शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
4
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
5
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
6
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
9
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
10
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
12
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
13
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
14
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
15
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
16
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
17
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

पिकांना पावसाचा फटका, मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:10 IST

भिवापूर : मंगळवारी पहाटेच्या सुमारास आलेल्या मुसळधार पावसाने तालुक्यात होत्याचे नव्हते केले आहे. नदीनाल्यांना पूर आला आणि शेतासह उभी ...

भिवापूर : मंगळवारी पहाटेच्या सुमारास आलेल्या मुसळधार पावसाने तालुक्यात होत्याचे नव्हते केले आहे. नदीनाल्यांना पूर आला आणि शेतासह उभी पिके पाण्यात बुडाली. दरम्यान, पूरपरिस्थिती ओसरताच मंडळ अधिकारी, तलाठी अशी महसूल विभागाची टीम नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेताच्या बांध्यावर पोहचली आहे.

मंगळवारी भिवापूर तालुक्यात १२४.२५ मिमी पाऊस झाला. एकट्या कारगाव मंडळात १६९ मिमी, मालेवाडा मंडळात १४१ म.मी, नांद मंडळात १२० तर भिवापूर मंडळात ६७ मिमी पावसाची नोंद झाली. चार तासाचा हा पाऊस आभाळ फाटल्यागत होता. त्यामुळे कापणीला आलेले सोयाबीन शेतकऱ्यांच्या हातात येण्याची शक्यता आता धूसर आहे. काही शेतात कापणी झालेल्या सोयाबीनचे ढीग तलावसदृश परिस्थितीत उभे आहेत. कापूस, मिरचीसह इतर पिकांचे हाल याहून वेगळे नाही. शेतातील उभी कपाशी आडवी झाली आहे. सोयाबीन काळवंडला असून, त्याचा सडवा होण्याची शक्यता आहे. यदाकदाचित थोड्या फार प्रमाणात सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांच्या हाती आले तरी त्यात गुणवत्ता नसणार आहे. मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पूरपरिस्थिती ओसरण्यास सुरुवात झाली. मात्र त्यानंतरही बुधवारी सकाळी अनेक शेतात पाणी साचले असल्याचे दृश्य शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू ढाळणारे होते. तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांच्या आदेशानुसार बुधवारी सकाळपासूनच महसूल विभागाचे अधिकारी आपापल्या तलाठी साजामध्ये नुकसानीचे सर्व्हे आणि पंचनामे करण्याच्या कामाला लागले. तालुक्यात एक हजार हेक्टरवर शेतिक्षेत्रात नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. नांद, महालगाव, चिखलापार, कारगाव, जवळी, नक्षी, मेढा, वडध, चिखली, मांगली, रोहणा, मालेवाडा, बेसूर या भागात नुकसानीचे प्रमाण अधिक आहे. आ. राजू पारवे यांनी अधिकाऱ्यांसह नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, सभापती नेमावली माटे, सभापती ममता शेंडे, सभापती विठ्ठल राऊत, जि.प. सदस्य शंकर डडमल, राहुल मसराम, विजय वराडे, तुळशीदास चुटे आदी उपस्थित होते.

तात्काळ नुकसान भरपाई द्या------------

माजी आ. सुधीर पारवे यांनी नुकसानग्रस्त गावांचा दौरा करीत पाण्याखाली बुडालेल्या शेतातील पिकांची पाहणी केली. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून कुठलेही निकष न ठेवता शेतकऱ्यांना भरीव नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. याबाबत फोनवरून त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही परिस्थितीचे गांभीर्य सांगितले. यावेळी भास्कर येंगळे, केशव ब्रम्हे, प्रमोद बावनगडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

---

३० घरांची पडझड

मुसळधार पावसामुळे घरांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. भिवापूर शहरात ५, धामणगाव (वि.म.) ४, बेल्लरपार ५, धापर्ला (डोये) २, कारगाव २, भगवानपूर १२ अशा एकूण ३० घरांची पडझड झाली आहे. गोंडबोरी-सेलोटी मार्गावरील पुलाचा वरचा भागही वाहून गेला आहे.

--