शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

दलित, मुस्लिम व्यक्तीला सरसंघचालक करावे

By admin | Updated: April 3, 2016 03:52 IST

शोषणमुक्त व समरसता असलेला भारत हवा, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणतात.

बी.जी. कोळसे पाटील : ‘देशप्रेम व देशद्रोहाचे सिद्धांत’ यावर परिसंवादनागपूर : शोषणमुक्त व समरसता असलेला भारत हवा, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणतात. जर त्यांना खरेच असे वाटत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा व एखाद्या दलित किंवा मुस्लिम व्यक्तीला सरसंघचालकपदी बसवावे, असे मत ‘आरएसएसमुक्त भारत अभियान’चे प्रवर्तक माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील यांनी व्यक्त केले. देश बचाओ आघाडीतर्फे ‘देशप्रेम आणि देशद्रोहाचे सिद्धांत’ या विषयावर परिसंवादाचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.धनवटे नॅशनल कॉलेज येथील डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित या परिसंवादाला दिल्ली विद्यापीठातील प्रा.अपूर्वानंद तसेच राजकीय चळवळीत सक्रिय असलेल्या कविता कृष्णन, देश बचाओ आघाडीचे संयोजक विरा साथीदार हे प्रामुख्याने उपस्थित होते. देशातील सद्यस्थितीच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीवर या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. आज देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती घातक आहे. समाजाचे धृवीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिक्षणप्रणालीवरदेखील आघात सुरू आहे. अशा स्थितीत सर्व विचारवंतांनी एकत्रित याचा विरोध करण्याची आवश्यकता आहे. परंतु दुर्दैवाने असे होताना दिसत नाही. विचारांचा सामना विचारांनी होत नाही. धर्मांध विचारांच्या विरोधात आपण कामच करत नाहीत. विचारवंतदेखील जीवाच्या भीतीमुळे लाचार झालेले दिसतात. परंतु मी मात्र लढत राहणार, असे प्रतिपादन बी.जी.कोळसे पाटील यांनी केले.कुठलाही वादग्रस्त मुद्दा असला तरी प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे. लोकशाहीमध्ये हेच अपेक्षित आहे. कोणावर आपले म्हणणे लादणे योग्य नाहीच. परंतु कमीतकमी समोरच्याचे मत ऐकून घेण्याची तयारी असली पाहिजे. विचारांच्या बदल्यात जर हिंसेने उत्तर मिळणार असेल तर ही अराजकतेची सुरुवात आहे, असे मानले पाहिजे, असे वक्तव्य प्रा.अपूर्वानंद यांनी केले.देशभक्ती व देशप्रेम या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. देशप्रेम मनातून यावे लागते तर देशभक्ती काही वेळा लादल्या दाते. देशात सध्या देशभक्तीवर भर दिला जात आहे. परंतु समजून व विचार करून देशप्रेम करण्याची गरज असल्याचे कविता कृष्णन म्हणाल्या. वीरा साथीदार यांनी यावेळी परिसंवादाची प्रस्तावना मांडत संचालनदेखील केले.(प्रतिनिधी)