शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पीक विमा राफेलपेक्षा मोठा घोटाळा : पी. साईनाथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 20:52 IST

केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करून ‘प्रधानमंत्री फसल विमा’ची घोषणा केली. मात्र या योजनेची तीन वर्षांची आकडेवारी निराशाजनक असल्याची टीका त्यांनी केली. पहिल्या दोनच वर्षांत विमा घेणाऱ्या कंपन्यांनी या योजनेतून १५,७९५ कोटी रुपयांचा फायदा प्राप्त केला. शेतकऱ्यांना मात्र यातून काहीही हाती आले नाही, त्यामुळे दुसऱ्याच वर्षी विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी घटले तरी कंपन्यांचा फायदा मात्र वाढला. सरकारने ही योजना शेतकऱ्यांसाठी नव्हे तर विम्याचा व्यवसाय करणाऱ्या कंपन्या व बँकांसाठी आणल्याचा आरोप करीत, पीक विमा योजना हा राफेलपेक्षाही मोठा घोटाळा असल्याचा दावा पी. साईनाथ यांनी केला.

ठळक मुद्देदुष्काळासाठी लावलेले निकष शेतकरीविरोधी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र शासनाने राज्यात दुष्काळ जाहीर केला असला तरी केंद्र शासनाने २०१६ मध्ये दुष्काळाच्या निकषात केलेल्या बदलामुळे त्याचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळेल, असे दिसून येत नाही. पूर्वी गावस्तरावर जाऊन शेतकऱ्यांची विचारपूस करून सर्वेक्षण केले जायचे. ५० टक्के आणेवारीचा निकष लावला जायचा. मात्र केंद्राने हे निकष बाजूला ठेवून सॅटेलाईटद्वारे सर्वेक्षणाचा फार्स चालविला आहे. दुष्काळग्रस्तांना मदतीचे अधिकारही राज्य शासनाकडून काढून स्वत:कडे ठेवले आहेत. यामुळे अर्ध्यापेक्षा जास्त पीडित शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणारच नसल्याने केंद्राने लावलेले दुष्काळाचे निकष शेतकऱ्यांसाठी हिताचे नाहीत, अशी टीका ज्येष्ठ पत्रकार व कृषितज्ज्ञ पी. साईनाथ यांनी केली.शनिवारी एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात दुष्काळाची स्थिती अतिशय विदारक असून, भविष्यातही अधिकच भीषण होणार आहे. पुढच्या दोन महिन्यानंतरच या स्थितीचा सामना करावा लागणार असून, पिण्यासाठीही पाण्याचे दुर्भिक्ष्य सहन करावे लागणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. असे असताना सरकार मात्र याबाबत फारसे गंभीर दिसत नाही. महाराष्ट्र शासनाने जवळपास दीडशे गावांमध्ये दुष्काळ असल्याचे जाहीर केले. वास्तविक राज्यात २५० पेक्षा जास्त गावात भीषण दुष्काळाची स्थिती आहे. सरकारला हे माहीत आहे व म्हणूनच केंद्राकडे ७,००० कोटी दुष्काळ निधीची मागणी करण्यात आली. मात्र सर्वेक्षणाच्या निकषामुळे सरकारी मदतीचा हवा तसा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नसल्याची टीका त्यांनी केली.केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करून ‘प्रधानमंत्री फसल विमा’ची घोषणा केली. मात्र या योजनेची तीन वर्षांची आकडेवारी निराशाजनक असल्याची टीका त्यांनी केली. पहिल्या दोनच वर्षांत विमा घेणाऱ्या कंपन्यांनी या योजनेतून १५,७९५ कोटी रुपयांचा फायदा प्राप्त केला. शेतकऱ्यांना मात्र यातून काहीही हाती आले नाही, त्यामुळे दुसऱ्याच वर्षी विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी घटले तरी कंपन्यांचा फायदा मात्र वाढला. सरकारने ही योजना शेतकऱ्यांसाठी नव्हे तर विम्याचा व्यवसाय करणाऱ्या कंपन्या व बँकांसाठी आणल्याचा आरोप करीत, पीक विमा योजना हा राफेलपेक्षाही मोठा घोटाळा असल्याचा दावा पी. साईनाथ यांनी यावेळी केला.जीएसटी व नोटाबंदीमुळे लघु उद्योजक व कृषी क्षेत्राचेही कंबरडे मोडले आहे. सरकार मोठमोठे दावे करीत असले तरी शेतकऱ्यांची स्थिती आधीपेक्षा अधिक वाईट झाल्याची टीका त्यांनी केली. शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्याचा दावा केवळ फार्स असून त्यापेक्षा उत्पन्न दुप्पट वाढण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी कृषी अभ्यासक विजय जावंधिया प्रामुख्याने उपस्थित होते.‘शेतकऱ्यांसाठी राष्ट्र’ आंदोलन २९ व ३० लाप्रा. स्वामिनाथन आयोगातर्फे कृषी विकासाचा अहवाल सादर करून १४ वर्षे लोटली आहेत. मात्र त्यावर साधी चर्चा करण्याची वेळ सरकारला मिळत नाही, ही शोकांतिका असल्याची टीका त्यांनी केली. आयोगाच्या अहवालाव्यतिरिक्त प्रा. स्वामिनाथन यांनी सादर केलेले दोन बिलही बासनात गुंडाळण्यात आले आहेत. सरकारला उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अर्ध्यारात्री वेळ मिळतो, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे दुष्काळ आणि शेती समस्येवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष सत्र बोलावून चर्चा करण्याच्या मागणीसाठी येत्या २९ व ३० नोव्हेंबरला ‘नेशन फॉर फार्मर्स’ ची घोषणा करीत दिल्ली येथे मोर्चा काढला जाणार आहे. देशभरातून लाखो शेतकरी, कार्यकर्ते, विद्यार्थी, व्यावसायिक, नोकरवर्ग यात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. जे दिल्लीला येऊ शकत नाही त्यांनी त्यांच्या शहरातच आंदोलनाला पाठिंबा देत आंदोलन करावे, असे आवाहन साईनाथ यांनी केले.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाRafale Dealराफेल डील