शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

कालव्याची पाळ फुटल्याने पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:10 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : मुसळधार पावसामुळे भिवापूर तालुक्यातील नदीनाल्यांना पूर आला आणि त्यातच उपसा सिंचन याेजनेच्या कालव्यात पाणी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

भिवापूर : मुसळधार पावसामुळे भिवापूर तालुक्यातील नदीनाल्यांना पूर आला आणि त्यातच उपसा सिंचन याेजनेच्या कालव्यात पाणी साचले. त्यामुळे या कालव्याची पाळ फुटल्याने तालुक्यातील मेढा व वडध शिवारातील कालव्यालगतच्या शेतात पाणी साचले व पिकांचे प्रचंड नुकसान झाले.

मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेंतर्गत गोसेखुर्द धरणातून पाण्याची उचल केली जाते व ते पाणी भिवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी उपलब्ध करून दिले जाते. हा कालवा तालुक्यातील मेढा, वडध शिवारातून गेला आहे. दरम्यान, मंगळवारी पहाटेपासून तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे बहुतांश नदीनाल्यांना माेठा पूर आला. त्यातच या कालव्याची मातीची पाळ पहाटेच्या सुमारास फुटली आणि कालव्यातील पाणी लगतच्या शेतात साचले.

या पाण्यामुळे मेढा शिवारातील गुलाब गोडे, अनिल नागोसे व प्रमोद वैद्य यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या शेताला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले हाेते. आधीच सततच्या पावसामुळे पाण्याचा व्यवस्थित निचरा हाेत नाही. त्यात कालव्याची पाळ फुटल्याने पुन्हा भर पडली आहे. त्यामुळे शेतातील साेयाबीन, कपाशीसह अन्य पिके सडण्याची व नष्ट हाेण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

...

कालवा निरुपयाेगी?

या कालव्याचे पाणी अद्यापही सिंचनासाठी मिळाले नाही, असा आराेप मेढा व वडध शिवारातील शेतकऱ्यांनी केला असून, हा कालवा निरुपयाेगी तसेच नुकसानीस कारणीभूत ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. या कालव्याचे ठिकठिकाणी मातीकाम करण्यात आले आहे. पावसामुळे या कालव्याची पाळ अन्य ठिकाणी फुटण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, प्रशासनाने या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करावे व याेग्य नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

210921\img-20210921-wa0098.jpg

कालव्याची पाळ फुटल्यामुळे शेतांना असे तलावाचे रूप आले आहे.