शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा आली धोक्यात : सायबर हल्ल्यातून डेटावर डल्ला, वर्षभरात २० लाख घटना

By योगेश पांडे | Updated: March 10, 2025 08:47 IST

पाच वर्षांतच ७६ टक्क्यांनी वाढ

योगेश पांडे 

नागपूर : सबकुछ ऑनलाइनच्या युगात सायबर गुन्ह्यांचे प्रमाणदेखील वाढीस लागले आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग करूनच डेटा चोरी, हॅकिंग, ऑनलाइन ठकबाजी, असे प्रकार वाढीस लागले आहेत. २०२४ मध्ये वर्षभरातच देशात २० लाखांहून अधिक वेळा विविध आस्थापनांच्या सायबर सुरक्षेवर हल्ला करण्यात आला. आश्चर्याची बाब म्हणजे मागील पाच वर्षात सायबर सुरक्षा धोक्यात येण्याच्या प्रकरणांमध्ये तब्बल ७६ टक्क्यांची वाढ झाली आहे.

इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून सायबर सुरक्षा घटनांसंदर्भात 'सर्ट-इन'कडे (इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम) जबाबदारी देण्यात आली. 'सर्ट-इन'च्या आकडेवारीतून ही बाब पुढे आली आहे.

व्यवस्थापन आराखड्याची अंमलबजावणी कधी? 

'सर्ट-इन'तर्फे सायबर हल्ले तसेच सायबर दहशतवादाविरोधात सामना करण्यासाठी सायबर संकट व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. केंद्र, राज्य सरकारांसह विविध क्षेत्रांच्या सर्व मंत्रालये / विभागांनी याला राबविणे अभिप्रेत आहे. मात्र, या आराखड्याची अंमलबजावणी होणार तरी कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मार्गदर्शक तत्त्वे जारी पण... 

२०२० साली देशातील विविध आस्थापनांमधील सायबर सुरक्षा धोक्यात आल्याच्या ११ लाख ५८ हजार २०८ घटना घडल्या होत्या. त्यानंतर यात सातत्याने वाढ होती गेली. 'सर्ट-इन'कडे या सर्व घटनांची नोंद झाली आहे. 

जून २०२३ मध्ये 'सर्ट-इन'ने सरकारी संस्थांसाठी सायबर सुरक्षा पद्धतींबद्दल मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. यात डेटा सुरक्षा, नेटवर्क सुरक्षा, ओळख आणि प्रवेश व्यवस्थापन, थर्ड-पार्टी आउटसोर्सिंग, सुरक्षा देखरेख, सुरक्षा ऑडिटिंग यांचा समावेश होता. या बाबी गंभीरतेने घेतल्या गेल्या नाहीत.