शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

दुबार पेरणीचे संकट

By admin | Updated: July 5, 2014 02:09 IST

४ जुलैपर्यंत जिल्ह्यात जेमतेम ७८.२६ मि.मी. पाऊ स झाला. सरासरीच्या तुलनेत ३६.३० टक्के पाऊ स झाला आहे.

नागपूर : ४ जुलैपर्यंत जिल्ह्यात जेमतेम ७८.२६ मि.मी. पाऊ स झाला. सरासरीच्या तुलनेत ३६.३० टक्के पाऊ स झाला आहे. पुढील दोन-तीन दिवसात चांगला पाऊ स न झाल्यास ३० ते ४० टक्के पेरण्या दुबार कराव्या लागतील, अशी शक्यता जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने व्यक्त केली आहे. अद्याप चांगला पाऊ स झालेला नाही. कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार १५ जुलैपर्यंत सोयाबीन व कपाशीची पेरणी करता येईल. अद्याप पेरणीची वेळ निघून गेलेली नाही. जिल्ह्यात सर्वत्र पाऊ स झालेला नाही. कुठे चांगला पाऊ स झाला, पण बाजूच्या क्षेत्रात पाऊ स नसल्याचे चित्र आहे. पुढील तीन-चार दिवसात चांगला पाऊ स न झाल्यास ४० टक्के दुबार पेरणी करावी लागेल, अशी शक्यता वर्र्तविली जात आहे.खरीप हंगामासाठी ५,०९९१६ हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. यात कापूस १,५०,००० तर सोयाबीनच्या १,९२५०० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. मागील वर्षाच्या हंगामात जिल्ह्यात ४,८३,६४० हेक्टर क्षेत्रात पेरणी करण्यात आली होती. यात कापूस १,२४,६६५ तर सोयाबीनच्या २,२२,४४८ हेक्टर क्षेत्राचा समावेश होता. तसेच ७८,८१२ हेक्टर क्षेत्रात भाताची लागवड करण्यात आली होती. यावर्षी ८५,००० हेक्टर क्षेत्राचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. जिल्ह्यात अद्याप मान्सून सक्रि य झालेला नाही. वळव्याच्या पावसासारखा पाऊ स पडत आहे. पावसाला विलंब होत असला तरी कापूस व सोयबीनची पेरणी १५ जुलैपर्यंत शक्य आहे. ज्या शेतकऱ्याकडे ओलिताची साधने आहेत त्यांनी पेरणी करायला हरकत नाही. पेरणीजोगा पाऊ स झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असा सल्ला कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)