शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
4
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
5
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
6
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
7
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
8
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
9
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
10
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
11
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
12
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
13
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
14
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
15
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
16
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
17
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
18
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
19
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
20
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार

दुबार पेरणीचे संकट, बियाणांचाही तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:07 IST

भिवापूर : समाधानकारक पावसाच्या आगमनाने खरीपाची सुरुवात झाली. शेतकऱ्यांनी पेरणीही सुरु केली. सुरुवातीच्या काळात पेरण्या साधल्यात. मात्र त्यानंतर ...

भिवापूर : समाधानकारक पावसाच्या आगमनाने खरीपाची सुरुवात झाली. शेतकऱ्यांनी पेरणीही सुरु केली. सुरुवातीच्या काळात पेरण्या साधल्यात. मात्र त्यानंतर पेरलेले बियाणे गत गुरुवारच्या पावसात जमिनीत गडप झाले. प्रत्येक गावात दोन चार शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच दुसरीकडे तालुक्यात बियाणांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे दुबार पेरणी करायची तरी कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

तालुक्यात ९ ते १० जूनपासून अनेकांनी पेरणीला सुरुवात केली. समाधानकारक पाऊस असल्यामुळे पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांचे बियाणे शेतात अंकुरले आहे. मात्र त्यानंतर १७ जून रोजी तालुक्यातील काही भागात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे १५ व १६ जून रोजी पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील बियाणे जमिनीत खोलवर गडप झाले. जास्त पावसामुळे पेरलेल्या बियाणांवर शेतातील मातीचा थर बसला. त्यानंतर पाहीजे तसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. तालुक्यातील जवळी, मालेवाडा, उखळी, चिचाळा, पाहमी, बोटेझरी, मांडवा, वासी, सोमनाळा, वाकेश्वर, भगवानपूर, सायगाव, सालेभट्टी, चारगाव, कवडसी (बरड) पांजरेपार, रोहना, चिखली आदी गावात काही शेतकऱ्यांच्या पेरण्या फसल्या आहेत. आलेल्या नैसर्गिक संकटांशी सामना करण्यासाठी स्वत:ला धीर देत नुकसानग्रसस्त शेतकऱ्यांनी दुबार पेरणीची तयारी चालविली आहे. अशात तालुक्यात सोयाबीन बियाणांचा तुटवडा निर्माण झाला आहे. कृषी सेवा केंद्राकडे सुध्दा आता बियाणे उपलब्ध नाही. त्यामुळे दुबार पेरणी करायची तरी कशी,असा प्रश्न विचारला जात आहे.

पावसाचे आगमन, शेतकऱ्यांना दिलासा

१७ जून रोजी तालुक्यात सर्वत्र पाऊस झाला. जवळी, मालेवाडा, चिचाळा या पट्यामध्ये मुसळधार पाऊस बरसला. यात जमिनीत गडप झालेल्या बियाणांना मोकळा श्वास घेण्यासाठी त्यानंतर हलका पाऊस महत्वाचा होता. मात्र तब्बल पाच दिवस पावसाने उसंत घेतली आणि दुबार पेरणीची संकट ओढवले. अशातच मंगळवारी राञभर चांगला पाऊस झाल्याने ऑक्सिजनवरील कोवळ्या अंकुरलेल्या बियाणांना जीवनदान मिळाले आहे. शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे.

===Photopath===

230621\img-20210621-wa0085.jpg

===Caption===

१७ जूनच्या पावसामुळे जवळी येथील ह्या शेतात पेरलेले बियाणे जमिणीत गडप झाले आणि दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.