शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

दुबार पेरणीचे संकट, बियाणांचाही तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:07 IST

भिवापूर : समाधानकारक पावसाच्या आगमनाने खरीपाची सुरुवात झाली. शेतकऱ्यांनी पेरणीही सुरु केली. सुरुवातीच्या काळात पेरण्या साधल्यात. मात्र त्यानंतर ...

भिवापूर : समाधानकारक पावसाच्या आगमनाने खरीपाची सुरुवात झाली. शेतकऱ्यांनी पेरणीही सुरु केली. सुरुवातीच्या काळात पेरण्या साधल्यात. मात्र त्यानंतर पेरलेले बियाणे गत गुरुवारच्या पावसात जमिनीत गडप झाले. प्रत्येक गावात दोन चार शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच दुसरीकडे तालुक्यात बियाणांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे दुबार पेरणी करायची तरी कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

तालुक्यात ९ ते १० जूनपासून अनेकांनी पेरणीला सुरुवात केली. समाधानकारक पाऊस असल्यामुळे पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांचे बियाणे शेतात अंकुरले आहे. मात्र त्यानंतर १७ जून रोजी तालुक्यातील काही भागात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे १५ व १६ जून रोजी पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील बियाणे जमिनीत खोलवर गडप झाले. जास्त पावसामुळे पेरलेल्या बियाणांवर शेतातील मातीचा थर बसला. त्यानंतर पाहीजे तसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. तालुक्यातील जवळी, मालेवाडा, उखळी, चिचाळा, पाहमी, बोटेझरी, मांडवा, वासी, सोमनाळा, वाकेश्वर, भगवानपूर, सायगाव, सालेभट्टी, चारगाव, कवडसी (बरड) पांजरेपार, रोहना, चिखली आदी गावात काही शेतकऱ्यांच्या पेरण्या फसल्या आहेत. आलेल्या नैसर्गिक संकटांशी सामना करण्यासाठी स्वत:ला धीर देत नुकसानग्रसस्त शेतकऱ्यांनी दुबार पेरणीची तयारी चालविली आहे. अशात तालुक्यात सोयाबीन बियाणांचा तुटवडा निर्माण झाला आहे. कृषी सेवा केंद्राकडे सुध्दा आता बियाणे उपलब्ध नाही. त्यामुळे दुबार पेरणी करायची तरी कशी,असा प्रश्न विचारला जात आहे.

पावसाचे आगमन, शेतकऱ्यांना दिलासा

१७ जून रोजी तालुक्यात सर्वत्र पाऊस झाला. जवळी, मालेवाडा, चिचाळा या पट्यामध्ये मुसळधार पाऊस बरसला. यात जमिनीत गडप झालेल्या बियाणांना मोकळा श्वास घेण्यासाठी त्यानंतर हलका पाऊस महत्वाचा होता. मात्र तब्बल पाच दिवस पावसाने उसंत घेतली आणि दुबार पेरणीची संकट ओढवले. अशातच मंगळवारी राञभर चांगला पाऊस झाल्याने ऑक्सिजनवरील कोवळ्या अंकुरलेल्या बियाणांना जीवनदान मिळाले आहे. शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे.

===Photopath===

230621\img-20210621-wa0085.jpg

===Caption===

१७ जूनच्या पावसामुळे जवळी येथील ह्या शेतात पेरलेले बियाणे जमिणीत गडप झाले आणि दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.