शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

शेती पक्षपाताच्या चक्रव्यूहात

By admin | Updated: November 20, 2014 01:01 IST

विदर्भातील शेती शासकीय पक्षपाताच्या चक्रव्यूहात अडकली आहे. यामुळे कृषी क्षेत्रातील अनुशेष सतत वाढत आहे. कृषी सवलत, निधी पुरवठा, कृषिपंपांना वीज जोडणी इत्यादीबाबत विदर्भावर अन्याय करण्यात येत आहे,

हायकोर्टाची दखल : स्वत:हून दाखल केली जनहित याचिकानागपूर : विदर्भातील शेती शासकीय पक्षपाताच्या चक्रव्यूहात अडकली आहे. यामुळे कृषी क्षेत्रातील अनुशेष सतत वाढत आहे. कृषी सवलत, निधी पुरवठा, कृषिपंपांना वीज जोडणी इत्यादीबाबत विदर्भावर अन्याय करण्यात येत आहे, असा आरोप अनुशेषाचे अभ्यासक माजी मंत्री अ‍ॅड. मधुकर किंमतकर यांनी काही महिन्यांपूर्वी पत्रकार परिषदेत केला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या प्रकरणाची दखल घेऊन स्वत:हून जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी आज, बुधवारी प्रकरण हाताळण्यासाठी वरिष्ठ वकील सी.एस. कप्तान यांची न्यायालयीन मित्र म्हणून नियुक्ती केली.विदर्भातील अनुशेष सतत वाढत आहे. विदर्भात ६५ टक्के वीजनिर्मिती होत असली तरी येथील शेतीला मात्र केवळ १४ टक्के वीज मिळते. नागपूर विभागात १०.९०, तर अमरावती विभागात १७.३७ टक्के क्षेत्रालाच वीज पुरवठा होतो. पुणेमध्ये २०.२८, तर नाशिकमध्ये २०.२८ टक्के क्षेत्रात वीज पुरवठा आहे. हजार हेक्टर कृषीक्षेत्रामागे वीज वापरण्याचे प्रमाण पाहिल्यास पुणे (१८२४.६५ युनिट्स) आघाडीवर आहे. यानंतर नाशिक (१७८७.९८ युनिट्स) व मराठवाड्याचा (१०८९.१८ युनिट्स) क्रमांक लागतो. अमरावती विभागात ७००, तर नागपूर विभागात ४९९.२० युनिट्चा वापर आहे. विदर्भात आजच्या घडीला ६ लाख ९० हजार ५३१ कृषिपंपांचा अनुशेष आहे. कृषिपंप जोडणीचे अर्ज पैसे भरूनही प्रलंबित ठेवण्यात येतात. मार्च २०१४ पर्यंत एकूण ६५ हजार ६४८ अर्ज प्रलंबित होते. यापैकी ५५ हजार ४४३ अर्जदारांना पैसे भरूनही जोडणी दिली गेली नाही. २०१३-१४ मध्ये केवळ २५ हजार ८५९ कृषिपंपाना जोडणी देण्यात आली. यावर्षी १ एप्रिलपर्यंत १९ हजार अर्ज आले. यातील १५ हजार ११ शेतकऱ्यांनी पैसे भरले आहेत. परंतु त्यांना वीज जोडणी मिळाली नाही, असे अ‍ॅड. किंमतकर यांचे म्हणणे आहे. शासनातर्फे अ‍ॅड. नहुष खुबाळकर यांनी कामकाज पाहिले.कालव्यांची दुरुस्ती नाहीकालवे दुरुस्त केले जात नसल्यामुळे शेकडो लिटर पाणी व्यर्थ जात आहे. शेतकऱ्यांकडून वसूल करण्यात येणाऱ्या पाणीपट्टीतून कालव्यांची देखभाल व दुरुस्ती करण्याचे नियोजन असते. ही वसुली केल्यानंतरही दुरुस्ती करण्यात येत नाही. परिणामी विदर्भातील जवळपास एक तृतीयांश पाण्याचा वापर करण्यासाठी प्रकल्पांचे नियोजनच होत नाही.(प्रतिनिधी)