शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
3
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
4
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
5
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
6
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
7
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
8
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
9
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
10
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
11
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
12
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
13
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
14
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

पुस्तकांच्या काळ्याबाजारावर अंकुश

By admin | Updated: June 8, 2015 02:43 IST

सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत देण्यात येणाऱ्या पुस्तकांचा काळाबाजार होत असल्याने, विद्यार्थ्यांना सत्र संपेपर्यंत पुस्तके मिळत नव्हती.

मंगेश व्यवहारे  नागपूरसर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत देण्यात येणाऱ्या पुस्तकांचा काळाबाजार होत असल्याने, विद्यार्थ्यांना सत्र संपेपर्यंत पुस्तके मिळत नव्हती. यंदा पहिल्यांदाच सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकावर लोगो लावण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्व शिक्षा अभियानाची पुस्तके विकता येणार नाही. सर्व शिक्षा अभियानाची १०० टक्के पुस्तके आठवठाभरात पोहचणार आहेत. त्यामुळे पहिल्याच दिवशी पुस्तके मिळतील. ंपुस्तकांचा होणाऱ्या काळ्याबाजारामुळे दरवर्षी विद्यार्थ्यांना सत्र संपेपर्यंत पुस्तके मिळत नसल्याची ओरड होत होती. यंदा मात्र पाठ्यपुस्तक मंडळाने पुस्तकाच्या निर्मितीचे नियोजन केले असून, सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत देण्यात येणाऱ्या पुस्तकांवर अभियानाचा लोगो लावण्यात आला आहे. पुस्तकावर किंमतसुद्धा छापलेली नाही. त्यामुळे या पुस्तकांची विक्री करता येणार नाही. परिणामी त्याचा काळाबाजार होणार नाही, असा पाठ्यपुस्तक मंडळाचा दावा आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत १ ते ८ वर्गाच्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क पाठ्यपुस्तकाचा पुरवठा करण्यात येतो. पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीपासून वितरणापर्यंतची जबाबदारी बालभारतीची असते. यावर्षी पाठ्यपुस्तक मंडळाने पुस्तकाच्या निर्मितीची प्रक्रिया आॅनलाईन केली आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षण अधिकाऱ्याकडून आॅनलाईन पाठ्यपुस्तकाची मागणी मागविण्यात आली. मागणीनुसारच पुस्तके छापण्यात आली. ज्या शाळा सर्व शिक्षा अभियानात येत नाही, अशा शाळांसाठी स्वतंत्र पुस्तके छापण्यात आली. त्यावर पुस्तकाचे विक्रीमूल्य नमूद केले आहे. पाठ्यपुस्तक मंडळाने पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके मिळावीत, त्यादृष्टीने सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकांच्या निर्मितीचे काम झाले आहे. पुरवठ्याचे काम दिवस-रात्र सुरू आहे. २६ जूनला शाळा सुरू होणार आहे. शाळा सुरू होण्याच्या १५ दिवसांपूर्वीच नियोजित स्थळावर पुस्तके पोहचणार आहेत. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके मिळतील, असा दावा बालभारतीच्या अधिकाऱ्यांनी केला. ंनागपूर विभागात ८६ टक्के पुस्तके पोहचलीसर्व शिक्षा अभियानांतर्गत नागपूर विभागातून ६६,२८,७२३ एवढ्या पुस्तकांची मागणी पाठ्यपुस्तक मंडळाकडे आली होती. अद्यापपर्यंत बालभारतीने ५७,२२,०५४ एवढ्या पुस्तकांचा पुरवठा केला आहे. यात नागपूर जिल्ह्याला ७८ टक्के, चंद्रपूर ९३, गोंदिया ७२, भंडारा ९५, वर्धा ९५, गडचिरोली ९४ टक्के पुस्तके पोहचली आहेत. प्रत्येक तालुक्याला पुस्तके पोहचली आहेत. आठवडाभरात १०० टक्के पुरवठ्याचे लक्ष्य पूर्ण करणार. किशोर पाटणकर, भांडार अधीक्षक, बालभारती, विभागीय कार्यालय