शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

पुन्हा गर्दीने फुलले किराणा, भाजीबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:07 IST

नागपूर : कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागताच नागरिकांमध्ये कोरोना संसर्गाची भीती कमी झाली असून, बाजारात दरदिवशी होऊ लागलेल्या ...

नागपूर : कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागताच नागरिकांमध्ये कोरोना संसर्गाची भीती कमी झाली असून, बाजारात दरदिवशी होऊ लागलेल्या गर्दीवरून ते दिसून येत आहे. नागरिक किराणा आणि भाजीबाजारात सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता गर्दी करू लागले आहेत. दरदिवशी बाजारपेठांमध्ये वाढणारी गर्दी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे पूर्वसंकट तर नाही ना, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.

सदर प्रतिनिधीने सकाळी सक्करदरा, नंदनवन, रमणा मारोती आणि सोमवारी (दि. १७) क्वार्टर येथील भाजी आणि किराणा दुकानांची पाहणी केली. सर्वत्र नागरिकांची गर्दी दिसून आली. सोमवारी क्वार्टर भाजीबाजारात पाय ठेवायलाही जागा नव्हती. मास्क, सॅनिटायझर वा सोशल डिस्टन्सिंगचे पालन करताना कुणीही दिसले नाही. दुकानदारांनीही दुकानातील माल थेट रस्त्यावरच लावला होता. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू राहत असल्याने भाज्यांच्या विक्रीसाठी दुकान पुढे लावल्याचे एका विक्रेत्याने सांगितले. दररोज विक्रीसाठी आणलेल्या भाज्यांपैकी ४० ते ५० टक्के भाज्यांची विक्री होते. त्यातील काही माल खराब होतो. पुन्हा दुसऱ्या दिवशी नव्याने भाज्या आणून पहिल्या दिवशी उरलेल्या भाज्यांसोबत विक्री करावी लागते. वेळेचे बंधन असल्याने कोरोनाची भीती न बाळगता जिवावर उदार होऊन व्यवसाय करावा लागतो. गर्दीवर नियंत्रण करायला महापालिकेचे कुणीही कर्मचारी दिसले नाहीत. त्यामुळे दुकानदारांना रान मोकळे मिळाले होते. सकाळी ११ पूर्वी विक्रेत्यांनी भाज्यांची विक्री बंद करायला सुरुवात केल्याचे दिसून आले. अशीच बाब नंदनवन, केडीके कॉलेज आणि रमणा मारोती या परिसरातील भाजीबाजाराची होती. शिवाय फळांच्या दुकानांतही गर्दी दिसून आली.

याशिवाय किराणा दुकानांमध्येही ग्राहकांची गर्दी होती. वेळेचे बंधन असल्याने सर्वच ग्राहक माल लवकर मिळावा म्हणून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करताना दिसले नाहीत; याशिवाय दुकानदार सर्वांना दूर उभे राहण्याचे आवाहन करीत होते; पण कुणीही ऐकण्याच्या स्थितीत दिसले नाहीत. सकाळी नऊ वाजल्यापासून झालेली गर्दी सकाळी ११ पर्यंत होती. अखेर दुकाने बंद झाल्यानंतर गर्दी ओसरली. तसेच पूर्व नागपुरातील सर्वच किराणा दुकानांमध्ये दरदिवशी होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना संसर्गाची भीती वाढली आहे. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाला कठोर पावले उचलावी लागतील, असे नागरिकांनी सांगितले.