शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पीक विमा कंपन्या मालामाल; २०.४३ कोटी भरले; शेतकऱ्यांना मिळणार १०.४७ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 23:43 IST

Crop insurance मागील खरीप हंगामात जिल्ह्यात सर्वच तालुक्यातील शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागला. पुरामुळे पिके खरडून गेली, अवकाळी पावसाने पीक हातचे गेले. मात्र पीक विमा कंपनीने नुकसानभरपाई देताना अनेक शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवले.

ठळक मुद्दे३०,०२४ शेतकऱ्यांपैकी जिल्ह्यात विमापात्र ठरले फक्त ५,८७७ शेतकरी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मागील खरीप हंगामात जिल्ह्यात सर्वच तालुक्यातील शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागला. पुरामुळे पिके खरडून गेली, अवकाळी पावसाने पीक हातचे गेले. मात्र पीक विमा कंपनीने नुकसानभरपाई देताना अनेक शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवले.

नागपूर जिल्ह्यात रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीला तीन वर्षासाठी काम देण्यात आले आहे. २०२०-२१ च्या खरीप हंगामात कर्जदार आणि बिगर कर्जदार असलेल्या ३०,०२४ शेतकऱ्यांनी या योजनेत भाग घेतला. प्रशासनाकडूनही प्रोत्साहित करण्यात आले. दुर्दैवाने गतवर्षी अवकाळी पाऊस आला. ऐन सोयाबीन कापणीच्या वेळी वाहून गेले. संत्रा, फळ-भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. पुराने पिके खरडून निघाली. पाहणीसाठी केंद्रीय पथकही आले होते. मात्र आणेवारी जाहीर करताना शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्या गेली. अनेकांचे नुकसान होऊनही पीक विम्याची मदत २१ ते २२ टक्के शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

खरीप २०२०-२१

पीक विमा लागवड क्षेत्र - २७,५३२ हेक्टर

एकूण जमा रक्कम - २०,४३,९३,०००

एकूण मंजूर पीक विमा - १०,४७,०५,८७७

प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी भरलेले पैसे - ३,७०,९३,०००

राज्य सरकारने भरलेले पैसे - ८,३६,५०,०००

केंद्र सरकारने भरलेले पैसे - ८,३६,५०,०००

विमा काढणारे शेतकरी - ३०,०२४

लाभार्थी शेतकरी - ५,८७७

आतापर्यंत किती जणांना मिळाला विमा - २९५

आतापर्यंत वाटप केलेली रक्कम - ६४,००,०००

२४,१७४ हजार शेतकरी बाद

३०,०२४ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला होता. यातील फक्त ५,८७७ शेतकरीच मदतपात्र ठरले आहेत. लाभासाठी पाच बाबींचे निकष लावण्यात येतात. यातील पीक पेरणी ते काढणीपर्यंत आलेली नैसर्गिक आपत्ती, स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पद्धतीमधील नुकसान या तीन बाबींचाच विचार विम्याची मदत देताना झाला.

विमा भरूनही भरपाई नाही... (शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया)

- धानाचे प्रचंड नुकसान झाले. विमा कंपनीकडे ऑनलाईन तक्रार केली. अधिकारी बांधावर आले. नुकसानीचे फोटोशूट झाले. पंचनामा करून गेले. ऑक्टोबर-२०२० पासून नुकसानभरपाई मिळाली नाही. वारंवार संपर्क करूनही प्रतिसाद देत नाहीत. रुपयासुद्धा मिळाला नाही.

-राम कळमकर (शेतकरी), परसोडी, ता. उमरेड

गतवर्षी पावसामुळे आमच्या शेतातील पिके अक्षरश: खरडून गेली. कृषी अधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे सर्व्हे केला. मात्र विम्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे यावर्षी आम्ही पीक विमा काढणार नाही. या योजनेत केवळ विमा उतरविणारी कंपनी मालामाल होत आहे.

- अनिकेत वराडे, नक्षी, ता. भिवापूर

खरीप पीक विमा योजनेंतर्गत खरीपात लागवड केलेल्या सर्वच पिकांचा विमा मी काढला होता. पिकाचे नुकसान होऊनही यादीत नाव आले नाही. असाच अन्याय होत राहिला तर पीक विमा काढून फायदा काय? मदत मिळणार नसेल तर आम्हा शेतकऱ्यांना विचार करावा लागेल.

- नितीन चालखोर, चनकापूर, ता. काटोल

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी