शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2
१८ महिने राहु-केतु गोचर: ५ मूलांकांना दुपटीने लाभ, गुंतवणुकीत फायदा; सुख-समृद्धी-भरभराट!
3
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
4
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
5
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
6
"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..."
7
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
8
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
9
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
10
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
11
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
12
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
13
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
14
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
15
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
16
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
17
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
18
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
19
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
20
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी

शत्रूचे प्राण घेऊनच देशाचे रक्षण होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2016 02:33 IST

आपल्या देशाच्या सैन्यदलाची आत्मशक्ती ही इतर कुठल्याही देशातील सैनिकांपेक्षा अधिक आहे.

उमा भारती : ‘सीआरपीएफ’च्या जवानांसोबत ‘रक्षाबंधन’ केले साजरे नागपूर : आपल्या देशाच्या सैन्यदलाची आत्मशक्ती ही इतर कुठल्याही देशातील सैनिकांपेक्षा अधिक आहे. प्रतिकूल परिस्थितीत काम करीत असतानादेखील सैनिक आपल्या निश्चयावर अटळ असतात. स्वत:चे बलिदान देऊन देशाचे रक्षण करायला ते सदैव सज्ज असतात. परंतु शत्रूचे प्राण घेऊनदेखील देशाचे रक्षण होऊ शकते, स्वातंत्र्य दिले तर आपले जवान कराची व लाहोरमध्येही तिरंगा फडकवू शकतात. परंतु त्यांचे हात बांधले गेले आहेत, असे मत केंद्रीय जल संसाधन, नदी विकास व गंगा पुनरुत्थान मंत्री उमा भारती यांनी व्यक्त केले. गुरुवारी ‘सीआरपीएफ’च्या जवानांच्या ‘रक्षाबंधन’ कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी जवानांना राख्या न बांधता त्यांना टिळा लावून रक्षाबंधनाचा सण साजरा केला. भारतातील तरुण पिढीमध्ये देशभक्तीची भावना वाढीस लागावी यासाठी केंद्र सरकारतर्फे ‘आजादी के ७० साल-याद करो कुर्बानी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत सर्व केंद्रीय मंत्री व राज्यांचे मुख्यमंत्री राष्ट्रीय व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या दोन स्थळांना भेट देणार आहेत. याचाच एक भाग म्हणून उमा भारती नागपुरात आल्या होत्या. नेमके गुरुवारी रक्षाबंधन येत असल्याने उमा भारती ‘सीआरपीएफ’च्या जवानांसोबत रक्षाबंधन साजरे करण्यासाठी पोहोचल्या. हिंगणा मार्गावरील ‘सीआरपीएफ’च्या ‘ग्रुप सेंटर’वर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दहशतवादाचे परिणाम आपल्या देशाने खूप भोगले आहेत. पंजाब तर दहशतवाद्यांचा अड्डा झाला होता. परंतु आता तेथे शांती आहे. याचे सर्व श्रेय सुरक्षायंत्रणांना जाते. आपल्या देशात अनेक अंतर्गत आव्हाने आहेत. पोलीस, सैन्य, निमलष्करी दलाचे जवान अडचणींमध्ये काम करीत असतात. अनेकदा दुर्गम भागात खाण्यापिण्याची व्यवस्था नसते. परंतु तरीदेखील जवान जोमाने देशाचे रक्षण करण्यासाठी तत्पर असतात. या जवानांच्या पाठीमागे आपण सदैव आहोत. वेळ आली तर त्यांच्यासोबत सीमेवरदेखील जायला तयार आहे, असे उमा भारती म्हणाल्या. यावेळी ‘सीआरपीएफ’चे महासंचालक सुनील सिंह यांनी जवानांना मार्गदर्शन केले. देशाची अखंडता कायम राखण्यासाठी ‘सीआरपीएफ’ कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले. यावेळी ‘सीआरपीएफ’चे ‘डीआयजी’ ए.पी.सिंह, दिनेश उनीगल, संजीव चौधरी, संचालक मनोज ध्यानी, सीमा तोलिया प्रामुख्याने उपस्थित होते. एम.ए.खान यांनी संचालन केले तर ए.पी.सिंह यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)