शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
2
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
3
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
4
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
5
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
6
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
7
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
8
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
9
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
10
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
11
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
12
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
13
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
14
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
15
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
16
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
17
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
18
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
19
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
20
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?

कामठी तालुक्यात केवळ ३०२ शेतकऱ्यांनाच पीक कर्जवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:07 IST

कामठी : कोरोना संकटाशी दोन हात करत शेतकऱ्यांनी खरीपाची तयारी सुरू केली आहे. विविध बँकामध्ये कर्जासाठी उंबरठे झिजवत आहेत. ...

कामठी : कोरोना संकटाशी दोन हात करत शेतकऱ्यांनी खरीपाची तयारी सुरू केली आहे. विविध बँकामध्ये कर्जासाठी उंबरठे झिजवत आहेत. अशा संकटाच्या काळातही पीक कर्जवाटपात राष्ट्रीयकृत बँका माघारल्याचे दिसत आहे. कामठी तालुक्यात उद्दिष्टाच्या केवळ १० टक्के कर्जाचे वाटप झाले आहे. त्यामुळे वेळेवर पीक कर्ज मिळाले नाही तर शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

खरीप हंगामासाठी तालुक्यातील राष्ट्रीयकृत, खासगी आणि जिल्हा बँकेच्या शाखेला ३४ कोटी ४२ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. १५ एप्रिलपासून कर्ज वितरणाला प्रारंभ झाला. आतापर्यंत केवळ ३०२ शेतकऱ्यांना ३ कोटी ४२ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. उद्दिष्टाच्या १० टक्केच कर्ज वितरण झाले आहे. तालुक्यात राष्ट्रीयकृत बँकांच्या १५ तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ४ शाखा आहेत. अशा एकूण १९ बँकांना ३४ कोटी ४२ लाख रुपयांचे पीक कर्जाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी राष्ट्रीयकृत बँकांना ३२ कोटी ६ लाख रुपये तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना २ कोटी ३६ लाख रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी केवळ ३ कोटी ४२ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. सध्या तालुक्यात नियमित पीककर्जधारक शेतकऱ्यांची संख्या २८५ तर नवीन पीक कर्जधारक शेतकऱ्यांची संख्या १७ आहे.

कडक निर्बंधाचा फटका

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने कडक निर्बंध लावले होते. त्यामुळे बँकाचे कामकाजही बंद ठेवण्यात आले होते. त्याचा परिणाम पीक कर्ज वाटपावरही झाला आहे. खरीप हंगामास सुरुवात झाली असताना जवळपास ९० टक्के शेतकऱ्यांना पीक कर्जाची प्रतीक्षा आहे.

रबीतही बसला फटका

गतवर्षी खरीप हंगामात अतिपावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानातून सावरत शेतकऱ्यांनी रबी हंगामाची तयारी केली. रबीतही शेतकऱ्यांना फारसे उत्पादन झाले नाही. अनेक शेतकऱ्यांना कडक निर्बंधामुळे शेतमालाची विक्री करता आली नाही. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाचा मोठा आधार असतो.

--

बुधवारी सर्व बँक अधिकाऱ्यांची पीककर्ज आढावा बैठक घेण्यात आली. अधिकाऱ्यांना पीककर्ज वाटपाबाबत सूचना देण्यात आल्या. बँकांना जे लक्ष्यांक दिले आहे त्याप्रमाणे पीक कर्ज वाटप करण्याचे तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी त्वरित निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

- अरविंद हिंगे

तहसीलदार, कामठी तालुका