शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पीक विमा कंपन्या मालामाल; २०.४३ कोटी भरले; शेतकऱ्यांना मिळणार १०.४७ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:07 IST

नागपूर : मागील खरीप हंगामात जिल्ह्यात सर्वच तालुक्यातील शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागला. पुरामुळे पिके खरडून गेली, अवकाळी ...

नागपूर : मागील खरीप हंगामात जिल्ह्यात सर्वच तालुक्यातील शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागला. पुरामुळे पिके खरडून गेली, अवकाळी पावसाने पीक हातचे गेले. मात्र पीक विमा कंपनीने नुकसानभरपाई देताना अनेक शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवले.

नागपूर जिल्ह्यात रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीला तीन वर्षासाठी काम देण्यात आले आहे. २०२०-२१ च्या खरीप हंगामात कर्जदार आणि बिगर कर्जदार असलेल्या ३०,०२४ शेतकऱ्यांनी या योजनेत भाग घेतला. प्रशासनाकडूनही प्रोत्साहित करण्यात आले. दुर्दैवाने गतवर्षी अवकाळी पाऊस आला. ऐन सोयाबीन कापणीच्या वेळी वाहून गेले. संत्रा, फळ-भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. पुराने पिके खरडून निघाली. पाहणीसाठी केंद्रीय पथकही आले होते. मात्र आणेवारी जाहीर करताना शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्या गेली. अनेकांचे नुकसान होऊनही पीक विम्याची मदत २१ ते २२ टक्के शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

...

पॉईंटर्स

खरीप २०२०-२१

पीक विमा लागवड क्षेत्र - २७,५३२ हेक्टर

एकूण जमा रक्कम - २०,४३,९३,०००

...

एकूण मंजूर पीक विमा - १०,४७,०५,८७७

प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी भरलेले पैसे - ३,७०,९३,०००

राज्य सरकारने भरलेले पैसे - ८,३६,५०,०००

केंद्र सरकारने भरलेले पैसे - ८,३६,५०,०००

विमा काढणारे शेतकरी - ३०,०२४

लाभार्थी शेतकरी - ५,८७७

आतापर्यंत किती जणांना मिळाला विमा - २९५

आतापर्यंत वाटप केलेली रक्कम - ६४,००,०००

...

बॉक्स

२४,१७४ हजार शेतकरी बाद

३०,०२४ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला होता. यातील फक्त ५,८७७ शेतकरीच मदतपात्र ठरले आहेत. लाभासाठी पाच बाबींचे निकष लावण्यात येतात. यातील पीक पेरणी ते काढणीपर्यंत आलेली नैसर्गिक आपत्ती, स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पद्धतीमधील नुकसान या तीन बाबींचाच विचार विम्याची मदत देताना झाला.

...

विमा भरूनही भरपाई नाही... (शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया)

- धानाचे प्रचंड नुकसान झाले. विमा कंपनीकडे ऑनलाईन तक्रार केली. अधिकारी बांधावर आले. नुकसानीचे फोटोशूट झाले. पंचनामा करून गेले. ऑक्टोबर-२०२० पासून नुकसानभरपाई मिळाली नाही. वारंवार संपर्क करूनही प्रतिसाद देत नाहीत. रुपयासुद्धा मिळाला नाही.

-राम कळमकर (शेतकरी), परसोडी, ता. उमरेड

...

गतवर्षी पावसामुळे आमच्या शेतातील पिके अक्षरश: खरडून गेली. कृषी अधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे सर्व्हे केला. मात्र विम्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे यावर्षी आम्ही पीक विमा काढणार नाही. या योजनेत केवळ विमा उतरविणारी कंपनी मालामाल होत आहे.

- अनिकेत वराडे, नक्षी, ता. भिवापूर

...

खरीप पीक विमा योजनेंतर्गत खरीपात लागवड केलेल्या सर्वच पिकांचा विमा मी काढला होता. पिकाचे नुकसान होऊनही यादीत नाव आले नाही. असाच अन्याय होत राहिला तर पीक विमा काढून फायदा काय? मदत मिळणार नसेल तर आम्हा शेतकऱ्यांना विचार करावा लागेल.

- नितीन चालखोर, चनकापूर, ता. काटोल

...