शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जिऱ्याची फोडणी महागणार! पावसामुळे पिकाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2022 20:54 IST

Nagpur News यंदा मध्यम दर्जाच्या जिऱ्याचे प्रतिकिलो दर गेल्यावर्षीच्या १४० ते १६० रुपयांच्या तुलनेत सध्या २४० रुपयांवर पोहोचले आहे. पुढील महिन्यात २८० रुपये प्रतिकिलोवर जाण्याची शक्यता ठोक विक्रेत्यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देगेल्यावर्षी भाव न मिळाल्यामुळे यंदा लागवड कमी

नागपूर : स्वयंपाकघरात सढळ हाताने वापरले जाणारे जिरे गेल्यावर्षीच्या तुलनेत महागणार आहे. राजस्थान, गुजरातमधील शेतकऱ्यांनी जिऱ्याची लागवड कमी केल्याने उत्पादनातही मोठी घट झाली आहे. याशिवाय मध्यंतरी आलेल्या पावसामुळे पिकावर परिणाम झाला आहे. नागपुरात सर्वाधिक माल गुजरातच्या उंझा येथून येतो. यंदा मध्यम दर्जाच्या जिऱ्याचे प्रतिकिलो दर गेल्यावर्षीच्या १४० ते १६० रुपयांच्या तुलनेत सध्या २४० रुपयांवर पोहोचले आहे. पुढील महिन्यात २८० रुपये प्रतिकिलोवर जाण्याची शक्यता ठोक विक्रेत्यांनी व्यक्त केली.

देशात जिऱ्याची लागवड राजस्थान आणि गुजरात राज्यात होते. गुजरातमधील सौराष्ट्र विभागातील कच्छ, भावनगर, राजकोट या भागातील शेतकरी आणि राजस्थानात पाकिस्तान सीमेलगतचे शेतकरी जिरे लागवड करतात. गेले तीन वर्ष राजस्थान आणि गुजरातमध्ये जिरे लागवडीत वाढ झाली होती. मात्र, अपेक्षेएवढे दर न मिळाल्याने यंदा शेतकऱ्यांनी या पिकाकडे पाठ फिरविली. त्यामुळे यंदाच्या हंगामात जिरे लागवडीत मोठी घट झाली.

भाव २८० रुपयांपर्यंत जाणार

गेले तीन वर्ष जिऱ्याचे भाव १४० ते १६० रुपये प्रतिकिलो स्थिर होते. पण यंदा उत्पादन कमी झाल्यामुळे मार्चमध्ये भाव २४० रुपयांवर पोहोचले आहे. एप्रिल महिन्यात भाव २८० रुपयांवर जाण्याची शक्यता आहे.

आवक घटली

यंदा उत्पादन कमी झाल्यामुळे इतवारी मुख्य बाजारात गेल्यावर्षीच्या तुलनेत आवक घटली आहे. ३ एप्रिलपासून बाजार पुन्हा सुरू झाल्यानंतर भाव काय राहील, यावर आवक अवलंबून राहील.

भारतातून जिऱ्याची निर्यात

भारत जिऱ्यासाठी मोठी बाजारपेठ आहे. गुजरात आणि राजस्थान येथून जिरे निर्यात होते. भारतातही गुजरातमध्ये उंझा, राजकोट आणि राजस्थानमध्ये जयपूर आणि जोधपूर या विकसित बाजारपेठा आहेत. देशात उत्पादन जास्त असल्यामुळे भारतातून चीन, कुवेत, युरोप, बांगलादेश, इराण या देशांत जिरे निर्यात केली जाते.

आणखी काही महिने दरवाढ राहणार

गेल्यावर्षीच्या तुलनेत जिऱ्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सध्या ठोक बाजारात २४० रुपये किलो भाव आहेत. जिऱ्याची मंडी ३ एप्रिलला पुन्हा सुरू होणार आहे. नंतरच नवीन भाव खुलतील. पण पुढे भाव वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. नागपूर जिऱ्यासाठी मोठी बाजारपेठ समजली जाते.

पूर्वेश पटेल, संचालक, नीरव ट्रेडिंग

टॅग्स :foodअन्न