शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
2
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
3
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
4
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
5
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
6
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल
8
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
9
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
10
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
11
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
12
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
13
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
14
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
15
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
16
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
17
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
18
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
19
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
20
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता

रेल्वेगाड्यात होतेय खचाखच गर्दी ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:08 IST

नागपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना पुन्हा प्रवाशांची संख्या वाढताना दिसत आहे. अशा स्थितीत रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा ...

नागपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना पुन्हा प्रवाशांची संख्या वाढताना दिसत आहे. अशा स्थितीत रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा रद्द केलेल्या रेल्वेगाड्या रुळावर आणणे सुरू केले आहे. प्रमुख रेल्वेगाड्यात वेटिंगची स्थिती आहे. तर उत्तर भारताकडून येणाऱ्या रेल्वेगाड्यात मात्र प्रवासी खचाखच भरलेले दिसत असून कोचमध्ये पाय ठेवण्यासही जागा नसल्याचे चित्र दिसत आहे. हे वातावरण कोरोनासाठी पोषक असल्याचे मत रेल्वेतील जाणकार व्यक्त करीत आहेत.

मार्च २०२० मध्ये देशव्यापी लॉकडाऊन लावल्यानंतर देशाच्या विविध भागात राहणाऱ्या कामगारांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागल्यामुळे ते आपापल्या मूळ गावी निघुन गेले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये पुन्हा पहिल्या लॉकडाऊनच्या आठवणी ताज्या झाल्या. पुन्हा कामगारांना आपल्या गावाकडे निघून जावे लागले. परंतु आता पुन्हा लॉकडाऊन लागणार नाही याची खात्री पटल्यामुळे कामगार आपल्या कामाच्या ठिकाणी परत जात आहेत. उत्तर भारत, बंगाल आणि छत्तीसगड येथून मोठ्या संख्येने कामगार पुन्हा दक्षिण भारताकडे परत जात आहेत. त्यामुळे रेल्वेगाड्यात या कामगारांची गर्दी होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने अनारक्षित तिकीट बंद केले आहेत. प्रवासासाठी कन्फर्म तिकीट असणे गरजेचे आहे. जनरल कोचमध्ये प्रवास करण्यासाठीही आरक्षण करणे गरजेचे आहे. परंतु बिहार, उत्तर प्रदेश आणि बंगालकडून येत असलेल्या रेल्वेगाड्यांकडे पाहून कोरोना कधीच नव्हता असे वाटत आहे. दानापूर, गोरखपुर, पटना आणि लखनौकडून येणाऱ्या रेल्वेगाड्यातील जनरल कोचमध्ये पाय ठेवण्यासही जागा नसल्याचे चित्र आहे. १०२ सीट असलेल्या जनरल कोचमध्ये १५० पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करीत आहेत. दुसरीकडे नागपूरवरून मुंबई आणि पुण्याला जाणाऱ्या रेल्वेगाड्यात वेटिंगची स्थिती आहे. काही गाड्यात वेटिंग ५० आणि १०० पर्यंत पोहोचले आहे. पुन्हा सुरु झालेल्या मुंबई दुरांतो एक्स्प्रेसमुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. परंतु शनिवारी आणि रविवारी पुन्हा दुरांतोच्या स्लिपर क्लासमध्ये वेटिंग सुरु झाले आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने रेल्वेगाड्यात होणारी खचाखच गर्दी थांबविण्याची गरज आहे.

...................