शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
3
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
4
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
5
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
6
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
7
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
8
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
9
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
10
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
11
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
12
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
13
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
14
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
15
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
16
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
17
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
18
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
19
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
20
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा गर्दीने फुलले किराणा, भाजीबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:07 IST

नागपूर : कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागताच नागरिकांमध्ये कोरोना संसर्गाची भीती कमी झाली असून, बाजारात दरदिवशी होऊ लागलेल्या ...

नागपूर : कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागताच नागरिकांमध्ये कोरोना संसर्गाची भीती कमी झाली असून, बाजारात दरदिवशी होऊ लागलेल्या गर्दीवरून ते दिसून येत आहे. नागरिक किराणा आणि भाजीबाजारात सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता गर्दी करू लागले आहेत. दरदिवशी बाजारपेठांमध्ये वाढणारी गर्दी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे पूर्वसंकट तर नाही ना, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.

सदर प्रतिनिधीने सकाळी सक्करदरा, नंदनवन, रमणा मारोती आणि सोमवारी (दि. १७) क्वार्टर येथील भाजी आणि किराणा दुकानांची पाहणी केली. सर्वत्र नागरिकांची गर्दी दिसून आली. सोमवारी क्वार्टर भाजीबाजारात पाय ठेवायलाही जागा नव्हती. मास्क, सॅनिटायझर वा सोशल डिस्टन्सिंगचे पालन करताना कुणीही दिसले नाही. दुकानदारांनीही दुकानातील माल थेट रस्त्यावरच लावला होता. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू राहत असल्याने भाज्यांच्या विक्रीसाठी दुकान पुढे लावल्याचे एका विक्रेत्याने सांगितले. दररोज विक्रीसाठी आणलेल्या भाज्यांपैकी ४० ते ५० टक्के भाज्यांची विक्री होते. त्यातील काही माल खराब होतो. पुन्हा दुसऱ्या दिवशी नव्याने भाज्या आणून पहिल्या दिवशी उरलेल्या भाज्यांसोबत विक्री करावी लागते. वेळेचे बंधन असल्याने कोरोनाची भीती न बाळगता जिवावर उदार होऊन व्यवसाय करावा लागतो. गर्दीवर नियंत्रण करायला महापालिकेचे कुणीही कर्मचारी दिसले नाहीत. त्यामुळे दुकानदारांना रान मोकळे मिळाले होते. सकाळी ११ पूर्वी विक्रेत्यांनी भाज्यांची विक्री बंद करायला सुरुवात केल्याचे दिसून आले. अशीच बाब नंदनवन, केडीके कॉलेज आणि रमणा मारोती या परिसरातील भाजीबाजाराची होती. शिवाय फळांच्या दुकानांतही गर्दी दिसून आली.

याशिवाय किराणा दुकानांमध्येही ग्राहकांची गर्दी होती. वेळेचे बंधन असल्याने सर्वच ग्राहक माल लवकर मिळावा म्हणून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करताना दिसले नाहीत; याशिवाय दुकानदार सर्वांना दूर उभे राहण्याचे आवाहन करीत होते; पण कुणीही ऐकण्याच्या स्थितीत दिसले नाहीत. सकाळी नऊ वाजल्यापासून झालेली गर्दी सकाळी ११ पर्यंत होती. अखेर दुकाने बंद झाल्यानंतर गर्दी ओसरली. तसेच पूर्व नागपुरातील सर्वच किराणा दुकानांमध्ये दरदिवशी होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना संसर्गाची भीती वाढली आहे. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाला कठोर पावले उचलावी लागतील, असे नागरिकांनी सांगितले.