शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

रेल्वेगाड्यात होतेय खचाखच गर्दी ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:08 IST

नागपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना पुन्हा प्रवाशांची संख्या वाढताना दिसत आहे. अशा स्थितीत रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा ...

नागपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना पुन्हा प्रवाशांची संख्या वाढताना दिसत आहे. अशा स्थितीत रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा रद्द केलेल्या रेल्वेगाड्या रुळावर आणणे सुरू केले आहे. प्रमुख रेल्वेगाड्यात वेटिंगची स्थिती आहे. तर उत्तर भारताकडून येणाऱ्या रेल्वेगाड्यात मात्र प्रवासी खचाखच भरलेले दिसत असून कोचमध्ये पाय ठेवण्यासही जागा नसल्याचे चित्र दिसत आहे. हे वातावरण कोरोनासाठी पोषक असल्याचे मत रेल्वेतील जाणकार व्यक्त करीत आहेत.

मार्च २०२० मध्ये देशव्यापी लॉकडाऊन लावल्यानंतर देशाच्या विविध भागात राहणाऱ्या कामगारांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागल्यामुळे ते आपापल्या मूळ गावी निघुन गेले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये पुन्हा पहिल्या लॉकडाऊनच्या आठवणी ताज्या झाल्या. पुन्हा कामगारांना आपल्या गावाकडे निघून जावे लागले. परंतु आता पुन्हा लॉकडाऊन लागणार नाही याची खात्री पटल्यामुळे कामगार आपल्या कामाच्या ठिकाणी परत जात आहेत. उत्तर भारत, बंगाल आणि छत्तीसगड येथून मोठ्या संख्येने कामगार पुन्हा दक्षिण भारताकडे परत जात आहेत. त्यामुळे रेल्वेगाड्यात या कामगारांची गर्दी होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने अनारक्षित तिकीट बंद केले आहेत. प्रवासासाठी कन्फर्म तिकीट असणे गरजेचे आहे. जनरल कोचमध्ये प्रवास करण्यासाठीही आरक्षण करणे गरजेचे आहे. परंतु बिहार, उत्तर प्रदेश आणि बंगालकडून येत असलेल्या रेल्वेगाड्यांकडे पाहून कोरोना कधीच नव्हता असे वाटत आहे. दानापूर, गोरखपुर, पटना आणि लखनौकडून येणाऱ्या रेल्वेगाड्यातील जनरल कोचमध्ये पाय ठेवण्यासही जागा नसल्याचे चित्र आहे. १०२ सीट असलेल्या जनरल कोचमध्ये १५० पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करीत आहेत. दुसरीकडे नागपूरवरून मुंबई आणि पुण्याला जाणाऱ्या रेल्वेगाड्यात वेटिंगची स्थिती आहे. काही गाड्यात वेटिंग ५० आणि १०० पर्यंत पोहोचले आहे. पुन्हा सुरु झालेल्या मुंबई दुरांतो एक्स्प्रेसमुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. परंतु शनिवारी आणि रविवारी पुन्हा दुरांतोच्या स्लिपर क्लासमध्ये वेटिंग सुरु झाले आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने रेल्वेगाड्यात होणारी खचाखच गर्दी थांबविण्याची गरज आहे.

...................