शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

एक रुपयात पीक विमा; ‘जीआर’ येणार कधी? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2023 08:00 IST

Nagpur News संत्रा फळपीक विमा काढण्याची मुदत संपली असून, माेसंबी फळपीक आणि खरीप पिकांचा विमा काढण्याची प्रक्रिया सुरू असली तरी राज्य सरकारने याबाबत ‘जीआर’ काढला नसल्याने शेतकऱ्यांना नियमानुसार हप्त्याच्या रकमेचा भरणा करून पीक विमा काढावा लागत आहे.

साैरभ ढाेरे

नागपूर : राज्य सरकारने पंतप्रधान पीक विमा याेजनेंतर्गत खरीप व रबी पिके, तसेच फळपिकांचा विमा एक रुपयात काढण्यात येणार असल्याची घाेषणा केली हाेती. विम्याच्या हप्त्यातील शेतकऱ्यांच्या वाट्याच्या रकमेचा भरणाही राज्य सरकार करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले हाेते. संत्रा फळपीक विमा काढण्याची मुदत संपली असून, माेसंबी फळपीक आणि खरीप पिकांचा विमा काढण्याची प्रक्रिया सुरू असली तरी राज्य सरकारने याबाबत ‘जीआर’ काढला नसल्याने शेतकऱ्यांना नियमानुसार हप्त्याच्या रकमेचा भरणा करून पीक विमा काढावा लागत आहे.

नरखेड, काटाेल, कळमेश्वर, सावनेर तालुक्यांतील संत्रा व माेसंबी उत्पादक फळपीक विमा काढतात, तर जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी खरीप व रबी पिकांचा नियमित विमा काढतात. केंद्र सरकारने नागपूर जिल्ह्यातील फळपिकांच्या शेतकऱ्यांच्या वाट्यात आधीच माेठी वाढ केली आहे. त्यातच राज्य सरकारने सर्व पीक विमा एक रुपयात काढण्याची घाेषणा केली. यासाठी ३,३१२ काेटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचेही राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले.

याबाबत राज्य सरकारने अद्याप कुठलाही जीआर काढला नसल्याने शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे विम्याच्या हप्त्याची रक्कम भरून पीक विमा काढावा लागत आहे. विशेष म्हणजे, संत्रा फळपीक विमा काढण्याची अंतिम तारीख १४ जून हाेती, तर माेसंबी फळपीक विमा काढण्याची अंतिम तारीख ३० जून आहे. शिवाय, खरीप पिकांचा विमा काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. एक रुपयात पीक विमा याबाबत राज्य सरकारचा जीआर कुणालाही प्राप्त न झाल्याने ही याेजना केवळ कागदावरच असून, त्याचा राजकारणासाठी वापर केला जात असल्याचा आराेप शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मदन कामडे यांनी केला आहे.

नियमानुसार हप्ते भरा

बहुतांश शेतकरी पीककर्ज घेताना पीक विमा काढतात. एक रुपयात पीक विमासंदर्भात कुठलाही जीआर अथवा राज्य सरकारचा आदेश आपल्याला अद्याप प्राप्त झाला नाही. शेतकरी विचारणा करीत असल्याने आपण पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनाही याबाबत कुठलाही आदेश नाही. कंपनी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आपण शेतकऱ्यांकडून नियमानुसार विम्याच्या हप्त्याची रक्कम स्वीकारून पीक विमा काढत आहाेत, अशी माहिती राष्ट्रीयीकृत बँकांच्या काही व्यवस्थापकांनी दिली.

राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक रुपयात पीक विमा ही घाेषणा केली; परंतु त्यांनी अद्याप जीआर काढला नाही. त्यामुळे आपण नियमानुसार विमा हप्त्याच्या रकमेचा भरणा करून संत्रा व इतर पिकांचा विमा काढला आहे. राज्य सरकारने याबाबत तातडीने जीआर काढून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

-चंद्रशेखर कोल्हे,

शेतकरी तथा माजी जि.प. सदस्य, काटाेल

 

संत्रा फळपीक विमा मागील वर्षीप्रमाणेच यंदाही काढावा लागला. विम्याच्या हप्त्यापाेटी चार हजार रुपये प्रतिहेक्टरप्रमाणे दाेन हेक्टरचे आठ हजार रुपये विमा कंपनीला दिले. हा संत्र्याच्या मृग बहाराचा विमा आहे. आंबिया बहारासाठी वेगळा विमा काढावा लागणार आहे. त्यासाठी प्रतिहेक्टर २० हजार रुपयांचा हप्ता विमा कंपनीला द्यावा लागेल.

-मनाेज जवंजाळ,

संत्रा उत्पादक शेतकरी, काटाेल

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्र