शहरं
Join us  
Trending Stories
1
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! बॉम्बस्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
2
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
4
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
5
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
6
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
7
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
8
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
9
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
10
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
11
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
12
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
13
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
14
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
15
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
16
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
17
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
18
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
19
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
20
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी क्रिमीलेयरची अट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 10:50 IST

राज्यातील अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी राज्य शासनाकडून शिष्यवृत्ती दिली जाते. परंतु यापुढे सरसकट ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपयांच्या आत आहे, त्यांचे पाल्यच या योजनेसाठी पात्र ठरतील, असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे मागासवर्गीय विद्यार्थी संतप्त झाले आहेत.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांमध्ये संताप : ऑनलाईन निषेध, आंदोलनाचा इशारा

 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी राज्य शासनाकडून शिष्यवृत्ती दिली जाते. परंतु यापुढे सरसकट ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपयांच्या आत आहे, त्यांचे पाल्यच या योजनेसाठी पात्र ठरतील, असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे मागासवर्गीय विद्यार्थी संतप्त झाले आहेत. या निर्णयाविरुद्ध सध्या ऑनलाईन निषेध नोंदवला जात असून लॉकडाऊन संपल्यावर राज्य शासनाविरुद्ध आंदोलनाचा इशाराही देण्यात आलेला आहे.राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने सरसकट सर्वच अनुसूचित जातीच्या नागरीकांना परदेशी शिक्षणासाठी क्रिमीलेयरची अट लागु केली आहे. अनुसूचित जातींमधील वंचित घटकाला परदेशातील उच्च शिक्षणाचा अधिक लाभ मिळावा, या हेतूने उत्पन्नाची अट घालण्याचा निर्णय घेण्यात आला असे राज्य सरकारच्या सामाजिक न्याय मंत्र्यांचे म्हणने आहे. मात्र या निर्णयामुळे राज्यातील मोठया संख्येत असलेल्या मध्यमवर्गीय नागरीकांना फटका बसणार असल्याचे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसह समता सैनिक दल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे म्हणणे आहे. सामाजिक न्याय मंत्र्यांच्या या निर्णयाचा सध्या सोशल मिडियाच्या माध्यमातून जाहीर निषेध केला जात आहे. अनेक संघटनांनी लॉकडाऊननंतर आंदोलनाचा इशाराही दिला आहे.मुख्यमंत्र्यांनाही निवेदनविदेशातील उच्च शिक्षणाचा खर्च ४० ते ८० लाख रुपये आहे. त्यामुळे सहा लाखापेक्षा अधिक कमविणारे छोटे व्यावसाईक, लिपीक, शिक्षक किंवा तत्सम कर्मचारी आपल्या पाल्याला विदेशात उच्च शिक्षण देऊ शकत नाही. परदेशी शिक्षणाच्या ७५ वरून १२५ जागा करून ६०:४० च्या प्रमाणात अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना लाभ दिल्या जाऊ शकतो. सामाजिक न्याय विभागाने घेतलेला हा निर्णय अन्यायकारक आहे. त्यामुळे हा शासन आदेश रद्द करण्याची मागणी रिपाई (आठवले) गटाचे अध्यक्ष महेंद्र मानकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.

 

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र