शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor Live Updates: PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; 'ऑपरेशन सिंदूर'ची दिली माहिती
2
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
3
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
4
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
5
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
6
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
7
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
8
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
9
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक, कोण काय म्हणाले?
10
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
11
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान
12
चंद्र-केतु ग्रहण योगात मोहिनी एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी नारायणाची कृपा, शुभ फले; घवघवीत यश!
13
BSNL नं आणली Mother's Day ऑफर, स्वस्त केले आपले ३ रिचार्ज प्लान्स; पाहा डिटेल्स
14
Operation Sindoor : "जे काही घडलं ते बरोबर, पहलगाममध्ये धर्म विचारणाऱ्या ४ दहशतवाद्यांचाही केला पाहिजे खात्मा"
15
विजापूरमध्ये भीषण चकमक; कर्रेगुट्टा टेकड्यांमध्ये लपलेल्या 15+ नक्षलवाद्यांचा खात्मा
16
त्यांनी महिलांना मारलं नाही पण...; पहलगाम हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी 'ऑपरेशन सिंदूर'वर काय म्हणाले?
17
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
18
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंग, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
19
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
20
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक

घनकचरा व्यवस्थापन देशासमोरील गंभीर प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 01:32 IST

देशात शहरांची सातत्याने वाढ होत असून वाढत्या शहरीकरणामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. घनकचरा व्यवस्थापन हा त्यातीलच सर्वात मोठा प्रश्न असून भविष्यातील हा एक गंभीर मुद्दा ठरणार आहे,

ठळक मुद्देतेज पी.सिंह : ‘नीरी’त ‘ईटीबीडब्ल्यूसी’वर आंतरराष्ट्रीय परिषदेला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात शहरांची सातत्याने वाढ होत असून वाढत्या शहरीकरणामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. घनकचरा व्यवस्थापन हा त्यातीलच सर्वात मोठा प्रश्न असून भविष्यातील हा एक गंभीर मुद्दा ठरणार आहे, असे मत ‘एम्स’चे प्रा.तेज पी.सिंह यांनी व्यक्त केले. ‘सीएसआयआर’चा अमृत महोत्सव व ‘सीएसआयआर-नीरी’च्या (नॅशनल एन्व्हायर्नमेन्टल इंजिनिअरींग अ‍ॅन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट) सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून ‘बीआरएसआय’च्या (द बायोटेक रिसर्च सोयायटी आॅफ इंडिया) सहकार्याने ‘ईटीबीडब्ल्यूसी’ (इमर्जिन्ग ट्रेन्ड्स इन बायोटेक्नॉलॉजी फॉर वेस्ट कन्व्हर्जन) आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते रविवारी बोलत होते.८ ते १० आॅक्टोबर या कालावधीत आयोजित या परिषदेचे उद्घाटन ‘नीरी’च्या सभागृहात झाले. यावेळी मोहाली येथील ‘सेंटर आॅफ इनोव्हेटिव्ह अ‍ॅन्ड अप्लाईड बायोप्रोसेसिंग’चे वैज्ञानिक प्रा.अशोक पांडे, ब्लैस पास्कल विद्यापीठाच्या रसायन आणि जीवरसायन अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. क्लॉड गिल्स डुसॅप, ‘नीरी’चे संचालक डॉ.राकेश कुमार, आयोजन सचिव डॉ.सुनील कुमार प्रामुख्याने उपस्थित होते.घनकचरा व्यवस्थापनावर तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे. या परिषदेच्या माध्यमातून अनेक मुद्यांवर प्रकाश टाकण्यात येईल. जीवतंत्रज्ञान क्षेत्रामध्ये सामाजिक कल्याणाची बरीच मोठी क्षमता आहे. मात्र या क्षेत्रात भारत अद्यापही मागेच आहे. ‘डाटाबेस’ विकसित करण्यात देशाने फारसे योगदान दिलेले नाही, याकडे प्रा.सिंह यांनी लक्ष वेधले. यावेळी त्यांनी ‘स्ट्रक्चरल बेसिस आॅफ अ‍ॅन्टिबॅक्टेरियल अ‍ॅक्शन आॅफ इन्नेट इम्यून प्रोटिन्स अ‍ॅन्ड देअर अप्लिकेशन्स अ‍ॅज प्रोटीन अ‍ॅन्टीबायोटिक’ या विषयावर बीजभाषण केले. ‘बीआरआयएस’कडून समाजहितासंदर्भात संशोधन करण्यावर भर देण्यात येईल व एकत्रित प्रयत्नांतून नक्कीच सकारात्मक परिणाम समोर येतील, असा विश्वास प्रा.पांडे यांनी व्यक्त केला. डॉ.राकेश कुमार यांनी ‘नीरी’ने पर्यावरणाच्या क्षेत्रात दिलेल्या योगदानांची माहिती दिली. कचºयाचे ऊर्जा किंवा इतर स्वरूपात रुपांतर करण्याच्या प्रक्रियेमुळे देशात रोजगाराच्यादेखील संधी वाढतील, असे प्रतिपादन डॉ.कुमार यांनी केले.प्रा.क्लॉड गिल्स डुसॅप यांच्या हस्ते ‘बीआरएसआय’ची वार्षिक पुस्तिका व परिषदेच्या ‘ई-प्रोसिडिंग्ज’चे विमोचन करण्यात आले. ‘बीआरएसआय’ पुरस्कारांचेदेखील यावेळी वितरण करण्यात आले. डॉ. सुनील कुमार यांनी परिषदेबाबत माहिती दिली. परिषदेदरम्यान तीन तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. कचरा पुनर्प्रक्रियेतील जागतिक विकास, कचºयापासून जैवइंधन व जैविक उत्पादने, नॅनोटेक्नोलॉजीचा उपयोग इत्यादी मुद्यांवर देशविदेशातील वैज्ञानिक, अभियंते व तज्ज्ञ भाष्य करणार आहेत.