शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

पीक विमा कंपन्या मालामाल; २०.४३ कोटी भरले; शेतकऱ्यांना मिळणार १०.४७ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 23:43 IST

Crop insurance मागील खरीप हंगामात जिल्ह्यात सर्वच तालुक्यातील शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागला. पुरामुळे पिके खरडून गेली, अवकाळी पावसाने पीक हातचे गेले. मात्र पीक विमा कंपनीने नुकसानभरपाई देताना अनेक शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवले.

ठळक मुद्दे३०,०२४ शेतकऱ्यांपैकी जिल्ह्यात विमापात्र ठरले फक्त ५,८७७ शेतकरी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मागील खरीप हंगामात जिल्ह्यात सर्वच तालुक्यातील शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागला. पुरामुळे पिके खरडून गेली, अवकाळी पावसाने पीक हातचे गेले. मात्र पीक विमा कंपनीने नुकसानभरपाई देताना अनेक शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवले.

नागपूर जिल्ह्यात रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीला तीन वर्षासाठी काम देण्यात आले आहे. २०२०-२१ च्या खरीप हंगामात कर्जदार आणि बिगर कर्जदार असलेल्या ३०,०२४ शेतकऱ्यांनी या योजनेत भाग घेतला. प्रशासनाकडूनही प्रोत्साहित करण्यात आले. दुर्दैवाने गतवर्षी अवकाळी पाऊस आला. ऐन सोयाबीन कापणीच्या वेळी वाहून गेले. संत्रा, फळ-भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. पुराने पिके खरडून निघाली. पाहणीसाठी केंद्रीय पथकही आले होते. मात्र आणेवारी जाहीर करताना शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्या गेली. अनेकांचे नुकसान होऊनही पीक विम्याची मदत २१ ते २२ टक्के शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

खरीप २०२०-२१

पीक विमा लागवड क्षेत्र - २७,५३२ हेक्टर

एकूण जमा रक्कम - २०,४३,९३,०००

एकूण मंजूर पीक विमा - १०,४७,०५,८७७

प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी भरलेले पैसे - ३,७०,९३,०००

राज्य सरकारने भरलेले पैसे - ८,३६,५०,०००

केंद्र सरकारने भरलेले पैसे - ८,३६,५०,०००

विमा काढणारे शेतकरी - ३०,०२४

लाभार्थी शेतकरी - ५,८७७

आतापर्यंत किती जणांना मिळाला विमा - २९५

आतापर्यंत वाटप केलेली रक्कम - ६४,००,०००

२४,१७४ हजार शेतकरी बाद

३०,०२४ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला होता. यातील फक्त ५,८७७ शेतकरीच मदतपात्र ठरले आहेत. लाभासाठी पाच बाबींचे निकष लावण्यात येतात. यातील पीक पेरणी ते काढणीपर्यंत आलेली नैसर्गिक आपत्ती, स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पद्धतीमधील नुकसान या तीन बाबींचाच विचार विम्याची मदत देताना झाला.

विमा भरूनही भरपाई नाही... (शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया)

- धानाचे प्रचंड नुकसान झाले. विमा कंपनीकडे ऑनलाईन तक्रार केली. अधिकारी बांधावर आले. नुकसानीचे फोटोशूट झाले. पंचनामा करून गेले. ऑक्टोबर-२०२० पासून नुकसानभरपाई मिळाली नाही. वारंवार संपर्क करूनही प्रतिसाद देत नाहीत. रुपयासुद्धा मिळाला नाही.

-राम कळमकर (शेतकरी), परसोडी, ता. उमरेड

गतवर्षी पावसामुळे आमच्या शेतातील पिके अक्षरश: खरडून गेली. कृषी अधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे सर्व्हे केला. मात्र विम्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे यावर्षी आम्ही पीक विमा काढणार नाही. या योजनेत केवळ विमा उतरविणारी कंपनी मालामाल होत आहे.

- अनिकेत वराडे, नक्षी, ता. भिवापूर

खरीप पीक विमा योजनेंतर्गत खरीपात लागवड केलेल्या सर्वच पिकांचा विमा मी काढला होता. पिकाचे नुकसान होऊनही यादीत नाव आले नाही. असाच अन्याय होत राहिला तर पीक विमा काढून फायदा काय? मदत मिळणार नसेल तर आम्हा शेतकऱ्यांना विचार करावा लागेल.

- नितीन चालखोर, चनकापूर, ता. काटोल

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी