शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
5
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
6
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
7
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
8
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
9
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
10
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
11
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
12
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
13
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
14
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
15
फिरोझ खान यांनी पाकिस्तानात जाऊन केलं होतं भारताचं कौतुक, मुशर्रफ भडकले आणि घातली प्रवेश बंदी!
16
जालना: घरासमोर खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलीचे श्वानांनी तोडले लचके, हल्ल्यात मुलीचा मृत्यू
17
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
18
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
19
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
20
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."

क्रूरकर्मा आलोक अमिषाच्या मृत्यूची वाट बघत होता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:07 IST

नरेश डोंगरे । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - आलोकने गळा घोटल्यामुळे आमिषाची जीभ बाहेर आली होती. तिला श्वास घ्यायला ...

नरेश डोंगरे ।

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - आलोकने गळा घोटल्यामुळे आमिषाची जीभ बाहेर आली होती. तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. तिचा मृत्यूशी संघर्ष सुरू होता तर, अंगात सैतान संचारलेला आलोक ती लवकर मरावी म्हणून वाट बघत होता. आतल्या खोलीत असलेली सासू या दोघांच्या खोलीत आली तेव्हा तो म्हणाला, बघा ना मरत पण नाही ....अन् नंतर त्याने चाकूने आमिषाचा गळाच कापून टाकला.

अंगावर शहारे आणणारे आणि सर्वत्र प्रचंड खळबळ उडविणारे पाचपावलीतील पाच जणांचे हत्याकांड घडवून आणणारा क्रूरकर्मा आलोक ऊर्फ चंदू अशोक मातुरकर (वय ४५) याने स्वत:लाही संपविले. त्यामुळे या थरारकांडाचे अनेक पैलू गुलदस्त्यात आहे. ते उलगडण्यासाठी अख्खी पोलीस यंत्रणा गेल्या ३६ तासांपासून काम करत आहे. या हत्याकांडाची कारणमीमांसा स्पष्ट करणारे काही महत्वाचे पुरावे पोलिसांना मिळाले आहे. त्यात आमिषाचा मोबाईल आणि या मोबाईलमधील ऑडिओ क्लीपचा समावेश आहे. या क्लीपमुळे क्रूरकर्मा आलोक कसा हिंसक झाला, त्याने अमिषा आणि नंतर तिची आई लक्ष्मीबाई बोबडे यांची कशी निर्दयपणे हत्या केली, ते लक्षात येते.

गोपनीय सूत्रांनुसार, २७ मिनिटांची ही ऑडिओ क्लीप आहे. त्यानुसार, अमिषाने त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केल्यामुळे तो क्षुब्ध झाला होता. त्यात अमिषाचा बबलू, यश सोबतचा सलग संपर्क त्याला खपतच नव्हता. ‘तू फक्त माझीच बनून रहा’, असे तो अमिषाला बजावत होता. तर, ‘मी माझ्या मनाची मालकीण आहे, मनात येईल तसे वागेन, तू तुझे बघ’ असे ती त्याला ठणकावून सांगत होती. ती स्वैर झाल्यामुळे ही आता आपली राहिली नाही, असे आलोकच्या लक्षात आले होते. त्याचमुळे ‘तू मेरी नही तो किसी और की भी नही’ असे म्हणत तिला संपविण्याचा त्याने निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर, आलोक रविवारी रात्री अमिषाच्या घरी गेला. त्याची देहबोली बघून अमिषाला धोका लक्षात आला. त्यामुळे तिने आधी आपल्या मोबाईलचे रेकॉर्डर सुरू केले. नंतर त्याच्याशी शरीरसंबंधाची तयारी दाखवली. तो शांत होईल, असे तिला वाटले मात्र तसे काही झाले नाही. शरीरसंबंधानंतर त्याने तिच्याशी वाद घालून तिचा गळा घोटला. बराच वेळपर्यंत ती आचके देत होती. तेवढ्यात अमिषाची आई त्या खोलीत आली. सैतान बनलेल्या आलोकने मृत्यूशी संघर्ष करणाऱ्या अमिषाला शिवी हासडली. सासूकडे बघून, मरत पण नाही लवकर... असे म्हणतानाच चाकूचे तिचा गळा कापला. ते बघून अमिषाची आई लक्ष्मीबाई शोकविव्हळ झाली. ती विलाप करत असल्यामुळे आलोकने सासूला इशारा दिला. ‘तू आरडाओरड केल्यास ठार मारेन’, असे म्हटले आणि नंतर कशाचीही वाट न बघता सासूचाही गळा कापला. त्यानंतर तो स्वत:च्या घराकडे निघाला. तेथे त्याने पत्नी विजया, मुलगी परी आणि मुलगा साहिल याची हत्या करून आत्महत्या केली. त्याच्या क्राैर्याचा पुरावा ठरलेली अमिषाच्या मोबाईलमधील क्लीप पोलिसांच्या हाती लागली. त्यातील संभाषणाचा आशय पुढीलप्रमाणे आहे.

---

असा आहे संभाषणाचा आशय।

अमिषा - तू आला का... ये ... आता लाजतोस कशाला ..

(दोघांचे हसणे खिदळणे.. एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव... शरीरसंबंधाची तयारी.. काही वेळेनंतर...)

आलोक - तू माझी पोलिसांकडे तक्रार का केली...?

अमिषा - म्हणजे काय, मी का तुझी (...) आहे का? मी माझ्या मनाची मालकीण आहे. तू आपले काम कर...

आलोक - तू चांगली वाग...

अमिषा- तू चांगला वाग,अन्यथा पुन्हा तुझी तक्रार करेन...

(अमिषाचे हे वाक्य त्याच्या जिव्हारी लागते अन् तो अचानक हिंसक होतो. दोघे एकमेकांना अश्लील शिव्या देतात. तो मारहाण करून अर्धनग्न अवस्थेतील अमिषाचा गळा घोटतो. ती आचके देत असते. तेवढ्यात त्या खोलीत अमिषाची आई लक्ष्मीबाई येते. त्यांना बघून ही मरत का नाही...असा सवाल आलोक करतो. नंतर अमिषाचा गळा कापतो.)

लक्ष्मीबाई - जावई ... तुम्ही हे का केले...

आलोक - तुम्ही ओरडू नका, लोक जागतील.. गप्प रहा... ऐकत नाही का...त्याचक्षणी लक्ष्मीबाईंची किंकाळी (त्याने त्यांचाही गळा कापला) नंतर सगळे शांत.

---