शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

पिकांना पावसाचा फटका, मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:10 IST

भिवापूर : मंगळवारी पहाटेच्या सुमारास आलेल्या मुसळधार पावसाने तालुक्यात होत्याचे नव्हते केले आहे. नदीनाल्यांना पूर आला आणि शेतासह उभी ...

भिवापूर : मंगळवारी पहाटेच्या सुमारास आलेल्या मुसळधार पावसाने तालुक्यात होत्याचे नव्हते केले आहे. नदीनाल्यांना पूर आला आणि शेतासह उभी पिके पाण्यात बुडाली. दरम्यान, पूरपरिस्थिती ओसरताच मंडळ अधिकारी, तलाठी अशी महसूल विभागाची टीम नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेताच्या बांध्यावर पोहचली आहे.

मंगळवारी भिवापूर तालुक्यात १२४.२५ मिमी पाऊस झाला. एकट्या कारगाव मंडळात १६९ मिमी, मालेवाडा मंडळात १४१ म.मी, नांद मंडळात १२० तर भिवापूर मंडळात ६७ मिमी पावसाची नोंद झाली. चार तासाचा हा पाऊस आभाळ फाटल्यागत होता. त्यामुळे कापणीला आलेले सोयाबीन शेतकऱ्यांच्या हातात येण्याची शक्यता आता धूसर आहे. काही शेतात कापणी झालेल्या सोयाबीनचे ढीग तलावसदृश परिस्थितीत उभे आहेत. कापूस, मिरचीसह इतर पिकांचे हाल याहून वेगळे नाही. शेतातील उभी कपाशी आडवी झाली आहे. सोयाबीन काळवंडला असून, त्याचा सडवा होण्याची शक्यता आहे. यदाकदाचित थोड्या फार प्रमाणात सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांच्या हाती आले तरी त्यात गुणवत्ता नसणार आहे. मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पूरपरिस्थिती ओसरण्यास सुरुवात झाली. मात्र त्यानंतरही बुधवारी सकाळी अनेक शेतात पाणी साचले असल्याचे दृश्य शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू ढाळणारे होते. तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांच्या आदेशानुसार बुधवारी सकाळपासूनच महसूल विभागाचे अधिकारी आपापल्या तलाठी साजामध्ये नुकसानीचे सर्व्हे आणि पंचनामे करण्याच्या कामाला लागले. तालुक्यात एक हजार हेक्टरवर शेतिक्षेत्रात नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. नांद, महालगाव, चिखलापार, कारगाव, जवळी, नक्षी, मेढा, वडध, चिखली, मांगली, रोहणा, मालेवाडा, बेसूर या भागात नुकसानीचे प्रमाण अधिक आहे. आ. राजू पारवे यांनी अधिकाऱ्यांसह नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, सभापती नेमावली माटे, सभापती ममता शेंडे, सभापती विठ्ठल राऊत, जि.प. सदस्य शंकर डडमल, राहुल मसराम, विजय वराडे, तुळशीदास चुटे आदी उपस्थित होते.

तात्काळ नुकसान भरपाई द्या------------

माजी आ. सुधीर पारवे यांनी नुकसानग्रस्त गावांचा दौरा करीत पाण्याखाली बुडालेल्या शेतातील पिकांची पाहणी केली. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून कुठलेही निकष न ठेवता शेतकऱ्यांना भरीव नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. याबाबत फोनवरून त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही परिस्थितीचे गांभीर्य सांगितले. यावेळी भास्कर येंगळे, केशव ब्रम्हे, प्रमोद बावनगडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

---

३० घरांची पडझड

मुसळधार पावसामुळे घरांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. भिवापूर शहरात ५, धामणगाव (वि.म.) ४, बेल्लरपार ५, धापर्ला (डोये) २, कारगाव २, भगवानपूर १२ अशा एकूण ३० घरांची पडझड झाली आहे. गोंडबोरी-सेलोटी मार्गावरील पुलाचा वरचा भागही वाहून गेला आहे.

--