शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पुस्तकांच्या काळ्याबाजारावर अंकुश

By admin | Updated: June 8, 2015 02:43 IST

सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत देण्यात येणाऱ्या पुस्तकांचा काळाबाजार होत असल्याने, विद्यार्थ्यांना सत्र संपेपर्यंत पुस्तके मिळत नव्हती.

मंगेश व्यवहारे  नागपूरसर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत देण्यात येणाऱ्या पुस्तकांचा काळाबाजार होत असल्याने, विद्यार्थ्यांना सत्र संपेपर्यंत पुस्तके मिळत नव्हती. यंदा पहिल्यांदाच सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकावर लोगो लावण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्व शिक्षा अभियानाची पुस्तके विकता येणार नाही. सर्व शिक्षा अभियानाची १०० टक्के पुस्तके आठवठाभरात पोहचणार आहेत. त्यामुळे पहिल्याच दिवशी पुस्तके मिळतील. ंपुस्तकांचा होणाऱ्या काळ्याबाजारामुळे दरवर्षी विद्यार्थ्यांना सत्र संपेपर्यंत पुस्तके मिळत नसल्याची ओरड होत होती. यंदा मात्र पाठ्यपुस्तक मंडळाने पुस्तकाच्या निर्मितीचे नियोजन केले असून, सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत देण्यात येणाऱ्या पुस्तकांवर अभियानाचा लोगो लावण्यात आला आहे. पुस्तकावर किंमतसुद्धा छापलेली नाही. त्यामुळे या पुस्तकांची विक्री करता येणार नाही. परिणामी त्याचा काळाबाजार होणार नाही, असा पाठ्यपुस्तक मंडळाचा दावा आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत १ ते ८ वर्गाच्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क पाठ्यपुस्तकाचा पुरवठा करण्यात येतो. पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीपासून वितरणापर्यंतची जबाबदारी बालभारतीची असते. यावर्षी पाठ्यपुस्तक मंडळाने पुस्तकाच्या निर्मितीची प्रक्रिया आॅनलाईन केली आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षण अधिकाऱ्याकडून आॅनलाईन पाठ्यपुस्तकाची मागणी मागविण्यात आली. मागणीनुसारच पुस्तके छापण्यात आली. ज्या शाळा सर्व शिक्षा अभियानात येत नाही, अशा शाळांसाठी स्वतंत्र पुस्तके छापण्यात आली. त्यावर पुस्तकाचे विक्रीमूल्य नमूद केले आहे. पाठ्यपुस्तक मंडळाने पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके मिळावीत, त्यादृष्टीने सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकांच्या निर्मितीचे काम झाले आहे. पुरवठ्याचे काम दिवस-रात्र सुरू आहे. २६ जूनला शाळा सुरू होणार आहे. शाळा सुरू होण्याच्या १५ दिवसांपूर्वीच नियोजित स्थळावर पुस्तके पोहचणार आहेत. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके मिळतील, असा दावा बालभारतीच्या अधिकाऱ्यांनी केला. ंनागपूर विभागात ८६ टक्के पुस्तके पोहचलीसर्व शिक्षा अभियानांतर्गत नागपूर विभागातून ६६,२८,७२३ एवढ्या पुस्तकांची मागणी पाठ्यपुस्तक मंडळाकडे आली होती. अद्यापपर्यंत बालभारतीने ५७,२२,०५४ एवढ्या पुस्तकांचा पुरवठा केला आहे. यात नागपूर जिल्ह्याला ७८ टक्के, चंद्रपूर ९३, गोंदिया ७२, भंडारा ९५, वर्धा ९५, गडचिरोली ९४ टक्के पुस्तके पोहचली आहेत. प्रत्येक तालुक्याला पुस्तके पोहचली आहेत. आठवडाभरात १०० टक्के पुरवठ्याचे लक्ष्य पूर्ण करणार. किशोर पाटणकर, भांडार अधीक्षक, बालभारती, विभागीय कार्यालय