शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

ग्राहक त्रस्त : बँक ऑफ इंडिया पाठवीत आहे चुकीच्या पत्त्यावर एटीएम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 01:42 IST

चिपयुक्त एटीएम कार्ड न मिळाल्यामुळे बँक ऑफ इंडियाचे अनेक कार्डधारक त्रस्त आहेत. यासंदर्भात चौकशी केली असता अनेकांना एटीएम कार्ड चुकीच्या पत्त्यावर पाठविण्यात आल्याची खरी बाब पुढे आली आहे. असे का होत आहे, यावर बँकेचे अधिकारी अनभिज्ञ आहेत. एवढेच नव्हे तर नोव्हेंबरमध्ये तयार झालेले कार्ड जानेवारीमध्ये का मिळाले, यावर अनेक जण हैराण आहेत.

ठळक मुद्दे१५ दिवसानंतरही एटीएमचा पत्ता नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चिपयुक्त एटीएम कार्ड न मिळाल्यामुळे बँक ऑफ इंडियाचे अनेक कार्डधारक त्रस्त आहेत. यासंदर्भात चौकशी केली असता अनेकांना एटीएम कार्ड चुकीच्या पत्त्यावर पाठविण्यात आल्याची खरी बाब पुढे आली आहे. असे का होत आहे, यावर बँकेचे अधिकारी अनभिज्ञ आहेत. एवढेच नव्हे तर नोव्हेंबरमध्ये तयार झालेले कार्ड जानेवारीमध्ये का मिळाले, यावर अनेक जण हैराण आहेत.एवढा उशीर का?बँकेने जुने कार्ड ३१ डिसेंबरला बंद केले. ३१ डिसेंबरपूर्वी शाखेत येऊन चिप असलेले नवीन कार्ड प्राप्त करण्याचे बँकेतर्फे ग्राहकांना सांगण्यात आले. जेव्हा ग्राहक बँकेत पोहोचले तेव्हा त्यांच्यासमोर एक रजिस्टर ठेवण्यात आले. कार्ड आले वा नाही, याकरिता रजिस्टरमध्ये नाव शोधण्यास सांगण्यात आले. ज्यांचे नाव रजिस्टरमध्ये होते त्यांना कार्ड मिळाले, पण अनेकांचे नाव रजिस्टरमध्ये नव्हतेच. तेव्हा त्यांना ३१ डिसेंबरपूर्वी कार्ड येईल, असे सांगण्यात आले. ग्राहक बँकेत अनेकदा आले, पण त्यांना कार्ड मिळाले नाही. यादरम्यान तुमचे कार्ड स्पीड पोस्टच्या माध्यमातून पाठविण्यात आल्याचा संदेश ग्राहकांना डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात बँक ऑफ इंडियाकडून मिळाला. दोन ते तीन दिवसांत कार्ड येईल, अशी ग्राहकांना अपेक्षा होती. पण ती अखेर फोल ठरली.बँक ऑफ इंडियाच्या संदेशात एअर वे बिल (एडब्ल्यूबी) क्रमांक लिहिला होता. त्यामुळे लोकांनी स्पीड पोस्ट ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला. पण नेटवर अनेकदा हा एअर वे बिल क्रमांक वैध नसल्याचा संदेश आला. एक आठवड्यानंतर एअर वे बिल स्पीड पोस्ट ट्रॅकिंगच्या रडारवर आला. अनेक ग्राहक ट्रॅक करीत होते. तीन दिवसानंतर ग्राहकांना असे दिसून आले की, कार्ड पोस्ट ऑफिसपर्यंत पोहोचले, पण चुकीच्या पोस्ट ऑफिसमध्ये पोहोचल्याबद्दल त्यांना आश्चर्य वाटले. ग्राहकांनी त्या पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क आणि चौकशी केली असता, त्यांना ग्राहकांचे नाव योग्य आहे, पण पाच वर्षे जुन्या पत्त्यावर कार्ड पाठविल्याचे समजले. खरी बाब अशी की, अनेक ग्राहकांनी पत्ता बदलल्याचे बँकेला कळविले आहे.नवीन पत्त्याची नोंद पासबुकमध्ये पाच वर्षांपासून आहे. यासंदर्भात बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी असे का होत आहे, यावर आश्चर्य व्यक्त केले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, अशाप्रकारच्या अनेक तक्रारी आल्या असून, चुकीच्या पत्त्यामुळे अनेक ग्राहकांना कार्ड मिळालेले नाही. बँकेने कार्ड वितरणाचे काम वेंडर्सला दिल्याचे चौकशीदरम्यान पुढे आले. त्या वेंडर्सकडे ग्राहकांचे जुने पत्ते आहेत वा ही बँकेची चुकी आहे की ग्राहकांचे पत्ते वेंडर्सला अपडेट करून दिलेच नाहीत. अशीही शंका आहे की, वेंडर्सने पत्ते अपडेट केलेच नाहीत. या सर्व घटनाक्रमात ग्राहक मात्र खरोखरच त्रस्त आहेत.

 

 

टॅग्स :bankबँकatmएटीएम