शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी क्रिमीलेयरची अट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 10:50 IST

राज्यातील अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी राज्य शासनाकडून शिष्यवृत्ती दिली जाते. परंतु यापुढे सरसकट ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपयांच्या आत आहे, त्यांचे पाल्यच या योजनेसाठी पात्र ठरतील, असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे मागासवर्गीय विद्यार्थी संतप्त झाले आहेत.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांमध्ये संताप : ऑनलाईन निषेध, आंदोलनाचा इशारा

 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी राज्य शासनाकडून शिष्यवृत्ती दिली जाते. परंतु यापुढे सरसकट ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपयांच्या आत आहे, त्यांचे पाल्यच या योजनेसाठी पात्र ठरतील, असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे मागासवर्गीय विद्यार्थी संतप्त झाले आहेत. या निर्णयाविरुद्ध सध्या ऑनलाईन निषेध नोंदवला जात असून लॉकडाऊन संपल्यावर राज्य शासनाविरुद्ध आंदोलनाचा इशाराही देण्यात आलेला आहे.राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने सरसकट सर्वच अनुसूचित जातीच्या नागरीकांना परदेशी शिक्षणासाठी क्रिमीलेयरची अट लागु केली आहे. अनुसूचित जातींमधील वंचित घटकाला परदेशातील उच्च शिक्षणाचा अधिक लाभ मिळावा, या हेतूने उत्पन्नाची अट घालण्याचा निर्णय घेण्यात आला असे राज्य सरकारच्या सामाजिक न्याय मंत्र्यांचे म्हणने आहे. मात्र या निर्णयामुळे राज्यातील मोठया संख्येत असलेल्या मध्यमवर्गीय नागरीकांना फटका बसणार असल्याचे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसह समता सैनिक दल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे म्हणणे आहे. सामाजिक न्याय मंत्र्यांच्या या निर्णयाचा सध्या सोशल मिडियाच्या माध्यमातून जाहीर निषेध केला जात आहे. अनेक संघटनांनी लॉकडाऊननंतर आंदोलनाचा इशाराही दिला आहे.मुख्यमंत्र्यांनाही निवेदनविदेशातील उच्च शिक्षणाचा खर्च ४० ते ८० लाख रुपये आहे. त्यामुळे सहा लाखापेक्षा अधिक कमविणारे छोटे व्यावसाईक, लिपीक, शिक्षक किंवा तत्सम कर्मचारी आपल्या पाल्याला विदेशात उच्च शिक्षण देऊ शकत नाही. परदेशी शिक्षणाच्या ७५ वरून १२५ जागा करून ६०:४० च्या प्रमाणात अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना लाभ दिल्या जाऊ शकतो. सामाजिक न्याय विभागाने घेतलेला हा निर्णय अन्यायकारक आहे. त्यामुळे हा शासन आदेश रद्द करण्याची मागणी रिपाई (आठवले) गटाचे अध्यक्ष महेंद्र मानकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.

 

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र