शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा कंपन्या मालामाल; २०.४३ कोटी भरले; शेतकऱ्यांना मिळणार १०.४७ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:07 IST

नागपूर : मागील खरीप हंगामात जिल्ह्यात सर्वच तालुक्यातील शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागला. पुरामुळे पिके खरडून गेली, अवकाळी ...

नागपूर : मागील खरीप हंगामात जिल्ह्यात सर्वच तालुक्यातील शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागला. पुरामुळे पिके खरडून गेली, अवकाळी पावसाने पीक हातचे गेले. मात्र पीक विमा कंपनीने नुकसानभरपाई देताना अनेक शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवले.

नागपूर जिल्ह्यात रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीला तीन वर्षासाठी काम देण्यात आले आहे. २०२०-२१ च्या खरीप हंगामात कर्जदार आणि बिगर कर्जदार असलेल्या ३०,०२४ शेतकऱ्यांनी या योजनेत भाग घेतला. प्रशासनाकडूनही प्रोत्साहित करण्यात आले. दुर्दैवाने गतवर्षी अवकाळी पाऊस आला. ऐन सोयाबीन कापणीच्या वेळी वाहून गेले. संत्रा, फळ-भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. पुराने पिके खरडून निघाली. पाहणीसाठी केंद्रीय पथकही आले होते. मात्र आणेवारी जाहीर करताना शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्या गेली. अनेकांचे नुकसान होऊनही पीक विम्याची मदत २१ ते २२ टक्के शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

...

पॉईंटर्स

खरीप २०२०-२१

पीक विमा लागवड क्षेत्र - २७,५३२ हेक्टर

एकूण जमा रक्कम - २०,४३,९३,०००

...

एकूण मंजूर पीक विमा - १०,४७,०५,८७७

प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी भरलेले पैसे - ३,७०,९३,०००

राज्य सरकारने भरलेले पैसे - ८,३६,५०,०००

केंद्र सरकारने भरलेले पैसे - ८,३६,५०,०००

विमा काढणारे शेतकरी - ३०,०२४

लाभार्थी शेतकरी - ५,८७७

आतापर्यंत किती जणांना मिळाला विमा - २९५

आतापर्यंत वाटप केलेली रक्कम - ६४,००,०००

...

बॉक्स

२४,१७४ हजार शेतकरी बाद

३०,०२४ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला होता. यातील फक्त ५,८७७ शेतकरीच मदतपात्र ठरले आहेत. लाभासाठी पाच बाबींचे निकष लावण्यात येतात. यातील पीक पेरणी ते काढणीपर्यंत आलेली नैसर्गिक आपत्ती, स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पद्धतीमधील नुकसान या तीन बाबींचाच विचार विम्याची मदत देताना झाला.

...

विमा भरूनही भरपाई नाही... (शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया)

- धानाचे प्रचंड नुकसान झाले. विमा कंपनीकडे ऑनलाईन तक्रार केली. अधिकारी बांधावर आले. नुकसानीचे फोटोशूट झाले. पंचनामा करून गेले. ऑक्टोबर-२०२० पासून नुकसानभरपाई मिळाली नाही. वारंवार संपर्क करूनही प्रतिसाद देत नाहीत. रुपयासुद्धा मिळाला नाही.

-राम कळमकर (शेतकरी), परसोडी, ता. उमरेड

...

गतवर्षी पावसामुळे आमच्या शेतातील पिके अक्षरश: खरडून गेली. कृषी अधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे सर्व्हे केला. मात्र विम्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे यावर्षी आम्ही पीक विमा काढणार नाही. या योजनेत केवळ विमा उतरविणारी कंपनी मालामाल होत आहे.

- अनिकेत वराडे, नक्षी, ता. भिवापूर

...

खरीप पीक विमा योजनेंतर्गत खरीपात लागवड केलेल्या सर्वच पिकांचा विमा मी काढला होता. पिकाचे नुकसान होऊनही यादीत नाव आले नाही. असाच अन्याय होत राहिला तर पीक विमा काढून फायदा काय? मदत मिळणार नसेल तर आम्हा शेतकऱ्यांना विचार करावा लागेल.

- नितीन चालखोर, चनकापूर, ता. काटोल

...