शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

सुरक्षा आली धोक्यात : सायबर हल्ल्यातून डेटावर डल्ला, वर्षभरात २० लाख घटना

By योगेश पांडे | Updated: March 10, 2025 08:47 IST

पाच वर्षांतच ७६ टक्क्यांनी वाढ

योगेश पांडे 

नागपूर : सबकुछ ऑनलाइनच्या युगात सायबर गुन्ह्यांचे प्रमाणदेखील वाढीस लागले आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग करूनच डेटा चोरी, हॅकिंग, ऑनलाइन ठकबाजी, असे प्रकार वाढीस लागले आहेत. २०२४ मध्ये वर्षभरातच देशात २० लाखांहून अधिक वेळा विविध आस्थापनांच्या सायबर सुरक्षेवर हल्ला करण्यात आला. आश्चर्याची बाब म्हणजे मागील पाच वर्षात सायबर सुरक्षा धोक्यात येण्याच्या प्रकरणांमध्ये तब्बल ७६ टक्क्यांची वाढ झाली आहे.

इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून सायबर सुरक्षा घटनांसंदर्भात 'सर्ट-इन'कडे (इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम) जबाबदारी देण्यात आली. 'सर्ट-इन'च्या आकडेवारीतून ही बाब पुढे आली आहे.

व्यवस्थापन आराखड्याची अंमलबजावणी कधी? 

'सर्ट-इन'तर्फे सायबर हल्ले तसेच सायबर दहशतवादाविरोधात सामना करण्यासाठी सायबर संकट व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. केंद्र, राज्य सरकारांसह विविध क्षेत्रांच्या सर्व मंत्रालये / विभागांनी याला राबविणे अभिप्रेत आहे. मात्र, या आराखड्याची अंमलबजावणी होणार तरी कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मार्गदर्शक तत्त्वे जारी पण... 

२०२० साली देशातील विविध आस्थापनांमधील सायबर सुरक्षा धोक्यात आल्याच्या ११ लाख ५८ हजार २०८ घटना घडल्या होत्या. त्यानंतर यात सातत्याने वाढ होती गेली. 'सर्ट-इन'कडे या सर्व घटनांची नोंद झाली आहे. 

जून २०२३ मध्ये 'सर्ट-इन'ने सरकारी संस्थांसाठी सायबर सुरक्षा पद्धतींबद्दल मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. यात डेटा सुरक्षा, नेटवर्क सुरक्षा, ओळख आणि प्रवेश व्यवस्थापन, थर्ड-पार्टी आउटसोर्सिंग, सुरक्षा देखरेख, सुरक्षा ऑडिटिंग यांचा समावेश होता. या बाबी गंभीरतेने घेतल्या गेल्या नाहीत.