शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सुरक्षा आली धोक्यात : सायबर हल्ल्यातून डेटावर डल्ला, वर्षभरात २० लाख घटना

By योगेश पांडे | Updated: March 10, 2025 08:47 IST

पाच वर्षांतच ७६ टक्क्यांनी वाढ

योगेश पांडे 

नागपूर : सबकुछ ऑनलाइनच्या युगात सायबर गुन्ह्यांचे प्रमाणदेखील वाढीस लागले आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग करूनच डेटा चोरी, हॅकिंग, ऑनलाइन ठकबाजी, असे प्रकार वाढीस लागले आहेत. २०२४ मध्ये वर्षभरातच देशात २० लाखांहून अधिक वेळा विविध आस्थापनांच्या सायबर सुरक्षेवर हल्ला करण्यात आला. आश्चर्याची बाब म्हणजे मागील पाच वर्षात सायबर सुरक्षा धोक्यात येण्याच्या प्रकरणांमध्ये तब्बल ७६ टक्क्यांची वाढ झाली आहे.

इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून सायबर सुरक्षा घटनांसंदर्भात 'सर्ट-इन'कडे (इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम) जबाबदारी देण्यात आली. 'सर्ट-इन'च्या आकडेवारीतून ही बाब पुढे आली आहे.

व्यवस्थापन आराखड्याची अंमलबजावणी कधी? 

'सर्ट-इन'तर्फे सायबर हल्ले तसेच सायबर दहशतवादाविरोधात सामना करण्यासाठी सायबर संकट व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. केंद्र, राज्य सरकारांसह विविध क्षेत्रांच्या सर्व मंत्रालये / विभागांनी याला राबविणे अभिप्रेत आहे. मात्र, या आराखड्याची अंमलबजावणी होणार तरी कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मार्गदर्शक तत्त्वे जारी पण... 

२०२० साली देशातील विविध आस्थापनांमधील सायबर सुरक्षा धोक्यात आल्याच्या ११ लाख ५८ हजार २०८ घटना घडल्या होत्या. त्यानंतर यात सातत्याने वाढ होती गेली. 'सर्ट-इन'कडे या सर्व घटनांची नोंद झाली आहे. 

जून २०२३ मध्ये 'सर्ट-इन'ने सरकारी संस्थांसाठी सायबर सुरक्षा पद्धतींबद्दल मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. यात डेटा सुरक्षा, नेटवर्क सुरक्षा, ओळख आणि प्रवेश व्यवस्थापन, थर्ड-पार्टी आउटसोर्सिंग, सुरक्षा देखरेख, सुरक्षा ऑडिटिंग यांचा समावेश होता. या बाबी गंभीरतेने घेतल्या गेल्या नाहीत.