शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
2
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
3
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
4
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
6
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
7
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
8
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!
9
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
10
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
11
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
12
मानव-बिबट्या संघर्षावर सरकारचे निर्णायक पाऊल; मनुष्यहानी रोखायला प्राधान्य, ११ कोटी मंजूर
13
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
14
"होनराव म्हणजे तू मराठी ना? तुझी बायको भैयिणी...", कमेंट वाचून मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला...
15
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
17
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
18
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
19
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे

शत्रूचे प्राण घेऊनच देशाचे रक्षण होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2016 02:33 IST

आपल्या देशाच्या सैन्यदलाची आत्मशक्ती ही इतर कुठल्याही देशातील सैनिकांपेक्षा अधिक आहे.

उमा भारती : ‘सीआरपीएफ’च्या जवानांसोबत ‘रक्षाबंधन’ केले साजरे नागपूर : आपल्या देशाच्या सैन्यदलाची आत्मशक्ती ही इतर कुठल्याही देशातील सैनिकांपेक्षा अधिक आहे. प्रतिकूल परिस्थितीत काम करीत असतानादेखील सैनिक आपल्या निश्चयावर अटळ असतात. स्वत:चे बलिदान देऊन देशाचे रक्षण करायला ते सदैव सज्ज असतात. परंतु शत्रूचे प्राण घेऊनदेखील देशाचे रक्षण होऊ शकते, स्वातंत्र्य दिले तर आपले जवान कराची व लाहोरमध्येही तिरंगा फडकवू शकतात. परंतु त्यांचे हात बांधले गेले आहेत, असे मत केंद्रीय जल संसाधन, नदी विकास व गंगा पुनरुत्थान मंत्री उमा भारती यांनी व्यक्त केले. गुरुवारी ‘सीआरपीएफ’च्या जवानांच्या ‘रक्षाबंधन’ कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी जवानांना राख्या न बांधता त्यांना टिळा लावून रक्षाबंधनाचा सण साजरा केला. भारतातील तरुण पिढीमध्ये देशभक्तीची भावना वाढीस लागावी यासाठी केंद्र सरकारतर्फे ‘आजादी के ७० साल-याद करो कुर्बानी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत सर्व केंद्रीय मंत्री व राज्यांचे मुख्यमंत्री राष्ट्रीय व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या दोन स्थळांना भेट देणार आहेत. याचाच एक भाग म्हणून उमा भारती नागपुरात आल्या होत्या. नेमके गुरुवारी रक्षाबंधन येत असल्याने उमा भारती ‘सीआरपीएफ’च्या जवानांसोबत रक्षाबंधन साजरे करण्यासाठी पोहोचल्या. हिंगणा मार्गावरील ‘सीआरपीएफ’च्या ‘ग्रुप सेंटर’वर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दहशतवादाचे परिणाम आपल्या देशाने खूप भोगले आहेत. पंजाब तर दहशतवाद्यांचा अड्डा झाला होता. परंतु आता तेथे शांती आहे. याचे सर्व श्रेय सुरक्षायंत्रणांना जाते. आपल्या देशात अनेक अंतर्गत आव्हाने आहेत. पोलीस, सैन्य, निमलष्करी दलाचे जवान अडचणींमध्ये काम करीत असतात. अनेकदा दुर्गम भागात खाण्यापिण्याची व्यवस्था नसते. परंतु तरीदेखील जवान जोमाने देशाचे रक्षण करण्यासाठी तत्पर असतात. या जवानांच्या पाठीमागे आपण सदैव आहोत. वेळ आली तर त्यांच्यासोबत सीमेवरदेखील जायला तयार आहे, असे उमा भारती म्हणाल्या. यावेळी ‘सीआरपीएफ’चे महासंचालक सुनील सिंह यांनी जवानांना मार्गदर्शन केले. देशाची अखंडता कायम राखण्यासाठी ‘सीआरपीएफ’ कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले. यावेळी ‘सीआरपीएफ’चे ‘डीआयजी’ ए.पी.सिंह, दिनेश उनीगल, संजीव चौधरी, संचालक मनोज ध्यानी, सीमा तोलिया प्रामुख्याने उपस्थित होते. एम.ए.खान यांनी संचालन केले तर ए.पी.सिंह यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)