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

सध्या दलित, आंबेडकरी साहित्यात साचलेपणा आला आहे. पूर्वी जाेरकसपणे चळवळी चालायच्या. त्या प्रश्नांना घेऊन दलित साहित्य भिडत असे. आता चळवळी बंद झाल्या आणि साहित्यही थांबले. आता नव्या प्रश्नांवर दलित चळवळी उभ्या झाल्या की दमदार साहित्य निर्माण हाेईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. आज पुराेगामी समाज संपला की काय, असे वाटते. कारण, पुराेगामी विचारांची माणसे शाेधावी लागतात, अशी खंत डाॅ. लिंबाळे यांनी व्यक्त केली. सरसकट सवर्णांचा विराेध करणे याेग्य नाही. कारण, सवर्णांमधील पुराेगामी लाेकांचा विराेध करता येत नाही. मात्र, दलित साहित्याची सवर्ण आणि दलित लेखकांकडूनही समीक्षा हाेत नसल्याची खंत डाॅ. लिंबाळेंनी व्यक्त केली. वृषाली देशपांडे आणि ॲड. स्नेहल शिंदे यांनी डाॅ. लिंबाळे यांची मुलाखत घेतली. वि. सा. संघाचे कार्याध्यक्ष रवींद्र शाेभणे यांनी प्रास्ताविक केले इंद्रजित ओरके यांनी आभार मानले.

सवर्णांपेक्षा दलितांचे साैंदर्यशास्त्र श्रेष्ठच

दलितांचे व सवर्णांचे साैंदर्यशास्त्र वेगवेगळे असते. सवर्णांचे साैंदर्यशास्त्र आनंदावर अवलंबून असते. मात्र, दलितांचे साैंदर्यशास्त्र अन्यायाची अस्वस्थता मांडणारे असते. ‘बलुतं’, ‘उपरा’ वाचून आनंद नाही, अस्वस्थता निर्माण हाेईल. भगतसिंगांचे साैंदर्यशास्त्र हे देशाच्या स्वातंत्र्यात हाेते. दलितांचे साैंदर्यशास्त्र अन्याय, अत्याचाराविरुद्ध क्रांती निर्माण करणारे आहे. स्वातंत्र्याचा विचार कधीही आनंदाच्या साैंदर्यशास्त्रापेक्षा श्रेष्ठ असताे, अशी भावना डाॅ. लिंबाळे यांनी व्यक्त केली.

दलित शब्दाला विराेध कशासाठी?

दलित हा शब्द शाेषित, पीडित, पिचलेल्या, अन्यायग्रस्त समाजाचे प्रतीक आहे. दलित हे ब्राह्मण किंवा कुठल्याही समाजाचे असू शकतात. या शब्दावर इतकी वर्षे चळवळ उभी राहिली व चालली आहे. या भरवशावरच अन्यायाला वाचा फाेडली गेली, त्या शब्दाला विराेध कशासाठी, असा सवाल करीत त्यांनी दलित शब्दाला विराेध करणाऱ्यांचा समाचार घेतला.

टॅग्स :literatureसाहित्य