शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

घनकचरा व्यवस्थापन देशासमोरील गंभीर प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 01:32 IST

देशात शहरांची सातत्याने वाढ होत असून वाढत्या शहरीकरणामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. घनकचरा व्यवस्थापन हा त्यातीलच सर्वात मोठा प्रश्न असून भविष्यातील हा एक गंभीर मुद्दा ठरणार आहे,

ठळक मुद्देतेज पी.सिंह : ‘नीरी’त ‘ईटीबीडब्ल्यूसी’वर आंतरराष्ट्रीय परिषदेला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात शहरांची सातत्याने वाढ होत असून वाढत्या शहरीकरणामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. घनकचरा व्यवस्थापन हा त्यातीलच सर्वात मोठा प्रश्न असून भविष्यातील हा एक गंभीर मुद्दा ठरणार आहे, असे मत ‘एम्स’चे प्रा.तेज पी.सिंह यांनी व्यक्त केले. ‘सीएसआयआर’चा अमृत महोत्सव व ‘सीएसआयआर-नीरी’च्या (नॅशनल एन्व्हायर्नमेन्टल इंजिनिअरींग अ‍ॅन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट) सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून ‘बीआरएसआय’च्या (द बायोटेक रिसर्च सोयायटी आॅफ इंडिया) सहकार्याने ‘ईटीबीडब्ल्यूसी’ (इमर्जिन्ग ट्रेन्ड्स इन बायोटेक्नॉलॉजी फॉर वेस्ट कन्व्हर्जन) आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते रविवारी बोलत होते.८ ते १० आॅक्टोबर या कालावधीत आयोजित या परिषदेचे उद्घाटन ‘नीरी’च्या सभागृहात झाले. यावेळी मोहाली येथील ‘सेंटर आॅफ इनोव्हेटिव्ह अ‍ॅन्ड अप्लाईड बायोप्रोसेसिंग’चे वैज्ञानिक प्रा.अशोक पांडे, ब्लैस पास्कल विद्यापीठाच्या रसायन आणि जीवरसायन अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. क्लॉड गिल्स डुसॅप, ‘नीरी’चे संचालक डॉ.राकेश कुमार, आयोजन सचिव डॉ.सुनील कुमार प्रामुख्याने उपस्थित होते.घनकचरा व्यवस्थापनावर तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे. या परिषदेच्या माध्यमातून अनेक मुद्यांवर प्रकाश टाकण्यात येईल. जीवतंत्रज्ञान क्षेत्रामध्ये सामाजिक कल्याणाची बरीच मोठी क्षमता आहे. मात्र या क्षेत्रात भारत अद्यापही मागेच आहे. ‘डाटाबेस’ विकसित करण्यात देशाने फारसे योगदान दिलेले नाही, याकडे प्रा.सिंह यांनी लक्ष वेधले. यावेळी त्यांनी ‘स्ट्रक्चरल बेसिस आॅफ अ‍ॅन्टिबॅक्टेरियल अ‍ॅक्शन आॅफ इन्नेट इम्यून प्रोटिन्स अ‍ॅन्ड देअर अप्लिकेशन्स अ‍ॅज प्रोटीन अ‍ॅन्टीबायोटिक’ या विषयावर बीजभाषण केले. ‘बीआरआयएस’कडून समाजहितासंदर्भात संशोधन करण्यावर भर देण्यात येईल व एकत्रित प्रयत्नांतून नक्कीच सकारात्मक परिणाम समोर येतील, असा विश्वास प्रा.पांडे यांनी व्यक्त केला. डॉ.राकेश कुमार यांनी ‘नीरी’ने पर्यावरणाच्या क्षेत्रात दिलेल्या योगदानांची माहिती दिली. कचºयाचे ऊर्जा किंवा इतर स्वरूपात रुपांतर करण्याच्या प्रक्रियेमुळे देशात रोजगाराच्यादेखील संधी वाढतील, असे प्रतिपादन डॉ.कुमार यांनी केले.प्रा.क्लॉड गिल्स डुसॅप यांच्या हस्ते ‘बीआरएसआय’ची वार्षिक पुस्तिका व परिषदेच्या ‘ई-प्रोसिडिंग्ज’चे विमोचन करण्यात आले. ‘बीआरएसआय’ पुरस्कारांचेदेखील यावेळी वितरण करण्यात आले. डॉ. सुनील कुमार यांनी परिषदेबाबत माहिती दिली. परिषदेदरम्यान तीन तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. कचरा पुनर्प्रक्रियेतील जागतिक विकास, कचºयापासून जैवइंधन व जैविक उत्पादने, नॅनोटेक्नोलॉजीचा उपयोग इत्यादी मुद्यांवर देशविदेशातील वैज्ञानिक, अभियंते व तज्ज्ञ भाष्य करणार आहेत.