शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; पंतप्रधान मोदींनीही केलं खासदाराचं कौतुक!
4
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
5
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
7
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
8
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
9
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
10
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?
11
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
12
टी-२० क्रिकेटमध्ये आता विराटआधी वॉर्नरचं नाव घेतलं जाईल; द हंड्रेड स्पर्धेत गाठला मोलाचा टप्पा!
13
कंगाल पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची संपत्ती किती! कशी करतात कमाई?
14
१० हजार रुपयांत बँकॉकमध्ये काय काय करू शकता? भारतीय रुपयाची तिकडे किंमत किती?
15
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
16
Angaraki Chaturthi 2025: अंगारकी सहा महिन्यातून एकदा येते; आज 'हा' उपाय करायला विसरू नका!
17
विराट-रोहितचं काय होणार? ही चर्चा रंगत असताना BCCI नं आखली वैभव सूर्यवंशीच्या उज्वल भविष्याची योजना
18
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
19
Video - भयानक! भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याचे तोडले लचके
20
रागावल्यामुळे कुत्रा चिडला, थेट मालकावर हल्ला केला; कानाचा लचका तोडून पळाला...

देशाला महात्मा गांधी यांना अभिप्रेत असलेल्या राष्ट्रवादाची गरज : श्री शुभमूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 23:43 IST

देशातील लोकशाही वाचविण्यासाठी गांधीजींना अभिप्रेत असलेल्या राष्ट्रवादाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत श्री शुभमूर्ती यांनी बुधवारी केले.

ठळक मुद्देसर्वोदय आश्रमात महात्मा गांधी व भारतीय राष्ट्रीयता यावर व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्ती म्हणजे स्वातंत्र्य एवढेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिप्रेत नव्हते, तर या देशात सर्वधर्मसमभाव, सर्वधर्मियात प्रेम व बंधूभाव अभिप्रेत होता. दुर्दैवाने आज देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रवादाच्या नावावर असत्य लोकांपुढे मांडले जात आहे. सत्य बोलण्याची हिंमत राहिलेली नाही. देशातील लोकशाही वाचविण्यासाठी गांधीजींना अभिप्रेत असलेल्या राष्ट्रवादाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत श्री शुभमूर्ती यांनी बुधवारी केले. सर्वोदय आश्रम येथे महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महात्मा गांधी व भारतीय राष्ट्रीयता या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. व्यासपीठावर सर्वोदय आश्रमच्या कार्याध्यक्ष लीलाताई चितळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश पांढरीपांडे, विश्वस्त अ‍ॅड. आशुतोष धर्माधिकारी उपस्थित होते.श्री शुभमूर्ती म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापुढे बोलण्याची आज कुणाचीही हिंमत नाही. लोकांना सत्य मांडण्याचे स्वातंत्र्य राहिलेले नाही. संकुचित व चुकीचा राष्ट्रवाद मांडतात आणि लोक त्यावर टाळ्या वाजवतात. देशात धर्मांधता वाढत आहे. हिंदू धर्मात सर्वधर्मसमभावाची शिकवण आहे. परंतु हिंदुत्वाच्या नावावर जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहे. ही कशी लोकशाही असा सवाल त्यांनी केला.लीलाताई चितळे म्हणाल्या, महात्मा गांधी यांच्या विचाराकडे बघण्यासाठी व्यापक दृष्टिकोन लागतो. सध्या जो राष्ट्रवाद शिकवला जात आहे तो खरा राष्ट्रवाद नाही. सत्यासाठी अहिंसक कृतीतून मानवी शक्तीचा आविष्कार होत नाही तोपर्यंत खरा मानवतावाद निर्माण होणार नाही. मानवी शक्ती जागृत करण्यासाठी आज अहिंसक क्र ांतीची देशाला गरज आहे. यासाठी युवकांनी पुढे यावे, असे आवाहन चितळे यांनी केले.सूत्रसंचालन संदेश सिंगलकर यांनी तर आभार अ‍ॅड.वंदन गडकरी यांनी मानले. यावेळी विशाखा बागडे, अ‍ॅड. स्मिता सिंगलकर, योगेश देवतळे, शेफाली शहा, यामिनी, राजेश कुंभारे, श्वेता वाघमारे यांच्यासह सर्वोदय आश्रमचे पदाधिकारी व गांधीवादी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

 

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीnagpurनागपूर