शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

कालव्याची पाळ फुटल्याने पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:10 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : मुसळधार पावसामुळे भिवापूर तालुक्यातील नदीनाल्यांना पूर आला आणि त्यातच उपसा सिंचन याेजनेच्या कालव्यात पाणी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

भिवापूर : मुसळधार पावसामुळे भिवापूर तालुक्यातील नदीनाल्यांना पूर आला आणि त्यातच उपसा सिंचन याेजनेच्या कालव्यात पाणी साचले. त्यामुळे या कालव्याची पाळ फुटल्याने तालुक्यातील मेढा व वडध शिवारातील कालव्यालगतच्या शेतात पाणी साचले व पिकांचे प्रचंड नुकसान झाले.

मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेंतर्गत गोसेखुर्द धरणातून पाण्याची उचल केली जाते व ते पाणी भिवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी उपलब्ध करून दिले जाते. हा कालवा तालुक्यातील मेढा, वडध शिवारातून गेला आहे. दरम्यान, मंगळवारी पहाटेपासून तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे बहुतांश नदीनाल्यांना माेठा पूर आला. त्यातच या कालव्याची मातीची पाळ पहाटेच्या सुमारास फुटली आणि कालव्यातील पाणी लगतच्या शेतात साचले.

या पाण्यामुळे मेढा शिवारातील गुलाब गोडे, अनिल नागोसे व प्रमोद वैद्य यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या शेताला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले हाेते. आधीच सततच्या पावसामुळे पाण्याचा व्यवस्थित निचरा हाेत नाही. त्यात कालव्याची पाळ फुटल्याने पुन्हा भर पडली आहे. त्यामुळे शेतातील साेयाबीन, कपाशीसह अन्य पिके सडण्याची व नष्ट हाेण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

...

कालवा निरुपयाेगी?

या कालव्याचे पाणी अद्यापही सिंचनासाठी मिळाले नाही, असा आराेप मेढा व वडध शिवारातील शेतकऱ्यांनी केला असून, हा कालवा निरुपयाेगी तसेच नुकसानीस कारणीभूत ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. या कालव्याचे ठिकठिकाणी मातीकाम करण्यात आले आहे. पावसामुळे या कालव्याची पाळ अन्य ठिकाणी फुटण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, प्रशासनाने या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करावे व याेग्य नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

210921\img-20210921-wa0098.jpg

कालव्याची पाळ फुटल्यामुळे शेतांना असे तलावाचे रूप आले आहे.