शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पिकांना पावसाचा फटका, मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:10 IST

भिवापूर : मंगळवारी पहाटेच्या सुमारास आलेल्या मुसळधार पावसाने तालुक्यात होत्याचे नव्हते केले आहे. नदीनाल्यांना पूर आला आणि शेतासह उभी ...

भिवापूर : मंगळवारी पहाटेच्या सुमारास आलेल्या मुसळधार पावसाने तालुक्यात होत्याचे नव्हते केले आहे. नदीनाल्यांना पूर आला आणि शेतासह उभी पिके पाण्यात बुडाली. दरम्यान, पूरपरिस्थिती ओसरताच मंडळ अधिकारी, तलाठी अशी महसूल विभागाची टीम नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेताच्या बांध्यावर पोहचली आहे.

मंगळवारी भिवापूर तालुक्यात १२४.२५ मिमी पाऊस झाला. एकट्या कारगाव मंडळात १६९ मिमी, मालेवाडा मंडळात १४१ म.मी, नांद मंडळात १२० तर भिवापूर मंडळात ६७ मिमी पावसाची नोंद झाली. चार तासाचा हा पाऊस आभाळ फाटल्यागत होता. त्यामुळे कापणीला आलेले सोयाबीन शेतकऱ्यांच्या हातात येण्याची शक्यता आता धूसर आहे. काही शेतात कापणी झालेल्या सोयाबीनचे ढीग तलावसदृश परिस्थितीत उभे आहेत. कापूस, मिरचीसह इतर पिकांचे हाल याहून वेगळे नाही. शेतातील उभी कपाशी आडवी झाली आहे. सोयाबीन काळवंडला असून, त्याचा सडवा होण्याची शक्यता आहे. यदाकदाचित थोड्या फार प्रमाणात सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांच्या हाती आले तरी त्यात गुणवत्ता नसणार आहे. मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पूरपरिस्थिती ओसरण्यास सुरुवात झाली. मात्र त्यानंतरही बुधवारी सकाळी अनेक शेतात पाणी साचले असल्याचे दृश्य शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू ढाळणारे होते. तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांच्या आदेशानुसार बुधवारी सकाळपासूनच महसूल विभागाचे अधिकारी आपापल्या तलाठी साजामध्ये नुकसानीचे सर्व्हे आणि पंचनामे करण्याच्या कामाला लागले. तालुक्यात एक हजार हेक्टरवर शेतिक्षेत्रात नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. नांद, महालगाव, चिखलापार, कारगाव, जवळी, नक्षी, मेढा, वडध, चिखली, मांगली, रोहणा, मालेवाडा, बेसूर या भागात नुकसानीचे प्रमाण अधिक आहे. आ. राजू पारवे यांनी अधिकाऱ्यांसह नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, सभापती नेमावली माटे, सभापती ममता शेंडे, सभापती विठ्ठल राऊत, जि.प. सदस्य शंकर डडमल, राहुल मसराम, विजय वराडे, तुळशीदास चुटे आदी उपस्थित होते.

तात्काळ नुकसान भरपाई द्या------------

माजी आ. सुधीर पारवे यांनी नुकसानग्रस्त गावांचा दौरा करीत पाण्याखाली बुडालेल्या शेतातील पिकांची पाहणी केली. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून कुठलेही निकष न ठेवता शेतकऱ्यांना भरीव नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. याबाबत फोनवरून त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही परिस्थितीचे गांभीर्य सांगितले. यावेळी भास्कर येंगळे, केशव ब्रम्हे, प्रमोद बावनगडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

---

३० घरांची पडझड

मुसळधार पावसामुळे घरांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. भिवापूर शहरात ५, धामणगाव (वि.म.) ४, बेल्लरपार ५, धापर्ला (डोये) २, कारगाव २, भगवानपूर १२ अशा एकूण ३० घरांची पडझड झाली आहे. गोंडबोरी-सेलोटी मार्गावरील पुलाचा वरचा भागही वाहून गेला आहे.

--