शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

गुन्हे वार्ता...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:09 IST

नागपूर : काही आरोपींनी जुन्या शत्रुत्वातून हल्ला करून एका विद्यार्थिनीसह तिघांना जखमी केले. ही घटना शनिवारी सायंकाळी ७ च्या ...

नागपूर : काही आरोपींनी जुन्या शत्रुत्वातून हल्ला करून एका विद्यार्थिनीसह तिघांना जखमी केले. ही घटना शनिवारी सायंकाळी ७ च्या सुमारास अंबाझरीतील हिलटॉप परिसरात घडली.

पोलीस तक्रारीनुसार, रिदम श्याम काळे (१७) ही मित्र शिवांग तिवारी, श्रावणी मडावी व सौम्या अय्यर यांच्यासोबत हिलटॉप परिसरातील फुटपाथवर बसली होती. दरम्यान, आरोपी निखिल रेड्डी हा सात-आठ साथीदारांसोबत तेथे पोहोचला. त्यांनी जुन्या शत्रुत्वातून रिदमला काठीने मारहाण केली. शिवांग व श्रावणी रिदमला वाचवण्यासाठी गेले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. अंबाझरी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

---------------

शांतीनगरात अ‍ॅक्टिव्हा पेटवली

नागपूर : काही अज्ञात आरोपींनी शांतीनगर येथे एक अ‍ॅक्टिव्हा दुचाकी पेटवली. ही घटना शनिवारी रात्री घडली. झाडे चौक येथील फिर्यादी सूरज विठोबा बर्डीकर यांनी घरापुढे अ‍ॅक्टिव्हा उभी केली होती. दरम्यान, अज्ञात आरोपींनी अ‍ॅक्टिव्हाला आग लावली. शांतीनगर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

--------------

दारुड्या पतीचा पत्नीवर हल्ला

नागपूर : एमआयडीसी येथील दारुड्या पतीने पत्नीला काठीने जबर मारहाण केली. ही घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर २ च्या सुमारास घडली.

विनोद सिरसाट (४९) असे आरोपीचे नाव असून तो रमाबाई आंबेडकरनगर येथील रहिवासी आहे. पत्नीचे नाव मीना आहे. विनोद दारू पिऊन घरी आला. त्याने मीनाला भोजन वाढायला सांगितले. त्यानंतर तो मीनाला शिवीगाळ करायला लागला, तसेच त्याने मीनाला मारहाण केली. एमआयडीसी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

-------------

भोजनासाठी मित्रावर प्राणघातक हल्ला

नागपूर : भोजन तयार केले नाही म्हणून एका युवकाने मित्रावर काठीने प्राणघातक हल्ला केला.

संतोष ऊर्फ मायकल यादव (३५) असे आरोपीचे, तर चक्रधर घाटे (३५) असे जखमीचे नाव आहे. दोघेही डिप्टी सिग्नल परिसरात एकत्र राहतात. ते भोजनाचा खर्च अर्धा-अर्धा वाटून घेतात; परंतु संतोषने पैसे न दिल्यामुळे चक्रधरने भोजन तयार केले नाही. त्यामुळे संतोष संतापला. त्याने शुक्रवारी रात्री चक्रधरला काठीने मारहाण केली व फरार झाला. आरोपीविरुद्ध कळमना पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सुरू आहे.