शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

यंदाची नागपुरातील फटाक्यांची दिवाळी १०० कोटींची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 21:20 IST

दिवाळीतील उत्सवी वातावरणाला झळाळून सोडणारे फटाके यंदा महागाईनंतरही मोठ्या प्रमाणात वाजले. कच्च्या मालाच्या कि मतीत वाढ, कामगारांची टंचाई आणि वाढलेली मजुरी, वीज दरवाढ, डिझेलमुळे वाहतुकीचा वाढलेला खर्च आदींमुळे यावर्षी फटाके १५ ते २० टक्क्यांनी वधारले. त्यानंतरही नागपुरात विक्रीत गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढ झाली. यंदा नागपूर जिल्ह्यात फटाक्यांची दिवाळी १०० कोटींची झाल्याचा अंदाज घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

ठळक मुद्दे१५ ते २० टक्के महाग : ग्राहकांची उत्साहात खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवाळीतील उत्सवी वातावरणाला झळाळून सोडणारे फटाके यंदा महागाईनंतरही मोठ्या प्रमाणात वाजले. कच्च्या मालाच्या कि मतीत वाढ, कामगारांची टंचाई आणि वाढलेली मजुरी, वीज दरवाढ, डिझेलमुळे वाहतुकीचा वाढलेला खर्च आदींमुळे यावर्षी फटाके १५ ते २० टक्क्यांनी वधारले. त्यानंतरही नागपुरात विक्रीत गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढ झाली. यंदा नागपूर जिल्ह्यात फटाक्यांची दिवाळी १०० कोटींची झाल्याचा अंदाज घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.विक्रेत्यांना परवाना मिळण्यास उशीरपर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे फटाका विक्रीत घट होण्याची शक्यता प्रारंभी वर्तविली जात होती. दिवाळीच्या पाच दिवसांपूर्वी ग्राहक बाजारात फिरकले नव्हते. पण लक्ष्मीपूजनाच्या दोन दिवसांपूर्वी ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली. पोलिसांनीही दिवाळीच्या काहीच दिवसांपूर्वी फटाके विक्रीला परवाना दिल्यामुळे अनेकांना दुकाने थाटण्यात अडचणी आल्या. किरकोळ विक्रेत्यांना परवाना मिळाल्यानंतरच ठोक खरेदीला प्रारंभ केला. रेशीमबाग, तुळशीबाग येथील फटाके विक्रेते सय्यदभाई म्हणाले, परवाना उशिरा मिळाला तरीही फटाके विक्रीवर काहीही परिणाम झाला नाही. दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्राहकांनी उत्साहात खरेदी केली.कच्चा माल महागलाफटाके निर्मितीसाठी बेरियम नायट्रेट, अमोनियम नायट्रेट, अल्युमिनियम पावडर, कॉपर कोटेड वायर, सल्फर, रद्दी पेपर, सुतळी अशा कच्चा मालाचा वापर केला जातो. यंदा यापैकी अनेक गोष्टीच्या कि मतीमध्ये लक्षणीय अशी वाढ झाली. शिवाय कामगारांची वाढलेली मजुरी तसेच डिझेल-पेट्रोलच्या किमतीतील सततच्या वाढीमुळे वाहतुकीचा वाढलेला खर्च या सर्व बाबींमुळे फटाके उत्पादकांना फटाक्यांच्या किमती वाढविण्याशिवाय पर्याय नव्हता, असे उत्पादक ललित कारटवटकर यांनी सांगितले.सर्वोच्च न्यायालयाचा आदेश अन् पर्यावरण प्रेमींची जनजागृतीवाढत्या प्रदूषणाचे कारण देत रात्री दहानंतर फटाके वाजविण्यास सर्वोच्च न्यायालयाचा मनाई आदेश आणि पर्यावरण प्रेमींच्या जनजागृतीचा परिणाम विक्रीवर झाल्याचे काही विक्रेत्यांनी सांगितले. फटाक्यांमध्ये अनार, सुतळी बॉम्ब, चक्री, फुलझडी यांची सर्वाधिक विक्री होते. यंदा मोठ्या आवाजाच्या फटाक्यांऐवजी नागरिकांनी फॅन्सी, विना आवाजाचे, रंगांची उधळण करणाऱ्या कमी आवाजाच्या फटाक्यांना प्राधान्य दिल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. गेल्या चार वर्षांपासून उत्पादक कंपन्यांनी मोठ्या आवाजाच्या फटाक्यांचे उत्पादन कमी केले आहे. फटाक्यांवर देवीदेवतांची चित्रेही वापरणे या कंपन्यांनी बंद केले आहे. एकंदरीत न्यायालयाने घातलेले निर्बंध आणि नागरिकांमध्ये झालेली जागृती यामुळे फटाक्यांच्या विक्रीत पुढे आणखी वाढ होण्याची शक्यता नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :DiwaliदिवाळीCrackersफटाके