शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

प्रशासनाकडून गंभीर चुका

By admin | Updated: April 2, 2015 02:29 IST

मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडून गंभीर चुका झाल्या, त्यामुळेच पाच खतरनाक कैदी कारागृहातून पळून जाऊ शकले,

नागपूर : मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडून गंभीर चुका झाल्या, त्यामुळेच पाच खतरनाक कैदी कारागृहातून पळून जाऊ शकले, अशी स्पष्ट कबुली अतिरिक्त पोलीस महासंचालक (तुरूंग) मीरा बोरवणकर यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांपुढे दिली. मंगळवारी पहाटे पाच खतरनाक कैदी मध्यवर्ती कारागृहातून पळून गेले. त्यामुळे राज्यातील सुरक्षा यंत्रणांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली. या पार्श्वभूमीवर, आज सकाळी पुणे आणि बुलडाणा येथून दोन चौकशी पथके नागपूर कारागृहात सकाळीच पोहचली. खुद्द मीरा बोरवणकरही येथे आल्या. दुपारी ३ वाजेपर्यंत त्यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ दोनच्या कार्यालयात बैठक घेऊन स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्यानंतर दुपारी ४ वाजता त्या कारागृहात पोहचल्या. तब्बल साडेचार तास त्यांनी आतमध्ये पाहणी केली. बडी गोल, बराक क्रमांक ६, घटनास्थळ बघितल्यानंतर त्यांनी कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. रात्री ८.३० ला त्या कारागृहातून बाहेर पडल्या. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी बातचित केली असता त्या म्हणाल्या, मी आज घटनास्थळ बघितले. त्या रात्री कर्तव्यावर असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्याशी चर्चा केली. बराकीत त्या रात्री कोणता वार्डन होता, त्याची माहिती घेतली आणि घटना कशी घडली, त्याची माहिती घेतली. कारागृह प्रशासनाच्या चुकीमुळेच ही घटना घडली हे बरोबर आहे का, असा प्रश्न केला असता त्यांनी त्याला स्पष्ट दुजोरा दिला. प्रशासनाच्या गंभीर चुका झाल्या त्याचमुळे हे पाच कैदी पळून जाऊ शकले, असे त्या म्हणाल्या. कारागृहात अनेकदा मोबाईल, गांजा असे अमली पदार्थ आढळले होते, त्याची माहिती नव्हती का, या गैरप्रकाराला कोण दोषी आहे, असा प्रश्न केला असता त्यांनी मोबाईल गांजासह गैरप्रकार होत होते, याला दुजोरा दिला. मात्र, त्याला कोण किती दोषी आहे, ते आता सांगता येणार नसल्याचे बोरवणकर म्हणाल्या. या गैरप्रकाराबाबत तुमच्याकडे वेळोवेळी तक्रारी झाल्या, अधिकाऱ्यांनी अहवाल पाठवले. तुमच्याकडून कारवाई का झाली नाही, अशी विचारणा केली असता त्यांनी यावर थेट बोलण्याचे टाळले. हे सर्वच अहवाल आपण गृहमंत्रालयाकडे पाठविल्याचे त्यांनी सागिंतले. (प्रतिनिधी)