शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

पुन्हा गर्दीने फुलले किराणा, भाजीबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:07 IST

नागपूर : कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागताच नागरिकांमध्ये कोरोना संसर्गाची भीती कमी झाली असून, बाजारात दरदिवशी होऊ लागलेल्या ...

नागपूर : कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागताच नागरिकांमध्ये कोरोना संसर्गाची भीती कमी झाली असून, बाजारात दरदिवशी होऊ लागलेल्या गर्दीवरून ते दिसून येत आहे. नागरिक किराणा आणि भाजीबाजारात सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता गर्दी करू लागले आहेत. दरदिवशी बाजारपेठांमध्ये वाढणारी गर्दी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे पूर्वसंकट तर नाही ना, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.

सदर प्रतिनिधीने सकाळी सक्करदरा, नंदनवन, रमणा मारोती आणि सोमवारी (दि. १७) क्वार्टर येथील भाजी आणि किराणा दुकानांची पाहणी केली. सर्वत्र नागरिकांची गर्दी दिसून आली. सोमवारी क्वार्टर भाजीबाजारात पाय ठेवायलाही जागा नव्हती. मास्क, सॅनिटायझर वा सोशल डिस्टन्सिंगचे पालन करताना कुणीही दिसले नाही. दुकानदारांनीही दुकानातील माल थेट रस्त्यावरच लावला होता. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू राहत असल्याने भाज्यांच्या विक्रीसाठी दुकान पुढे लावल्याचे एका विक्रेत्याने सांगितले. दररोज विक्रीसाठी आणलेल्या भाज्यांपैकी ४० ते ५० टक्के भाज्यांची विक्री होते. त्यातील काही माल खराब होतो. पुन्हा दुसऱ्या दिवशी नव्याने भाज्या आणून पहिल्या दिवशी उरलेल्या भाज्यांसोबत विक्री करावी लागते. वेळेचे बंधन असल्याने कोरोनाची भीती न बाळगता जिवावर उदार होऊन व्यवसाय करावा लागतो. गर्दीवर नियंत्रण करायला महापालिकेचे कुणीही कर्मचारी दिसले नाहीत. त्यामुळे दुकानदारांना रान मोकळे मिळाले होते. सकाळी ११ पूर्वी विक्रेत्यांनी भाज्यांची विक्री बंद करायला सुरुवात केल्याचे दिसून आले. अशीच बाब नंदनवन, केडीके कॉलेज आणि रमणा मारोती या परिसरातील भाजीबाजाराची होती. शिवाय फळांच्या दुकानांतही गर्दी दिसून आली.

याशिवाय किराणा दुकानांमध्येही ग्राहकांची गर्दी होती. वेळेचे बंधन असल्याने सर्वच ग्राहक माल लवकर मिळावा म्हणून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करताना दिसले नाहीत; याशिवाय दुकानदार सर्वांना दूर उभे राहण्याचे आवाहन करीत होते; पण कुणीही ऐकण्याच्या स्थितीत दिसले नाहीत. सकाळी नऊ वाजल्यापासून झालेली गर्दी सकाळी ११ पर्यंत होती. अखेर दुकाने बंद झाल्यानंतर गर्दी ओसरली. तसेच पूर्व नागपुरातील सर्वच किराणा दुकानांमध्ये दरदिवशी होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना संसर्गाची भीती वाढली आहे. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाला कठोर पावले उचलावी लागतील, असे नागरिकांनी सांगितले.