शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

कालव्याची पाळ फुटल्याने पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:10 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : मुसळधार पावसामुळे भिवापूर तालुक्यातील नदीनाल्यांना पूर आला आणि त्यातच उपसा सिंचन याेजनेच्या कालव्यात पाणी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

भिवापूर : मुसळधार पावसामुळे भिवापूर तालुक्यातील नदीनाल्यांना पूर आला आणि त्यातच उपसा सिंचन याेजनेच्या कालव्यात पाणी साचले. त्यामुळे या कालव्याची पाळ फुटल्याने तालुक्यातील मेढा व वडध शिवारातील कालव्यालगतच्या शेतात पाणी साचले व पिकांचे प्रचंड नुकसान झाले.

मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेंतर्गत गोसेखुर्द धरणातून पाण्याची उचल केली जाते व ते पाणी भिवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी उपलब्ध करून दिले जाते. हा कालवा तालुक्यातील मेढा, वडध शिवारातून गेला आहे. दरम्यान, मंगळवारी पहाटेपासून तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे बहुतांश नदीनाल्यांना माेठा पूर आला. त्यातच या कालव्याची मातीची पाळ पहाटेच्या सुमारास फुटली आणि कालव्यातील पाणी लगतच्या शेतात साचले.

या पाण्यामुळे मेढा शिवारातील गुलाब गोडे, अनिल नागोसे व प्रमोद वैद्य यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या शेताला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले हाेते. आधीच सततच्या पावसामुळे पाण्याचा व्यवस्थित निचरा हाेत नाही. त्यात कालव्याची पाळ फुटल्याने पुन्हा भर पडली आहे. त्यामुळे शेतातील साेयाबीन, कपाशीसह अन्य पिके सडण्याची व नष्ट हाेण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

...

कालवा निरुपयाेगी?

या कालव्याचे पाणी अद्यापही सिंचनासाठी मिळाले नाही, असा आराेप मेढा व वडध शिवारातील शेतकऱ्यांनी केला असून, हा कालवा निरुपयाेगी तसेच नुकसानीस कारणीभूत ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. या कालव्याचे ठिकठिकाणी मातीकाम करण्यात आले आहे. पावसामुळे या कालव्याची पाळ अन्य ठिकाणी फुटण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, प्रशासनाने या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करावे व याेग्य नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

210921\img-20210921-wa0098.jpg

कालव्याची पाळ फुटल्यामुळे शेतांना असे तलावाचे रूप आले आहे.