शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
3
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
4
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
5
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
6
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
7
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
8
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
9
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
10
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
11
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
12
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
13
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
14
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
15
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
16
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
17
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
18
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
19
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
20
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 

लोकशाही टिकून राहण्याचे श्रेय संविधानालाच

By admin | Updated: February 18, 2015 02:43 IST

विविध जातीधर्माच्या नागरिकांना एकसंघ करून देशाची सुरक्षा आणि अखंडता निर्माण करण्याचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले.

नागपूर : विविध जातीधर्माच्या नागरिकांना एकसंघ करून देशाची सुरक्षा आणि अखंडता निर्माण करण्याचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. त्यामुळे आज लोकशाही टिकून असून याचे श्रेय बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानालाच जाते, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी आज येथे केले.वंदना संघ, राईट थिंकर्स पब्लिकेशन अ‍ॅण्ड डाक्युमेन्टेशन प्रा.लिच्या वतीने संविधान सभा डिबेटस् या मराठी आवृत्तीच्या खंडाचे प्रकाशन वसंतराव देशपांडे सभागृहात करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे होते. अध्यक्षस्थानी वासुदेव थूल होते. व्यासपीठावर देवीदास घोडेस्वार, भय्याजी खैरकर, प्राचार्य विठ्ठलराव खाडे, लॉर्ड बुद्धा टीव्हीचे संचालक सचिन मून, विठ्ठलराव डांगरे, जमुना डगावकर उपस्थित होते. प्रभारी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे म्हणाले, संविधान तयार करताना काय चर्चा झाली याची माहिती संविधान सभा डिबेटस्मधून मिळणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रासाठी मेहनत घेऊन संविधान आपल्यापुढे ठेवले. संविधान सभा डिबेटस् मराठीतून लोकांपर्यंत पोहोचले ही महत्त्वाची बाब आहे. संविधानातून बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जातीच्या नागरिकांना सन्मान मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले. देवीदास घोडेस्वार यांनी देशात कुठेही समस्या निर्माण झाल्यास संविधानाची गरज पडत असल्याचे सांगितले. प्रा. अनिल काणेकर यांनी संविधान सभा डिबेटस्चे मराठी भाषांतरामुळे ते सर्वसामान्यांपर्यंत जाणार असल्याचे सांगितले. भय्याजी खैरकर यांनी शासनाने परवानगी दिल्यास बाबासाहेबांचे अप्रकशित साहित्य प्रकाशित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. वासुदेवराव थूल यांनी सरकारचा पैसा न घेता आंबेडकरांचे साहित्य प्रकाशित करायचे हे वंदना संघाचे तत्त्व असल्याचे सांगितले. कार्यक्रमात संविधान सभा डिबेटस्साठी योगदान देणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(प्रतिनिधी)