शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

एक रुपयात पीक विमा; ‘जीआर’ येणार कधी? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2023 08:00 IST

Nagpur News संत्रा फळपीक विमा काढण्याची मुदत संपली असून, माेसंबी फळपीक आणि खरीप पिकांचा विमा काढण्याची प्रक्रिया सुरू असली तरी राज्य सरकारने याबाबत ‘जीआर’ काढला नसल्याने शेतकऱ्यांना नियमानुसार हप्त्याच्या रकमेचा भरणा करून पीक विमा काढावा लागत आहे.

साैरभ ढाेरे

नागपूर : राज्य सरकारने पंतप्रधान पीक विमा याेजनेंतर्गत खरीप व रबी पिके, तसेच फळपिकांचा विमा एक रुपयात काढण्यात येणार असल्याची घाेषणा केली हाेती. विम्याच्या हप्त्यातील शेतकऱ्यांच्या वाट्याच्या रकमेचा भरणाही राज्य सरकार करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले हाेते. संत्रा फळपीक विमा काढण्याची मुदत संपली असून, माेसंबी फळपीक आणि खरीप पिकांचा विमा काढण्याची प्रक्रिया सुरू असली तरी राज्य सरकारने याबाबत ‘जीआर’ काढला नसल्याने शेतकऱ्यांना नियमानुसार हप्त्याच्या रकमेचा भरणा करून पीक विमा काढावा लागत आहे.

नरखेड, काटाेल, कळमेश्वर, सावनेर तालुक्यांतील संत्रा व माेसंबी उत्पादक फळपीक विमा काढतात, तर जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी खरीप व रबी पिकांचा नियमित विमा काढतात. केंद्र सरकारने नागपूर जिल्ह्यातील फळपिकांच्या शेतकऱ्यांच्या वाट्यात आधीच माेठी वाढ केली आहे. त्यातच राज्य सरकारने सर्व पीक विमा एक रुपयात काढण्याची घाेषणा केली. यासाठी ३,३१२ काेटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचेही राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले.

याबाबत राज्य सरकारने अद्याप कुठलाही जीआर काढला नसल्याने शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे विम्याच्या हप्त्याची रक्कम भरून पीक विमा काढावा लागत आहे. विशेष म्हणजे, संत्रा फळपीक विमा काढण्याची अंतिम तारीख १४ जून हाेती, तर माेसंबी फळपीक विमा काढण्याची अंतिम तारीख ३० जून आहे. शिवाय, खरीप पिकांचा विमा काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. एक रुपयात पीक विमा याबाबत राज्य सरकारचा जीआर कुणालाही प्राप्त न झाल्याने ही याेजना केवळ कागदावरच असून, त्याचा राजकारणासाठी वापर केला जात असल्याचा आराेप शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मदन कामडे यांनी केला आहे.

नियमानुसार हप्ते भरा

बहुतांश शेतकरी पीककर्ज घेताना पीक विमा काढतात. एक रुपयात पीक विमासंदर्भात कुठलाही जीआर अथवा राज्य सरकारचा आदेश आपल्याला अद्याप प्राप्त झाला नाही. शेतकरी विचारणा करीत असल्याने आपण पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनाही याबाबत कुठलाही आदेश नाही. कंपनी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आपण शेतकऱ्यांकडून नियमानुसार विम्याच्या हप्त्याची रक्कम स्वीकारून पीक विमा काढत आहाेत, अशी माहिती राष्ट्रीयीकृत बँकांच्या काही व्यवस्थापकांनी दिली.

राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक रुपयात पीक विमा ही घाेषणा केली; परंतु त्यांनी अद्याप जीआर काढला नाही. त्यामुळे आपण नियमानुसार विमा हप्त्याच्या रकमेचा भरणा करून संत्रा व इतर पिकांचा विमा काढला आहे. राज्य सरकारने याबाबत तातडीने जीआर काढून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

-चंद्रशेखर कोल्हे,

शेतकरी तथा माजी जि.प. सदस्य, काटाेल

 

संत्रा फळपीक विमा मागील वर्षीप्रमाणेच यंदाही काढावा लागला. विम्याच्या हप्त्यापाेटी चार हजार रुपये प्रतिहेक्टरप्रमाणे दाेन हेक्टरचे आठ हजार रुपये विमा कंपनीला दिले. हा संत्र्याच्या मृग बहाराचा विमा आहे. आंबिया बहारासाठी वेगळा विमा काढावा लागणार आहे. त्यासाठी प्रतिहेक्टर २० हजार रुपयांचा हप्ता विमा कंपनीला द्यावा लागेल.

-मनाेज जवंजाळ,

संत्रा उत्पादक शेतकरी, काटाेल

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्र