शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिऱ्याची फोडणी महागणार! पावसामुळे पिकाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2022 20:54 IST

Nagpur News यंदा मध्यम दर्जाच्या जिऱ्याचे प्रतिकिलो दर गेल्यावर्षीच्या १४० ते १६० रुपयांच्या तुलनेत सध्या २४० रुपयांवर पोहोचले आहे. पुढील महिन्यात २८० रुपये प्रतिकिलोवर जाण्याची शक्यता ठोक विक्रेत्यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देगेल्यावर्षी भाव न मिळाल्यामुळे यंदा लागवड कमी

नागपूर : स्वयंपाकघरात सढळ हाताने वापरले जाणारे जिरे गेल्यावर्षीच्या तुलनेत महागणार आहे. राजस्थान, गुजरातमधील शेतकऱ्यांनी जिऱ्याची लागवड कमी केल्याने उत्पादनातही मोठी घट झाली आहे. याशिवाय मध्यंतरी आलेल्या पावसामुळे पिकावर परिणाम झाला आहे. नागपुरात सर्वाधिक माल गुजरातच्या उंझा येथून येतो. यंदा मध्यम दर्जाच्या जिऱ्याचे प्रतिकिलो दर गेल्यावर्षीच्या १४० ते १६० रुपयांच्या तुलनेत सध्या २४० रुपयांवर पोहोचले आहे. पुढील महिन्यात २८० रुपये प्रतिकिलोवर जाण्याची शक्यता ठोक विक्रेत्यांनी व्यक्त केली.

देशात जिऱ्याची लागवड राजस्थान आणि गुजरात राज्यात होते. गुजरातमधील सौराष्ट्र विभागातील कच्छ, भावनगर, राजकोट या भागातील शेतकरी आणि राजस्थानात पाकिस्तान सीमेलगतचे शेतकरी जिरे लागवड करतात. गेले तीन वर्ष राजस्थान आणि गुजरातमध्ये जिरे लागवडीत वाढ झाली होती. मात्र, अपेक्षेएवढे दर न मिळाल्याने यंदा शेतकऱ्यांनी या पिकाकडे पाठ फिरविली. त्यामुळे यंदाच्या हंगामात जिरे लागवडीत मोठी घट झाली.

भाव २८० रुपयांपर्यंत जाणार

गेले तीन वर्ष जिऱ्याचे भाव १४० ते १६० रुपये प्रतिकिलो स्थिर होते. पण यंदा उत्पादन कमी झाल्यामुळे मार्चमध्ये भाव २४० रुपयांवर पोहोचले आहे. एप्रिल महिन्यात भाव २८० रुपयांवर जाण्याची शक्यता आहे.

आवक घटली

यंदा उत्पादन कमी झाल्यामुळे इतवारी मुख्य बाजारात गेल्यावर्षीच्या तुलनेत आवक घटली आहे. ३ एप्रिलपासून बाजार पुन्हा सुरू झाल्यानंतर भाव काय राहील, यावर आवक अवलंबून राहील.

भारतातून जिऱ्याची निर्यात

भारत जिऱ्यासाठी मोठी बाजारपेठ आहे. गुजरात आणि राजस्थान येथून जिरे निर्यात होते. भारतातही गुजरातमध्ये उंझा, राजकोट आणि राजस्थानमध्ये जयपूर आणि जोधपूर या विकसित बाजारपेठा आहेत. देशात उत्पादन जास्त असल्यामुळे भारतातून चीन, कुवेत, युरोप, बांगलादेश, इराण या देशांत जिरे निर्यात केली जाते.

आणखी काही महिने दरवाढ राहणार

गेल्यावर्षीच्या तुलनेत जिऱ्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सध्या ठोक बाजारात २४० रुपये किलो भाव आहेत. जिऱ्याची मंडी ३ एप्रिलला पुन्हा सुरू होणार आहे. नंतरच नवीन भाव खुलतील. पण पुढे भाव वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. नागपूर जिऱ्यासाठी मोठी बाजारपेठ समजली जाते.

पूर्वेश पटेल, संचालक, नीरव ट्रेडिंग

टॅग्स :foodअन्न