शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

प्रभागाची आखणी की विरोधकांची कापणी?

By admin | Updated: June 6, 2016 03:00 IST

महापालिकेची आगामी निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होत असल्याचे शासकीय परिपत्रक जारी झाल्याने संभाव्य

कमलेश वानखेडे ल्ल नागपूरमहापालिकेची आगामी निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होत असल्याचे शासकीय परिपत्रक जारी झाल्याने संभाव्य प्रभागांची रचना करण्यासाठी महापालिका प्रशासन कामाला लागले आहे. ही जबाबदारी पूर्णपणे प्रशसनाच्य हाती असली तरी राज्य व महापालिकेत भाजपची सत्ता असल्यामुळे भाजपनेते प्रशासनाला अप्रत्यपक्षपणे हाताशी धरून विरोधी सदस्य अडचणीत येतील, अशी प्रभाग रचना करतील, असा धोका विरोधकांना वाटत आहे. त्यामुळे विरोधक या प्रक्रियेवर लक्ष ठेवून असून असे काही घडले तर त्याला न्यायालयात आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे.महापालिकेत चार सदस्यीय प्रभागाची आखणी करताना लोकसंख्या, भूप्रदेश, नैसर्गिक सीमा, मुख्य रस्ते आदी निकष पाळावे लागणार आहेत. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेले दोन सलग प्रभाग जोडून एक नवा चार सदस्यीय प्रभाग तयार केला जाण्याची शक्यता कमीच आहे. दोन सलग प्रभाग जोडतानाही निकषांची पूर्ती करताना त्यात बरेच फेरबदल केले जातील. या फेरबदलात काँग्रेससह विरोधी सदस्य असलेल्या प्रभागांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून ‘गेम’ केला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एखाद्या प्रभागातील एखाद्या भागात काँग्रेस, राष्ट्रवादी, बसपाच्या उमेदवाराला एकतर्फी मते मिळाली असतील तर नेमका तेवढा भाग शेजारच्या भाजपबहुल प्रभागाशी जोडता येईल का, याची भाजपकडून चाचपणी केली जाईल व शक्य असेल तेथे तसे केलेही जाईल, अशी काँग्रेसला शंका आहे. एकदा प्रभाग रचनेचा आराखडा तयार झाला की नंतर त्यावर आक्षेप व सूचना मागविल्या जातात. मात्र, सुनावणी नंतरही त्यात फारसा काही बदल होत नाही, असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे आतापासूनच प्रभाग रचना करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेवर लक्ष ठेवण्याची रणनीती काँग्रेससह विरोधी पक्षांनी आखली आहे. कमी फरकाचे प्रभाग भाजपसाठीही अडचणीचेसध्याची प्रभाग रचना व विजयी झालेले नगरसेवक पाहता महापालिकेची अपेक्षित प्रभाग रचना करवून घेणे भाजपसाठी वाटते तेवढेही सोपे नाही. दोन प्रभाग एकमेकांना जोडताना काही भागात भाजपच्याही विद्यमान नगरसेवकांना फटका बसण्याची शक्यता आहे. २०० मतांहून कमी फरकाने भाजपचे काही नगरसेवक विजयी झाले आहेत. त्याच्या शेजारच्या प्रभागात काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा बसपाने बाजी मारली आहे. त्यावेळी मतविभाजनाचा भाजपला फायदा झाला होता. आता मात्र, प्रभागाची सीमा वाढणार असल्यामुळे तेवढे मतविभाजन होणार नाही. याचा फटका कमी मतांनी जिंकलेल्या भाजप नगरसेवकांना बसण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या मतांवर भाजपचे गणितचार सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे प्रत्येक मतदारसंघाचे क्षेत्र वाढणार आहे. त्यामुळे निवडणुकीला मोठे स्वरूप येणार आहे. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या आधारावर भाजपने विजयाचे गणित आखले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या मतांची आकडेवारी पाहता सलग दोन प्रभागातील भाजपची मते एकत्र केली तर ६० टक्के जागांवर भाजपचे उमेदवार विजयी होऊ शकतात. विधानसभेच्या आकडेवारीने भाजपने मनोबल उंचावले असून त्यामुळे भाजप नेते निश्चिंत आहेत.