शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर आजपासून १२ दिवस विशेष रात्रकालीन ब्लॉक
2
"...त्यावर अमित शाहांना हसू आवरलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका
3
अदानी समूहानं तयार केल्या २ नव्या कंपन्या, काय करणार काम? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
IND vs SA : बुमराहनं मार्करमसाठी जाळं विणलं; पण KL राहुलनं स्लिपमध्ये झोपा काढत त्यावर पाणी फेरलं!
5
श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत अडचणीत, २५२ कोटींच्या ड्रग्स केसप्रकरणी मुंबई पोलिसांनी पाठवलं समन्स'
6
धक्कादायक! मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केली, मृतदेह तलावात फेकून दिला
7
Tarot Card: लोभाला बळी पडू नका, मनाचा कौल घ्या; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
8
एअर शोचा व्हिडीओ पाहण्यासाठी वडील युट्यूबवर शोधत होते; अचानक विंग कमांडरांच्या मृत्यूची बातमी दिसली
9
पाकिस्तानच्या तुरुंगातील खलाशांना आणा, राज्य शासनाकडे मागणी; १८ मच्छीमार तुरुंगातच!
10
Mumbai: देवदर्शनाहून परत येताना मुलाचा ट्रेनमधून पडून मृत्यू; तब्बल १७ वर्षांनी पालकांना नुकसानभरपाई!
11
सूरज चव्हाणनंतर 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचं लग्न ठरलं, बॉयफ्रेंडसोबत मार्चमध्ये अडकणार विवाहबंधनात?
12
Maratha Reservation: मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची आवश्यकता तरी काय? उच्च न्यायालयात युक्तिवाद 
13
४९०, ५१० किंवा ५२० रुपयांचं पेट्रोल-डिझेल टाकल्यानं फरक पडतो का? फसवणुकीपासून वाचायचं असेल तर 'या' २ गोष्टींकडे लक्ष द्या
14
IND vs SA 2nd Test : पंतही ठरला कमनशिबी! टीम इंडिया 'या' दोन बदलासह उतरली मैदानात
15
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
16
भारताविरुद्ध कारवायांसाठी पाकिस्तान बांगलादेशचा वापर करत असल्याचा आरोप; आयएसआयकडून तरुणांना प्रशिक्षण
17
Nerul: 'महाराजांवर राजकारण नको', गणेश नाईकांची अमित ठाकरेंवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी
18
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
19
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
Daily Top 2Weekly Top 5

दररोज ३५०० कोटी रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर अडून बसलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाने पंजाबला जे वळण दिले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर अडून बसलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाने पंजाबला जे वळण दिले आहे, त्यामुळे पंजाबची प्रतिमा मलिन होत आहे. पंजाब आणि नजीकच्या सीमावर्ती हरियाणाच्या काही जिल्ह्यांमध्ये तथाकथित शेतकरी मोबाईल टॉवर्स बंद करण्यात मश्गूल आहेत. पेट्रोल पंप आणि स्टोर्स उघडू दिले जात नाहीए. जाणकारांच्या मते, उद्योग विरोधी पोस्टर्सचा धुमाकूळ असलेल्या या आंदोलनाचा फटका केवळ मोबाईल कंपन्यांनाच होत आहे असे नाही तर यामुळे उद्योगधंदेही डबघाईला आले आहेत. एसोचैमच्या आकलनानुसार शेतकरी आंदोलनाने उद्योग धंद्यांना दररोज ३५०० कोटी रुपयांचा फटका बसत आहे.

मोबाईल टॉवर बंद केल्याने ऑनलाईन व्यवसायाशी निगडित नागरिकांचे भविष्य अंधकारात गेले आहे. सोबतच विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लासेसही बंद पडले आहेत. कोरोना महामारीच्या काळात वर्क फ्रॉम होमचा विचारही डब्बाबंद पडला आहे. विशेषज्ञांच्या मतानुसार आंदोलनाची आग आता पंजाबच्या अंतर्गत भागातही पोहोचलेली आहे. लहान-मोठे व्यवसाय करणाऱ्या नागरिकांसोबतच पंजाबचा प्रसिद्ध होजियरी उद्योगही आंदोलनामुळे डबघाईला आला आहे. एवढेच नव्हे तर स्वत: शेतकऱ्यांनाही येणाऱ्या काही दिवसांत विद्युत संकटाचा सामना करावा लागणार आहे. मुख्यमंत्री कोणत्याही पक्षाचा का असेना, त्यांचे प्रयत्न पंजाबमध्ये गुंतवणूक आणण्याचे असतात. परंतु, दुर्दैवाने आंदोलनाच्या काळात सर्वच पक्षांचे नेते गप्प बसले आहेत. व्होट बँकेसाठी पंजाबमध्ये उद्योगधंदे आणि शेतकऱ्यांना एकमेकांच्या विरोधात उभे करणारे पंजाबचे नुकसान करणार असल्याचे मत पंजाबचे हितचिंतक व्यक्त करत आहेत. पंजाबमधील औद्योगिकीकरण नष्ट करून ते पंजाबसोबतच शेतकऱ्यांचेही नुकसानच करणार आहेत. बंगालमध्येही उद्योगधंद्यांना अशाच तऱ्हेने विरोध केला गेला आणि आज ते राज्य आर्थिक विवंचनेत राहिले आहे. ही बाब शेतकऱ्यांनी समजून घेणे गरजेचे आहे. त्यांचा उपयोग केवळ राजकीय शस्त्र म्हणून केला जात असल्याची भावनाही व्यक्त केली जात आहे.

शेतकऱ्यांचे सुरू असलेले हे आंदोलन पं. बंगालमधील सिंगुल जमीन विवादाचे स्मरण करून देत आहे. त्या आंदोलनाचे भोग संपूर्ण बंगालला भोगावे लागले होते आणि टाटाचा नॅनो प्लांट गुजरातमध्ये शिफ्ट करण्यात आला होता. त्याचा फटका सिंगुलमधील शेतकऱ्यांना बसला आणि आज ते अत्यंत बिकट परिस्थितीत जगत आहेत. विशेष म्हणजे, ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री पदावर येताच टाटा कंपनीला बंगालमध्ये मोठे उद्योग आणण्यासाठी आमंत्रित केले होते. पंजाबने प. बंगालकडून शिकवण घेणे गरजेचे आहे.

.........